शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

युनिव्हर्सल कारखाना बंद

By admin | Updated: December 20, 2014 00:38 IST

तुमसर जवळील मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना मागील १२ वर्षापासून कायम बंद आहे. १,३०० बेरोजगारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम देणाऱ्या ...

तुमसर : तुमसर जवळील मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना मागील १२ वर्षापासून कायम बंद आहे. १,३०० बेरोजगारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम देणाऱ्या या कारखान्याचे सुमारे २०० कोटी रुपये शासनाने वीज बिल माफ केल्याची माहिती आहे. आजतागायत एकाही लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष दिले नाही. तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखान्यावर महावितरणचे सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत होते. या कारखान्याला एनटीपीसी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करीत होते. परंतु केवळ देशातच मॅग्नीज विक्री करणे अशी अट या कारखान्याला होती. कराराचा भंग केल्याचा ठपका या कारखान्यावर ठेवून सवलतीच्या दरातील वीज देणे बंद करून जुने वीज बिल वितरण कंपनीने बाजारभावाप्रमाणे वसुल करण्याचा निर्णय घेतला.कारखाना बंद१९ सप्टेंबर १९९६ ला कारखान्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. नंतर एका करारानंतर ६ फेब्रुवारी १९९९ ला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला. सन २००३ पासून या कारखान्याचा कायम वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तेव्हापासून हा कारखाना आजपर्यंत बंद आहे. अभय योजनेअंतर्गत या कारखान्याचे २०० कोटी रुपये माफ केल्याची माहिती आहे. कारखाना मालकाने केवळ ५० कोटी रुपये येथे भरले.शेतजमीन पडूनकारखान्याकडे सुमारे ३०० एकर शेती सध्या पडून आहे. कवडीमोल किमतीत या जमिनी घेण्यात आल्या होत्या. कारखाना परिसरात आजही कोट्यवधींचा मॅग्नीज पडून आहे. खासगी सुरक्षा रक्षक त्यांनी येथे तैनात केले आहेत. कारखान्यात १० ते १२ कर्मचारी सध्या कार्यरत असून येथील माहिती कंपनी मालकाला ते नियमित देतात. खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना अल्पवेतन येथे दिले जाते अशी माहिती आहे.कारखान्यात जाण्यास मज्जावकारखाना बंद आहे. परंतु कारखान्यात कुणालाच जाण्याची बंदी आहे. प्रवेश करायचा असेल तर मालकाची परवानगी पाहिजे असा आदेश येथील सुरक्षा रक्षक देतात. कारखान्याची स्थितीबद्दल माहिती विचारली असता माहित नाही असे एकच उत्तर येथून मिळते. कारखान्याच्या सभोवताल सुरक्षा रक्षक येथे तैनात केले आहेत.मॅग्नीजच्या खाणी तुमसर तालुक्यातील चिखला, डोंगरी, बाळापूर व मध्यप्रदेशातील तिरोडी येथे आहेत. येथील मॅग्नीज देशातील इतर भागात दररोज जात आहे. (तालुका प्रतिनिधी)१,२०० कामगारांवर उपासमारया कारखान्यात कायम व कंत्राटी पद्धतीने १२०० कामगार होते. कंपनी व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्याची मागणी शासनाला केली होती. सन २००६ मध्ये ती त्यांना मिळाली. सुमारे ७०० कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. सुमारे ३०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नाही. या कामगारांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. नियमानुसार येथील कामगारांना सेवानिवृत्ती वेतन मिळणे गरजेचे होते. परंतु ते मिळत नाही अशी माहिती आहे. कामगार बेरोजगार झाले ते सध्या मोलमजुरी करीत आहेत. कामगारांची स्थिती येथे अत्यंत दयनीय झाली आहे. परप्रांतीय कामगार येथून आपल्या राज्यात निघून गेले.