शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘उज्ज्वला’ने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:48 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला खरा. मात्र सिलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही. परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने डोळ्यात पाणी आले आहे.

ठळक मुद्देसिलिंडरने केले हजारी पार : ग्रामीण भागात स्वयंपाक पुन्हा चुलीवरच

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला खरा. मात्र सिलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही. परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने डोळ्यात पाणी आले आहे.चुलीवर स्वयंपाक केल्यास महिलांना श्वसनाचे व डोळ्यांचे आजार जडतात. वायू प्रदूषण होते. त्याच प्रकारे जंगलाची तोड रोखून पर्यावरणाचा समतोल राखता यावे आदी कारणे पुढे करून केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यात गोरगरीब नागरिकांना अनुदानावरच गॅस उपलब्ध करून दिला. ते गॅस कनेक्शन जवळपास मोफतच उपलब्ध होत असल्याने जवळपास सर्वांनीच गॅस सिलेंडर खरेदी केला. त्या माध्यमातून केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात आपुलकीही मिळविली. मात्र वाढत्या गॅस सिलेंडरच्या दरामुळे ग्रामीण जनता मेटाकुटीस आली आहे. हातावर आणून पानावर खाणारे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना एका वेळेस एक हजार रुपये देवून गॅस सिलेंडर खरेदी करणे शक्य नसल्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. परिणामी चुलयुक्त ग्रामीण या शासनाच्या निर्धारावर पूर्णत: पाणी फेरले जात आहे. अन्न वस्त्र निवारा याकडे प्राथमिक गरजा म्हणून पाहिजे जात होते. त्यात आला घरगुती गॅस सिलेंडरची भर पडली आहे. अगदी डोक्यावर गवताचे छप्पर असेल त्याच्याही घरात उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर दिसू लागले होते.ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन योग्य पाऊल उचलून सुरुवातीला वाहवाही लुटली असली तरी भाव वाढ रोखू न शकल्याने ते ग्रामस्थ आता बोटे मोडू लागली आहेत.जीवनमान उंचाविण्याच्या नादात शासनाने गॅस सिलेंडरची खैरात वाटून भाववाढ केल्यामुळे ग्रामीण भागात घरातील एका कोपऱ्यात गॅस सिलेंडर ठेवण्यात येवून चुलीवर स्वयंपाक सुरु झाला आहे. पर्यावरणाची काळजी असल्यास शासनाने यावर त्वरीत उपाययोजना करावी.-ठाकचंद मुंगुसमारे, रायुकाँ तालुकाअध्यक्ष, तुमसर.