शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

तुमसर उपजिल्हा रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:06 IST

तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या १५० ते १६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. मात्र त्यामुळे रुग्णांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसंसर्गजन्य आजार बळावले : १०० खाटांच्या रुग्णालयात १५० वर रुग्ण उपचारासाठी दाखल

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या १५० ते १६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. मात्र त्यामुळे रुग्णांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.तुमसर येथे सुभाष चंद्रबोस उपजिल्हा रुग्णालय आहे. गत आठ-दहा दिवसांपासून या रुग्णालयात रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. वातावरणातील बदल आणि वाढत्या तापमानाने संसर्गजन्य आजार वाढले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या खाटांची क्षमता १०० आहे. मात्र रुग्णालयात १५० ते १६० रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करावे लागत आहे. रुग्णालय प्रशासन कुणाला नाही म्हणून शकत नाही. त्यांचा नाईलाज असल्याने एका खाटेवर दोन रुग्णांची सोय करण्यात आली. परंतु याचा मन:स्ताप रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना होत आहे. तसेच संसर्गजन्य आजार रुग्णालयातही पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.तुमसर येथील रुग्णालयात तुमसर तालुक्यास मध्यप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. सुमारे अडीच लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी सदर रुग्णालय घेत आहे. राज्यस्तरावर या रुग्णालयाला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.जागतिक बँकेच्या सहकार्याने तीन कोटींच्या निधीतून १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले. परंतु वाढती लोकसंख्या आणि आजाराचे वाढते प्रमाण त्यामुळे खाटांची संख्या कमी पडत आहे. अशास्थितीत १५० खाटांचे रुग्णालय करण्याची गरज आहे. परंतु याबाबत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने रुग्णांना मन:स्ताप सहन करावा लागतो.यासंदर्भात रुग्णालयाच्या अधीक्षीका डॉ. कल्पना म्हसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईलवर प्रतिसाद दिला नाही. तर युवक काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे म्हणाले, आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असून उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ किमान ५० खाटा वाढविण्याची गरज आहे. मात्र शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.बाह्यरुग्ण विभागात रांगासध्या तालुक्यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजाराने डोके वर काढले आहे. गावागावातील रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत आहे. त्यामुळे बाह्य रुग्णविभागात रुग्णांची लांब रांग लागलेली दिसून येते. अनेक रुग्ण उपचारासाठी येथे दिवसभर ताटकळत असतात.