शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपकेंद्रात प्रसूती करणे असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:58 IST

मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सर्वात महत्त्वाकांक्षी उचललेले पाऊल म्हणजे १०० टक्के प्रसुती ही आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक केली आहे.

ठळक मुद्देपरिचारिका दिन विशेष : डॉक्टरांअभावी परिचारिकांवर कामांचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ : मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सर्वात महत्त्वाकांक्षी उचललेले पाऊल म्हणजे १०० टक्के प्रसुती ही आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक केली आहे. शासनाचा हा निर्णय योग्य असला तरी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात असलेल्या असुविधा यासाठी कारणीभूत ठरत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध योजना राबवून हे काम करण्यात येत आहे. त्याद्वारे मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यात काही प्रमाणात यश आले आहे. परंतु आरोग्य संस्थेतील आरोग्य उपकेंद्र आजही विविध समस्यांच्या विळख्यात आहेत.संपूर्ण ग्रामीण जनतेच्या आरोग्याची भिस्त ही आरोग्य उपकेंद्रावर अवलंबून असते. या उपकेंद्रात आरोग्यसेविका व आरोग्यसेवक एवढेच मनुष्यबळ असते. प्रसुतीचे काम एकट्या आरोग्य सेविकेवर असते. एका आरोग्य केंद्रांतर्गत ५ ते ८ उपकेंद्र असतात व एका उपकेंद्रात ३ ते ७ गावांचा समावेश असतो. उपकेंद्रापासून गावांचे अंतरसुध्दा २ ते ५ किमी असते. आरोग्यसेविका या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निर्देशाप्रमाणे विविध कामे करीत असतात. परंतु प्रसुती करताना आरोग्यसेविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रूग्ण रात्रीअपरात्री केव्हाही उपकेंद्रात येतात. त्यामुळे आरोग्यसेविकांना या समस्यांना तोंड द्यावे लागते.प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात अनेक घडामोडी घडतात. पंरतु रूग्णांची विश्वसनिय व्यक्ती म्हणजे आरोग्यसेविका जमेल त्या मार्गाने सुरक्षित प्रसुती कशी होईल, माता व बाळाचे आरोग्य कसे सुरक्षित राहील या विवंचनेत असते. प्रसुती होईपर्यंत तिचा जीवात जीव नसतो.सर्वस्व पणाला लावून प्रसुतीची प्रक्रिया ती हाताळत असली तरी हे सगळ करीत असताना आरोग्य सेविकेला कधी मातेला तर कधी बाळाला सुरक्षित हाताळताना केव्हा बिकट प्रसंग ओढवेल हे सांगता येत नाही. थोडासाही निष्काळजीपणा जीवावर बेतू शकते.प्रसुती दरम्यान अतिरक्तस्त्राव, झटके येणे, उच्च रक्तदाब, जंतूसंसर्ग यासारख्या समस्या उद्भवतात तर बाळाच्याबाबतीत कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, स्तनपान करण्यासाठी बाळ असक्षम असणे, उपजत मृत्यू व इतर वैगुण्य निर्माण होण्याची शक्यता असते. त्यावेळी आरोग्यसेविकेला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. याशिवाय अपुरा औषधसाठा, आॅक्सीजन सिलेंडरची अनुपलब्धता, इमर्जन्सी ड्रग्स डॉक्टरशिवाय हाताळण्याची परवानगी नसणे आदी बाबी आरोग्य सेविकेला अडचणीत आणतात. उपकेंद्रापासून आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालय व जिल्हा रूग्णालय लांब अंतरावर असल्याने रूग्णाला बऱ्याचदा संदर्भित केल्यावर रस्त्यामध्येच अनुचित घटना घडलेल्या आहेत. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत मिळत नाही. आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर असल्यामुळे तेही उपकेंद्रात सेवा देण्यासाठी असमर्थ ठरतात. रूग्णाला संदर्भित केल्यावर आरोग्य केंद्रात असलेली रूग्णवाहिका किंवा तालुकास्तरावर असलेली रूग्णवाहिका किंवा फिरती रूग्णवाहिकेच्या उपलब्धतेवर सुद्धा प्रसुतीपश्चात मातेला व नवजात बाळाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. प्रसूतीचे पूर्व नियोजन असतांनाही अकाली प्रसुती व इतर संबंधीत समस्या उद्भवल्यास रूग्ण प्रथमत: उपकेंद्रात धाव घेत असतो त्यावेळीही आरोग्यसेविकेची तारांबळ उडत असते. कामाचा वाढता बोझा व आॅनलाईन कामे व मुख्यालय सोडून करावयाची कामे, कामाचे तास निश्चित नसणे यासह अन्य बाबी उपकेंद्रात प्रसुतीसाठी परिणामकारक ठरतात.