शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

ओबीसी विद्यार्थ्यांवर सरकारकडून अन्याय

By admin | Updated: September 14, 2015 00:23 IST

महाराष्ट्रात ओबीसी समाजाकरिता नॉन क्रिमिलेअर मर्यादा सहा लाख असताना भाजप सरकारने ती मर्यादा साडेचार लाख रुपये कायम ठेवली.

तरोणेंचा आरोप : पुळका फक्त मतांसाठीगोंदिया : महाराष्ट्रात ओबीसी समाजाकरिता नॉन क्रिमिलेअर मर्यादा सहा लाख असताना भाजप सरकारने ती मर्यादा साडेचार लाख रुपये कायम ठेवली. हा अत्यंत दु:खदायक आणि अन्यायकारक निर्णय आहे. त्यामुळे ओबीसी युवा वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार, असा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी व्यक्त केला.यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात तरोणे यांनी म्हटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी २०१३ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी ओबीसीसाठी परतावा योजनेची मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. सत्तेत नसताना केवळ मतांसाठी ओबीसींचा पुळका दाखविला आणि सत्तेत येताच त्यांच्यावरच अन्याय करणारे निर्णय भाजप सरकार घेत आहे, असा आरोप तरोणे यांनी केला.तत्कालीन आमदार व विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी परतावा योजनेतील ओबीसी पालकांची उत्पन्न मर्यादा ४.५० लाखाने वाढवून ६ लाख करावी यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये नागपूर अधिवेशनात ओरड केली. त्यामुळे तत्कालीन आघाडी सरकारने यासाठीची बांठीया अभ्यास समिती रद्द केली. शिवाय या योजनेतील क्रिमीलेअर मर्यार्दा ६ लक्ष करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू या विषयाचा बागुलबुवा करीत भाजपाने निवडणूक प्रचारात धूम केली. मात्र प्रत्यक्षात नागपूर व मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही निर्णय घेतला नाही. यामुळे ओबीसी विद्यार्थी व पालकांशी हा दगा ठरला आहे. केंद्र सरकार पुरस्कृत १०० टक्के शिष्यवृत्ती योजनेसाठी देशातील ओबीसी वर्गासाठी १०१५-१६ साठी ८०० कोटींची तरतूद केली आहे. मात्र ओबीसींच्या शिष्यवृत्तीत कपात करण्यात आली. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना ओबीसी समाजावर सतत अन्याय होत असल्याचा आरोप तरोणे यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)