शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

युनिव्हर्सल कारखाना बंद

By admin | Updated: December 20, 2014 00:38 IST

तुमसर जवळील मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना मागील १२ वर्षापासून कायम बंद आहे. १,३०० बेरोजगारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम देणाऱ्या ...

तुमसर : तुमसर जवळील मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना मागील १२ वर्षापासून कायम बंद आहे. १,३०० बेरोजगारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम देणाऱ्या या कारखान्याचे सुमारे २०० कोटी रुपये शासनाने वीज बिल माफ केल्याची माहिती आहे. आजतागायत एकाही लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष दिले नाही. तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखान्यावर महावितरणचे सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत होते. या कारखान्याला एनटीपीसी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करीत होते. परंतु केवळ देशातच मॅग्नीज विक्री करणे अशी अट या कारखान्याला होती. कराराचा भंग केल्याचा ठपका या कारखान्यावर ठेवून सवलतीच्या दरातील वीज देणे बंद करून जुने वीज बिल वितरण कंपनीने बाजारभावाप्रमाणे वसुल करण्याचा निर्णय घेतला.कारखाना बंद१९ सप्टेंबर १९९६ ला कारखान्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. नंतर एका करारानंतर ६ फेब्रुवारी १९९९ ला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला. सन २००३ पासून या कारखान्याचा कायम वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तेव्हापासून हा कारखाना आजपर्यंत बंद आहे. अभय योजनेअंतर्गत या कारखान्याचे २०० कोटी रुपये माफ केल्याची माहिती आहे. कारखाना मालकाने केवळ ५० कोटी रुपये येथे भरले.शेतजमीन पडूनकारखान्याकडे सुमारे ३०० एकर शेती सध्या पडून आहे. कवडीमोल किमतीत या जमिनी घेण्यात आल्या होत्या. कारखाना परिसरात आजही कोट्यवधींचा मॅग्नीज पडून आहे. खासगी सुरक्षा रक्षक त्यांनी येथे तैनात केले आहेत. कारखान्यात १० ते १२ कर्मचारी सध्या कार्यरत असून येथील माहिती कंपनी मालकाला ते नियमित देतात. खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना अल्पवेतन येथे दिले जाते अशी माहिती आहे.कारखान्यात जाण्यास मज्जावकारखाना बंद आहे. परंतु कारखान्यात कुणालाच जाण्याची बंदी आहे. प्रवेश करायचा असेल तर मालकाची परवानगी पाहिजे असा आदेश येथील सुरक्षा रक्षक देतात. कारखान्याची स्थितीबद्दल माहिती विचारली असता माहित नाही असे एकच उत्तर येथून मिळते. कारखान्याच्या सभोवताल सुरक्षा रक्षक येथे तैनात केले आहेत.मॅग्नीजच्या खाणी तुमसर तालुक्यातील चिखला, डोंगरी, बाळापूर व मध्यप्रदेशातील तिरोडी येथे आहेत. येथील मॅग्नीज देशातील इतर भागात दररोज जात आहे. (तालुका प्रतिनिधी)१,२०० कामगारांवर उपासमारया कारखान्यात कायम व कंत्राटी पद्धतीने १२०० कामगार होते. कंपनी व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्याची मागणी शासनाला केली होती. सन २००६ मध्ये ती त्यांना मिळाली. सुमारे ७०० कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. सुमारे ३०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नाही. या कामगारांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. नियमानुसार येथील कामगारांना सेवानिवृत्ती वेतन मिळणे गरजेचे होते. परंतु ते मिळत नाही अशी माहिती आहे. कामगार बेरोजगार झाले ते सध्या मोलमजुरी करीत आहेत. कामगारांची स्थिती येथे अत्यंत दयनीय झाली आहे. परप्रांतीय कामगार येथून आपल्या राज्यात निघून गेले.