शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

जिल्ह्याचा विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:57 IST

कुठल्याही विकास कामासाठी निधी आवश्यक आहे. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्याचा विविध समस्यांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत निधीची वानवा असल्याची बाब प्रकर्षाने जाणवली. त्यातही राज्य शासनासह केंद्राचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्याचा विकास रखडला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : आढावा बैठकीनंतर घेतली पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुठल्याही विकास कामासाठी निधी आवश्यक आहे. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्याचा विविध समस्यांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत निधीची वानवा असल्याची बाब प्रकर्षाने जाणवली. त्यातही राज्य शासनासह केंद्राचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्याचा विकास रखडला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्ह्यातील विविध ज्वलंत समस्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर सायंकाळी ४ वाजता विश्रामगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत खा. पटेल बोलत होते.पत्रपरिषदेत बोलताना खा. पटेल म्हणाले की, आघाडीच्या काळात गोसीखुर्द प्रकल्पासाठी बाराशे कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. आज घडीला गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सात हजार ९०० कोटींची गरज आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री असताना या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळवून देवून ९०/१० या प्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली होती. मात्र विद्यमान शासनाने या प्रकल्पाला ६०/४० या प्रमाणात आणून उभे ठेवले आहेत. परिणामी गोसीखुर्द प्रकल्प अधांतरी सापडला आहे. बावनथडी प्रभाव क्षेत्रातील जवळपास १२ गावे अजुनही लाभापासून वंचित आहेत. निधी अभावी सुरेवाडा उपसा सिंचन योजना, भिमलकसा प्रकल्प तथा निम्न चुलबंद योजना रखडली आहे.रस्त्यांच्या स्थितीबाबत बोलताना खा. पटेल म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारी करणाबाबत आढावा बैठकीत अधिकारी लाखनी व साकोली येथील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे, एवढेच सांगितले. अडीच वर्षांपूर्वी भूमिपूजन होवूनही प्रत्यक्षरीत्या कुठले काम होणार आहे याची माहिती प्रशासनाकडे नाही. भंडारा शहरातून बायपास तथा महामार्ग विस्तारिकरणाचे कामही रखडले आहे. त्यावर समाधानकारक उत्तर आढावा बैठकीत मिळाले नाही. जिल्ह्यातील आरोग्यसेवा ढासळली असून रुग्णांना औषधी मिळणेही दुरापास्त झाले आहे. कर्मचाºयांची रिक्त पदे महत्वाचा विषय आहे. घरकुल विषय महत्वाचा असतानाही याबाबत कासवगतीने काम सुरू असल्याने २०२२ ऐवजी सन २०३२ मध्ये नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळणार काय, असा टोलाही खासदार पटेल यांनी यावेळी लगावला. कर्जमाफी, नवोदय विद्यालय, पीकविमा, महिला रुग्णालय यासह अन्य प्रश्नावरही आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र शासनाचेच भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे अधिकारीही समाधानकारक उत्तरे देत नसल्याची बाब खासदार पटेल यांनी बोलून दाखविली.पत्रपरिषदेला खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, अनिल बावनकर, धनंजय दलाल यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.