शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महा ई-सेवा केंद्रचालकांवर येणार बेरोजगारीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:02 IST

सुशिक्षितांना रोजगार मिळावा यासाठी आघाडी सरकारने राज्यात महा-ई-सेवा केंद्र सुरू केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नवीन धोरणाचा युवकांना बसणार फटका

आॅनलाईन लोकमतभंडारा : सुशिक्षितांना रोजगार मिळावा यासाठी आघाडी सरकारने राज्यात महा-ई-सेवा केंद्र सुरू केले. मात्र आता युती शासनाने ग्रामपंचायतमध्ये नागरिकांना दाखले देण्याची सुविधा केल्याने या केंद्र चालकावर बेरोजगाराची कुºहाड कोसळणार आहे. याबाबत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून रविवारला राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याच्या दौºयावर येत असल्याने केंद्र संचालक त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडणार आहे.सन २००२ मध्ये आघाडी सरकारने बेरोजगारांना स्थायी रोजगार देण्याच्या दृष्टीने महा-ई-सेवा केंद्र सुरू केले. याकरिता बेरोजगार युवकांनी लाखो रूपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र आता युती शासनाने महा-ई-सेवा केंद्र बंद करण्याचा घाट रचला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एका संगणक आॅपरेटरची नियुक्ती करून ग्रामस्थांना आवश्यक असलेले सर्व दाखले देण्यात येणार आहे. यामुळे केंद्र संचालकावर आता बेरोजगारी ओढावणार आहे. याबाबत महा-ई-सेवा केंद्र संचालकांनी प्रशासन व राज्य शासनाची मनधरणी सुरू केली असली तरी राज्य शासनाने महा-ई-सेवा केंद्र बंद करण्याचा तुर्तास निर्णय घेतलेला आहे.भंडारा जिल्ह्यात २७० महा-ई-सेवाकेंद्र आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून युवकांनी बेरोजगारीवर मात करीत तीन ते चार अन्य युवकांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या केंद्राच्या माध्यमातून राज्य शासनाला लाखो रूपयांचा महसूलही प्राप्त झालेला आहे. अशा स्थितीत आता राज्य शासनाने घेतलेला निर्णय त्यांच्यावर अन्यायकारक आहे. त्यामुळे या युवकांना बेरोजगार करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. महा-ई-सेवा केंद्र संचालकांचे जिल्हाध्यक्ष संजय मते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. रविवारला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सदर केंद्र संचालक त्यांना भेटून कैफियत मांडणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय मते यांनी दिली आहे.