शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

विनापरवानगी महावितरणने केली वृक्षांची छटाई

By admin | Updated: July 8, 2017 00:33 IST

राज्य शासनाने ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे.

तीन तास वीज पुरवठा खंडित : गणेशपूर, विद्यानगर परिसरातील प्रकारप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण राज्य वृक्ष लागवडीत गुंतलेले असताना भंडारा शहरात महावितरणने शुक्रवारी विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या आल्याच्या कारणास्तव हिरव्या झाडांच्या फांद्यांची कत्तल केली. यासाठी महावितरणने विद्यानगर फिडरवरून सुमारे तीन तास विद्युत पुरवठा खंडित केला होता. वृक्षांच्या फांद्या छटाई किंवा वृक्ष कटाईची परवानगी वनविभागाकडून घेतलेली नाही, हे विशेष.वीज वितरण कंपनीच्या वतीने नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून आज ही वृक्ष छटाई करण्यात आल्याचे आता महावितरणकडून सांगण्यात येत आहे. वनविभागावर वृक्ष संवर्धन व लागवडीची जबाबदारी सोपविलेली आहे. राष्ट्रीय महामार्गावरसह गणेशपूर परिसरातील रस्त्यालगतच्या वृक्षांची कटाई व छटाई करण्यात आली. ही कामे महावितरणने पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होते. मात्र, त्यांना आता ऐन पावसाळ्यात जाग आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.कारधा उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. यावरून विद्यानगर येथील फिडरवरून गणेशपूर व विद्यानगर परिसरात वीजेचा पुरवठा नागरिकांना करण्यात आलेला आहे. दक्षिण क्षेत्रात मोडणाऱ्या हे कार्यक्षेत्र मागिल काही दिवसांपासून काही ना काही कारणाने वादग्रस्त राहत आहे. त्यात आणखी आज भर पडली. वृक्ष कटाई किंवा छटाईची वनविभागाला महाविरणने परवानगी मागितलेली नाही. विना परवानगी महाविरतणने आज सकाळपासूनच गणेशपूर येथील अखिल सभागृह परिसरातून ही वृक्ष कटाई व छटाई सुरू केली ती जिंदल पेट्रोलपंप पर्यंत केली. यासाठी महावितरणच्या दक्षिण क्षेत्राधिकाऱ्यांनी गणेशपूर ते विद्यानगर परिसरातील विद्युत पुरवठा सकाळी ७.३० वाजतापासून बंद केला तो सकाळी १०.३० पर्यंत. सध्या सकाळी ७ वाजताचे विद्युत भारनियमण बंद झाल्याने अनेकांना वाटले की, थोड्या वेळात विद्युत पुरवठा सुरळीत होईल. मात्र, आता म्हणता म्हणता तब्बल तीन तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.दरम्यानच्या काळात दक्षिण क्षेत्राचे सहाय्यक अभियंता लिमजे यांनी चार मजूरांसह गणेशपूर ते राष्ट्रीय महामार्गावरील विद्यत तारांवरील वृक्षांच्या फांद्या तर काही ठिकाणी वृक्ष कटाई करण्याचा धडाका सुरू ठेवला होता. यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असताना तशी कुठलीही परवानगी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. सोबतच सदर काम करण्यात येत असल्याने वीज ग्राहकांना त्रास होईल, याची पूर्वसूचना नागरिकांना देणे गरजेचे होते. याबाबत महावितरणने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन नागरिकांना सुचीत करण्याच्या प्रकारालाही बाजूला ठेवून ही वृक्ष कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सहाय्यक अभियंता लिमजे यांना विचारणा केली असता, त्यांनी वनविभागाची परवानगी घेतली नाही, व वीज ग्राहकांना सूचना देण्याची गरज भासली नसल्याचे प्रतिक्रिया ‘लोकमत’ला दिली.