शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

‘उज्ज्वला’ने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:48 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला खरा. मात्र सिलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही. परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने डोळ्यात पाणी आले आहे.

ठळक मुद्देसिलिंडरने केले हजारी पार : ग्रामीण भागात स्वयंपाक पुन्हा चुलीवरच

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला खरा. मात्र सिलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही. परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने डोळ्यात पाणी आले आहे.चुलीवर स्वयंपाक केल्यास महिलांना श्वसनाचे व डोळ्यांचे आजार जडतात. वायू प्रदूषण होते. त्याच प्रकारे जंगलाची तोड रोखून पर्यावरणाचा समतोल राखता यावे आदी कारणे पुढे करून केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यात गोरगरीब नागरिकांना अनुदानावरच गॅस उपलब्ध करून दिला. ते गॅस कनेक्शन जवळपास मोफतच उपलब्ध होत असल्याने जवळपास सर्वांनीच गॅस सिलेंडर खरेदी केला. त्या माध्यमातून केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात आपुलकीही मिळविली. मात्र वाढत्या गॅस सिलेंडरच्या दरामुळे ग्रामीण जनता मेटाकुटीस आली आहे. हातावर आणून पानावर खाणारे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना एका वेळेस एक हजार रुपये देवून गॅस सिलेंडर खरेदी करणे शक्य नसल्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. परिणामी चुलयुक्त ग्रामीण या शासनाच्या निर्धारावर पूर्णत: पाणी फेरले जात आहे. अन्न वस्त्र निवारा याकडे प्राथमिक गरजा म्हणून पाहिजे जात होते. त्यात आला घरगुती गॅस सिलेंडरची भर पडली आहे. अगदी डोक्यावर गवताचे छप्पर असेल त्याच्याही घरात उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर दिसू लागले होते.ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन योग्य पाऊल उचलून सुरुवातीला वाहवाही लुटली असली तरी भाव वाढ रोखू न शकल्याने ते ग्रामस्थ आता बोटे मोडू लागली आहेत.जीवनमान उंचाविण्याच्या नादात शासनाने गॅस सिलेंडरची खैरात वाटून भाववाढ केल्यामुळे ग्रामीण भागात घरातील एका कोपऱ्यात गॅस सिलेंडर ठेवण्यात येवून चुलीवर स्वयंपाक सुरु झाला आहे. पर्यावरणाची काळजी असल्यास शासनाने यावर त्वरीत उपाययोजना करावी.-ठाकचंद मुंगुसमारे, रायुकाँ तालुकाअध्यक्ष, तुमसर.