शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

जिल्ह्याचा विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:57 IST

कुठल्याही विकास कामासाठी निधी आवश्यक आहे. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्याचा विविध समस्यांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत निधीची वानवा असल्याची बाब प्रकर्षाने जाणवली. त्यातही राज्य शासनासह केंद्राचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्याचा विकास रखडला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : आढावा बैठकीनंतर घेतली पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुठल्याही विकास कामासाठी निधी आवश्यक आहे. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्याचा विविध समस्यांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत निधीची वानवा असल्याची बाब प्रकर्षाने जाणवली. त्यातही राज्य शासनासह केंद्राचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्याचा विकास रखडला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्ह्यातील विविध ज्वलंत समस्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर सायंकाळी ४ वाजता विश्रामगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत खा. पटेल बोलत होते.पत्रपरिषदेत बोलताना खा. पटेल म्हणाले की, आघाडीच्या काळात गोसीखुर्द प्रकल्पासाठी बाराशे कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. आज घडीला गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सात हजार ९०० कोटींची गरज आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री असताना या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळवून देवून ९०/१० या प्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली होती. मात्र विद्यमान शासनाने या प्रकल्पाला ६०/४० या प्रमाणात आणून उभे ठेवले आहेत. परिणामी गोसीखुर्द प्रकल्प अधांतरी सापडला आहे. बावनथडी प्रभाव क्षेत्रातील जवळपास १२ गावे अजुनही लाभापासून वंचित आहेत. निधी अभावी सुरेवाडा उपसा सिंचन योजना, भिमलकसा प्रकल्प तथा निम्न चुलबंद योजना रखडली आहे.रस्त्यांच्या स्थितीबाबत बोलताना खा. पटेल म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारी करणाबाबत आढावा बैठकीत अधिकारी लाखनी व साकोली येथील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे, एवढेच सांगितले. अडीच वर्षांपूर्वी भूमिपूजन होवूनही प्रत्यक्षरीत्या कुठले काम होणार आहे याची माहिती प्रशासनाकडे नाही. भंडारा शहरातून बायपास तथा महामार्ग विस्तारिकरणाचे कामही रखडले आहे. त्यावर समाधानकारक उत्तर आढावा बैठकीत मिळाले नाही. जिल्ह्यातील आरोग्यसेवा ढासळली असून रुग्णांना औषधी मिळणेही दुरापास्त झाले आहे. कर्मचाºयांची रिक्त पदे महत्वाचा विषय आहे. घरकुल विषय महत्वाचा असतानाही याबाबत कासवगतीने काम सुरू असल्याने २०२२ ऐवजी सन २०३२ मध्ये नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळणार काय, असा टोलाही खासदार पटेल यांनी यावेळी लगावला. कर्जमाफी, नवोदय विद्यालय, पीकविमा, महिला रुग्णालय यासह अन्य प्रश्नावरही आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र शासनाचेच भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे अधिकारीही समाधानकारक उत्तरे देत नसल्याची बाब खासदार पटेल यांनी बोलून दाखविली.पत्रपरिषदेला खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, अनिल बावनकर, धनंजय दलाल यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.