शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

आरोग्य उपकेंद्रात प्रसूती करणे असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:58 IST

मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सर्वात महत्त्वाकांक्षी उचललेले पाऊल म्हणजे १०० टक्के प्रसुती ही आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक केली आहे.

ठळक मुद्देपरिचारिका दिन विशेष : डॉक्टरांअभावी परिचारिकांवर कामांचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ : मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सर्वात महत्त्वाकांक्षी उचललेले पाऊल म्हणजे १०० टक्के प्रसुती ही आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक केली आहे. शासनाचा हा निर्णय योग्य असला तरी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात असलेल्या असुविधा यासाठी कारणीभूत ठरत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध योजना राबवून हे काम करण्यात येत आहे. त्याद्वारे मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यात काही प्रमाणात यश आले आहे. परंतु आरोग्य संस्थेतील आरोग्य उपकेंद्र आजही विविध समस्यांच्या विळख्यात आहेत.संपूर्ण ग्रामीण जनतेच्या आरोग्याची भिस्त ही आरोग्य उपकेंद्रावर अवलंबून असते. या उपकेंद्रात आरोग्यसेविका व आरोग्यसेवक एवढेच मनुष्यबळ असते. प्रसुतीचे काम एकट्या आरोग्य सेविकेवर असते. एका आरोग्य केंद्रांतर्गत ५ ते ८ उपकेंद्र असतात व एका उपकेंद्रात ३ ते ७ गावांचा समावेश असतो. उपकेंद्रापासून गावांचे अंतरसुध्दा २ ते ५ किमी असते. आरोग्यसेविका या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निर्देशाप्रमाणे विविध कामे करीत असतात. परंतु प्रसुती करताना आरोग्यसेविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रूग्ण रात्रीअपरात्री केव्हाही उपकेंद्रात येतात. त्यामुळे आरोग्यसेविकांना या समस्यांना तोंड द्यावे लागते.प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात अनेक घडामोडी घडतात. पंरतु रूग्णांची विश्वसनिय व्यक्ती म्हणजे आरोग्यसेविका जमेल त्या मार्गाने सुरक्षित प्रसुती कशी होईल, माता व बाळाचे आरोग्य कसे सुरक्षित राहील या विवंचनेत असते. प्रसुती होईपर्यंत तिचा जीवात जीव नसतो.सर्वस्व पणाला लावून प्रसुतीची प्रक्रिया ती हाताळत असली तरी हे सगळ करीत असताना आरोग्य सेविकेला कधी मातेला तर कधी बाळाला सुरक्षित हाताळताना केव्हा बिकट प्रसंग ओढवेल हे सांगता येत नाही. थोडासाही निष्काळजीपणा जीवावर बेतू शकते.प्रसुती दरम्यान अतिरक्तस्त्राव, झटके येणे, उच्च रक्तदाब, जंतूसंसर्ग यासारख्या समस्या उद्भवतात तर बाळाच्याबाबतीत कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, स्तनपान करण्यासाठी बाळ असक्षम असणे, उपजत मृत्यू व इतर वैगुण्य निर्माण होण्याची शक्यता असते. त्यावेळी आरोग्यसेविकेला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. याशिवाय अपुरा औषधसाठा, आॅक्सीजन सिलेंडरची अनुपलब्धता, इमर्जन्सी ड्रग्स डॉक्टरशिवाय हाताळण्याची परवानगी नसणे आदी बाबी आरोग्य सेविकेला अडचणीत आणतात. उपकेंद्रापासून आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालय व जिल्हा रूग्णालय लांब अंतरावर असल्याने रूग्णाला बऱ्याचदा संदर्भित केल्यावर रस्त्यामध्येच अनुचित घटना घडलेल्या आहेत. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत मिळत नाही. आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर असल्यामुळे तेही उपकेंद्रात सेवा देण्यासाठी असमर्थ ठरतात. रूग्णाला संदर्भित केल्यावर आरोग्य केंद्रात असलेली रूग्णवाहिका किंवा तालुकास्तरावर असलेली रूग्णवाहिका किंवा फिरती रूग्णवाहिकेच्या उपलब्धतेवर सुद्धा प्रसुतीपश्चात मातेला व नवजात बाळाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. प्रसूतीचे पूर्व नियोजन असतांनाही अकाली प्रसुती व इतर संबंधीत समस्या उद्भवल्यास रूग्ण प्रथमत: उपकेंद्रात धाव घेत असतो त्यावेळीही आरोग्यसेविकेची तारांबळ उडत असते. कामाचा वाढता बोझा व आॅनलाईन कामे व मुख्यालय सोडून करावयाची कामे, कामाचे तास निश्चित नसणे यासह अन्य बाबी उपकेंद्रात प्रसुतीसाठी परिणामकारक ठरतात.