शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

युनिव्हर्सल फेरोचे ९०० कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

५० वर्षांपूर्वी कारखाना सुरु करण्यात आला होता. कारखान्याचे चार युनीट येथे कार्यरत होते. सुमारे तीन हजार कामगार येथे कामाला होते. सुरुवातीला १९९२ ते १९९६ दरम्यान कारखान्यावर ५२ कोटी वीज बिल थकीत होते. वीज मंडळाने वीज दरात सवलत दिली नाही. त्यामुळे १९ सप्टेंबर १९९६ ला कारखान्याची वीज खंडीत करण्यात आली.

ठळक मुद्देकारखाना बंदच : शेती परत करण्याची शेतकऱ्यांची मागणी, कामगारांचे जीवन झाले उद्ध्वस्त

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : युनिव्हर्सल फेरो हा मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना गत १५ वर्षांपासून बंद आहे. येथील ९०० कामगार देशोधडीला लागले आहेत. शासनाने २०० कोटी रुपयांचे वीज बिल माफ करूनही कारखाना सुरु झाला नाही. उलट कारखाना परिसरातील मॅग्नीज कारखानदाराने परस्पर विकण्याचा सपाटा लावला आहे. अशा परिस्थितीत ९०० कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे ४०० एकर शेती कारखानदाराने परत करावी, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.तुमसर तालुक्यात माडगी येथे युनिव्हर्सल फेरो हा मॅग्नीज शुद्धीकरणाचा कारखाना आहे. ५० वर्षांपूर्वी कारखाना सुरु करण्यात आला होता. कारखान्याचे चार युनीट येथे कार्यरत होते. सुमारे तीन हजार कामगार येथे कामाला होते. सुरुवातीला १९९२ ते १९९६ दरम्यान कारखान्यावर ५२ कोटी वीज बिल थकीत होते. वीज मंडळाने वीज दरात सवलत दिली नाही. त्यामुळे १९ सप्टेंबर १९९६ ला कारखान्याची वीज खंडीत करण्यात आली. २०१५ ते २०१८ या कालावधीत अभय योजनेंतर्गत २०० कोटी रुपये वीज बिल माफ केले. दरम्यान कारखानदाराने बिजली बोर्ड आॅफ इंडस्ट्रीयल फायनान्शीयल रिकन्स्ट्रक्शन (बीआयएफआर) याचिका दाखल केली.या दरम्यान कामगार संघटना न्यायालयात गेली. कारखान्याला ले-आॅफ मिळाला. यामुळे १ मार्च १९९७ ते मार्च १९९९ पर्यंत कामगारांना अर्धा पगार मिळाला. एप्रिल १९९९ पासून हा पगारही मिळणे बंद झाले. या काळात ७ एप्रिल १९९९ ला बीएफआर कारखाना व कामगार संघटनेला तीन महिन्याची स्थगिती मिळाली. स्थगिती दरम्यान कामगारांना स्वेच्छा निवृत्ती करारनामा २ जून १९९९ ला करण्यात आला. स्वेच्छा निवृत्ती घेतल्याशिवाय पगार मिळणार नाही असे सांगण्यात आले. मुद्रीत अर्जावर कामगारांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामगारात संभ्रम निर्माण झाला. गत २० वर्षात येथे शासनाने गंभीर दखल घेतली नाही. कामगार संघटना न्यायालयीन लढा देत आहे. कामगारांचे जीवन मात्र उद्ध्वस्त झाले आहे. येथील कामगार प्रतिनिधी रवींद्र गभणे, भास्कर झुरमुरे, हरिराम डहाळे, सरपंच गौरीशंकर पंचबुद्धे, माजी सरपंच कारू वहिले, संजय सेलोकर यांनी या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.४०० एकर जमीन पडूनकारखान्याने १९५६ रोजी शेतकºयांकडून पाच हजार रुपये दराने ४०० एकर शेती खरेदी केली होती. कारखाना बंद पडल्याने मौल्यवान शेती पडीक पडली आहे. कारखाना सुरु करा अथवा आमची शेती परत करा असा पवित्रा या परिसरातील शेतकºयांनी घेतला आहे. शेती कारखान्यात गेल्याने शेतकºयांवर मजूर म्हणून जीवन जगण्याची वेळ आली आहे.