शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘उज्ज्वला’ने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:48 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला खरा. मात्र सिलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही. परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने डोळ्यात पाणी आले आहे.

ठळक मुद्देसिलिंडरने केले हजारी पार : ग्रामीण भागात स्वयंपाक पुन्हा चुलीवरच

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला खरा. मात्र सिलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही. परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने डोळ्यात पाणी आले आहे.चुलीवर स्वयंपाक केल्यास महिलांना श्वसनाचे व डोळ्यांचे आजार जडतात. वायू प्रदूषण होते. त्याच प्रकारे जंगलाची तोड रोखून पर्यावरणाचा समतोल राखता यावे आदी कारणे पुढे करून केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यात गोरगरीब नागरिकांना अनुदानावरच गॅस उपलब्ध करून दिला. ते गॅस कनेक्शन जवळपास मोफतच उपलब्ध होत असल्याने जवळपास सर्वांनीच गॅस सिलेंडर खरेदी केला. त्या माध्यमातून केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात आपुलकीही मिळविली. मात्र वाढत्या गॅस सिलेंडरच्या दरामुळे ग्रामीण जनता मेटाकुटीस आली आहे. हातावर आणून पानावर खाणारे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना एका वेळेस एक हजार रुपये देवून गॅस सिलेंडर खरेदी करणे शक्य नसल्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. परिणामी चुलयुक्त ग्रामीण या शासनाच्या निर्धारावर पूर्णत: पाणी फेरले जात आहे. अन्न वस्त्र निवारा याकडे प्राथमिक गरजा म्हणून पाहिजे जात होते. त्यात आला घरगुती गॅस सिलेंडरची भर पडली आहे. अगदी डोक्यावर गवताचे छप्पर असेल त्याच्याही घरात उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर दिसू लागले होते.ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन योग्य पाऊल उचलून सुरुवातीला वाहवाही लुटली असली तरी भाव वाढ रोखू न शकल्याने ते ग्रामस्थ आता बोटे मोडू लागली आहेत.जीवनमान उंचाविण्याच्या नादात शासनाने गॅस सिलेंडरची खैरात वाटून भाववाढ केल्यामुळे ग्रामीण भागात घरातील एका कोपऱ्यात गॅस सिलेंडर ठेवण्यात येवून चुलीवर स्वयंपाक सुरु झाला आहे. पर्यावरणाची काळजी असल्यास शासनाने यावर त्वरीत उपाययोजना करावी.-ठाकचंद मुंगुसमारे, रायुकाँ तालुकाअध्यक्ष, तुमसर.