शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

आरोग्य उपकेंद्रात प्रसूती करणे असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:58 IST

मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सर्वात महत्त्वाकांक्षी उचललेले पाऊल म्हणजे १०० टक्के प्रसुती ही आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक केली आहे.

ठळक मुद्देपरिचारिका दिन विशेष : डॉक्टरांअभावी परिचारिकांवर कामांचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ : मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सर्वात महत्त्वाकांक्षी उचललेले पाऊल म्हणजे १०० टक्के प्रसुती ही आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक केली आहे. शासनाचा हा निर्णय योग्य असला तरी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात असलेल्या असुविधा यासाठी कारणीभूत ठरत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध योजना राबवून हे काम करण्यात येत आहे. त्याद्वारे मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यात काही प्रमाणात यश आले आहे. परंतु आरोग्य संस्थेतील आरोग्य उपकेंद्र आजही विविध समस्यांच्या विळख्यात आहेत.संपूर्ण ग्रामीण जनतेच्या आरोग्याची भिस्त ही आरोग्य उपकेंद्रावर अवलंबून असते. या उपकेंद्रात आरोग्यसेविका व आरोग्यसेवक एवढेच मनुष्यबळ असते. प्रसुतीचे काम एकट्या आरोग्य सेविकेवर असते. एका आरोग्य केंद्रांतर्गत ५ ते ८ उपकेंद्र असतात व एका उपकेंद्रात ३ ते ७ गावांचा समावेश असतो. उपकेंद्रापासून गावांचे अंतरसुध्दा २ ते ५ किमी असते. आरोग्यसेविका या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निर्देशाप्रमाणे विविध कामे करीत असतात. परंतु प्रसुती करताना आरोग्यसेविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रूग्ण रात्रीअपरात्री केव्हाही उपकेंद्रात येतात. त्यामुळे आरोग्यसेविकांना या समस्यांना तोंड द्यावे लागते.प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात अनेक घडामोडी घडतात. पंरतु रूग्णांची विश्वसनिय व्यक्ती म्हणजे आरोग्यसेविका जमेल त्या मार्गाने सुरक्षित प्रसुती कशी होईल, माता व बाळाचे आरोग्य कसे सुरक्षित राहील या विवंचनेत असते. प्रसुती होईपर्यंत तिचा जीवात जीव नसतो.सर्वस्व पणाला लावून प्रसुतीची प्रक्रिया ती हाताळत असली तरी हे सगळ करीत असताना आरोग्य सेविकेला कधी मातेला तर कधी बाळाला सुरक्षित हाताळताना केव्हा बिकट प्रसंग ओढवेल हे सांगता येत नाही. थोडासाही निष्काळजीपणा जीवावर बेतू शकते.प्रसुती दरम्यान अतिरक्तस्त्राव, झटके येणे, उच्च रक्तदाब, जंतूसंसर्ग यासारख्या समस्या उद्भवतात तर बाळाच्याबाबतीत कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, स्तनपान करण्यासाठी बाळ असक्षम असणे, उपजत मृत्यू व इतर वैगुण्य निर्माण होण्याची शक्यता असते. त्यावेळी आरोग्यसेविकेला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. याशिवाय अपुरा औषधसाठा, आॅक्सीजन सिलेंडरची अनुपलब्धता, इमर्जन्सी ड्रग्स डॉक्टरशिवाय हाताळण्याची परवानगी नसणे आदी बाबी आरोग्य सेविकेला अडचणीत आणतात. उपकेंद्रापासून आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालय व जिल्हा रूग्णालय लांब अंतरावर असल्याने रूग्णाला बऱ्याचदा संदर्भित केल्यावर रस्त्यामध्येच अनुचित घटना घडलेल्या आहेत. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत मिळत नाही. आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर असल्यामुळे तेही उपकेंद्रात सेवा देण्यासाठी असमर्थ ठरतात. रूग्णाला संदर्भित केल्यावर आरोग्य केंद्रात असलेली रूग्णवाहिका किंवा तालुकास्तरावर असलेली रूग्णवाहिका किंवा फिरती रूग्णवाहिकेच्या उपलब्धतेवर सुद्धा प्रसुतीपश्चात मातेला व नवजात बाळाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. प्रसूतीचे पूर्व नियोजन असतांनाही अकाली प्रसुती व इतर संबंधीत समस्या उद्भवल्यास रूग्ण प्रथमत: उपकेंद्रात धाव घेत असतो त्यावेळीही आरोग्यसेविकेची तारांबळ उडत असते. कामाचा वाढता बोझा व आॅनलाईन कामे व मुख्यालय सोडून करावयाची कामे, कामाचे तास निश्चित नसणे यासह अन्य बाबी उपकेंद्रात प्रसुतीसाठी परिणामकारक ठरतात.