शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

अनधिकृत फलकांनी कोंडला चौकांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST

या वर्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागायची आहे. त्यापूर्वी शहरात हौसे गौसे नौसेंसह ...

या वर्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागायची आहे. त्यापूर्वी शहरात हौसे गौसे नौसेंसह नेतेमंडळींचे बॅनर शहरात झळकू लागली आहेत. पालिकेने चौकाचौकात लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई नाममात्र आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी फलक दिसून येत आहेत.

या अनधिकृत जाहिरात फलकांच्या विळख्याने वाहतुकीलाही धोका निर्माण झाला आहे. शहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, नागपूर नाका यासह अनेक चौकांमध्ये फलकांची गर्दी वाढली आहे.

प्रमुख चौकांमध्ये तात्पुरते फलक लावण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज असते. त्यासाठी विशेष शुल्क आकारण्यात आले आहे. तरीदेखील नियमांना तिलांजली देत अनेक ठिकाणी अनधिकृत फलके लावली जात आहेत. विविध कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठी आयोजन फलक लावतात. त्यासोबत नेत्यांचे वाढदिवस, निवड, नियुक्ती आदींचे फलकही दररोज झळकत आहेत. फलकांच्या राजकारणात पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या सभा, धार्मिक कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचे प्रमाण वाढले आहे.

बॅनरवर बॅनर लावण्याची चढाओढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांसमोर फलक लावण्याची स्पर्धा असल्याने ही स्थळे फलकांमुळे दिसेनाशी झालेली दिसतात.

फलकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरांचे विद्रूपीकरण झाले आहे. अनधिकृत फलकांवर कारवाईचे आदेश असले तरी नगरपालिका मात्र याकडे कानाडोळा करीत आहे. येत्या काळात फलकांवरून राजकीय वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.