शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

युनिव्हर्सल कारखाना बंद

By admin | Updated: December 20, 2014 00:38 IST

तुमसर जवळील मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना मागील १२ वर्षापासून कायम बंद आहे. १,३०० बेरोजगारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम देणाऱ्या ...

तुमसर : तुमसर जवळील मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना मागील १२ वर्षापासून कायम बंद आहे. १,३०० बेरोजगारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम देणाऱ्या या कारखान्याचे सुमारे २०० कोटी रुपये शासनाने वीज बिल माफ केल्याची माहिती आहे. आजतागायत एकाही लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष दिले नाही. तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखान्यावर महावितरणचे सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत होते. या कारखान्याला एनटीपीसी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करीत होते. परंतु केवळ देशातच मॅग्नीज विक्री करणे अशी अट या कारखान्याला होती. कराराचा भंग केल्याचा ठपका या कारखान्यावर ठेवून सवलतीच्या दरातील वीज देणे बंद करून जुने वीज बिल वितरण कंपनीने बाजारभावाप्रमाणे वसुल करण्याचा निर्णय घेतला.कारखाना बंद१९ सप्टेंबर १९९६ ला कारखान्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. नंतर एका करारानंतर ६ फेब्रुवारी १९९९ ला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला. सन २००३ पासून या कारखान्याचा कायम वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तेव्हापासून हा कारखाना आजपर्यंत बंद आहे. अभय योजनेअंतर्गत या कारखान्याचे २०० कोटी रुपये माफ केल्याची माहिती आहे. कारखाना मालकाने केवळ ५० कोटी रुपये येथे भरले.शेतजमीन पडूनकारखान्याकडे सुमारे ३०० एकर शेती सध्या पडून आहे. कवडीमोल किमतीत या जमिनी घेण्यात आल्या होत्या. कारखाना परिसरात आजही कोट्यवधींचा मॅग्नीज पडून आहे. खासगी सुरक्षा रक्षक त्यांनी येथे तैनात केले आहेत. कारखान्यात १० ते १२ कर्मचारी सध्या कार्यरत असून येथील माहिती कंपनी मालकाला ते नियमित देतात. खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना अल्पवेतन येथे दिले जाते अशी माहिती आहे.कारखान्यात जाण्यास मज्जावकारखाना बंद आहे. परंतु कारखान्यात कुणालाच जाण्याची बंदी आहे. प्रवेश करायचा असेल तर मालकाची परवानगी पाहिजे असा आदेश येथील सुरक्षा रक्षक देतात. कारखान्याची स्थितीबद्दल माहिती विचारली असता माहित नाही असे एकच उत्तर येथून मिळते. कारखान्याच्या सभोवताल सुरक्षा रक्षक येथे तैनात केले आहेत.मॅग्नीजच्या खाणी तुमसर तालुक्यातील चिखला, डोंगरी, बाळापूर व मध्यप्रदेशातील तिरोडी येथे आहेत. येथील मॅग्नीज देशातील इतर भागात दररोज जात आहे. (तालुका प्रतिनिधी)१,२०० कामगारांवर उपासमारया कारखान्यात कायम व कंत्राटी पद्धतीने १२०० कामगार होते. कंपनी व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्याची मागणी शासनाला केली होती. सन २००६ मध्ये ती त्यांना मिळाली. सुमारे ७०० कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. सुमारे ३०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नाही. या कामगारांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. नियमानुसार येथील कामगारांना सेवानिवृत्ती वेतन मिळणे गरजेचे होते. परंतु ते मिळत नाही अशी माहिती आहे. कामगार बेरोजगार झाले ते सध्या मोलमजुरी करीत आहेत. कामगारांची स्थिती येथे अत्यंत दयनीय झाली आहे. परप्रांतीय कामगार येथून आपल्या राज्यात निघून गेले.