शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जंगल सफारीसाठी होणार दोन नवे मार्ग

By admin | Updated: March 26, 2017 00:19 IST

उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी नवे दोन प्रवेशद्वार होणार आहेत.

भुयार व वाहीला प्रवेशद्वार : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढप्रशांत देसाई भंडाराउमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी नवे दोन प्रवेशद्वार होणार आहेत. याबाबत वनविभागाने भुयार व वाही येथून पर्यटकांसाठी प्रवेशद्वार ठेवण्याचे चिन्हांकित केले आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील निसर्ग पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा भंडारा जिल्ह्यातील पवनी जंगलालगत आहेत. पवनी येथील वनक्षेत्र हे प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारित आहे. त्यालगत असलेल्या उमरेड-कऱ्हांडला या महत्त्वाकांक्षी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा लागून आहेत. येथून पाच कि.मी. अंतरावर हे वन्यजीव कोअर एरिया आहे. पवनी तालुक्यात वाघ, बिबट या प्राण्यांसह सांबर, हरिण, रोही व अन्य प्राण्यांचाही अधिवास आहे. यामुळे या क्षेत्रात निसर्ग पर्यटनाला मोठा वाव आहे. उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या पर्यटकांना पवनी येथील बफर क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाचा लाभ घेता यावा यासाठी भुयार व वाही येथे प्रवेशद्वार सुरु करण्याचे संकेत वनविभागाने चिन्हांकित केले आहे. पवनी वनविभागांतर्गत सावरला येथे ग्रामवन समिती तर कन्हाळगाव येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती हे निसर्ग पर्यटन संकुलाची व्यवस्था सांभाळणार आहेत. ४० ते ५० कि.मी.चे हे जंगल सफारी राहणार आहे. या रस्त्याला वनविभागाने चिन्हांकीत करून तसा प्रस्ताव तयार केला आहे. उमरेड - कऱ्हांडलामुळे या वनक्षेत्राचा पर्यटनवाढीसाठी लाभ होणार आहे. येथे राहणार प्रवेशद्वारनागपूर-चंद्रपूर महामार्गावरील पवनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भुयार येथे एक प्रवेशद्वार तर पवनी तालुक्यातील वाही येथे दुसरे प्रवेशद्वार राहणार आहे. चंद्रपूर व उमरेडमार्गे येणाऱ्या पर्यटकांना भुयार प्रवेशद्वारावरून प्रवेश करता येईल. तर भंडारा येथून येणाऱ्या पर्यटकांना वाही प्रवेशद्वारावरून प्रवेश मिळणार आहे. नाईट सफारीचाही मानसपेंच व नागलवाडी या व्याघ्र प्रकल्पात नाईट सफारीचा आनंद पर्यटक घेत आहेत. याच धर्तीवर पवनी येथील निसर्ग पर्यटन रात्रीच्या वेळी बघता यावे, या दृष्टीनेही ‘नाईट सफारी’ सुरु करण्याचा वनविभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने वनविभागाने तयारी चालविली असून येत्या काही दिवसातच पवनी क्षेत्रातील प्रादेशिक वनविभागाचा बफर झोनमध्ये समावेश होणार असून त्याकरिता केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. यानंतर या क्षेत्राचा कायापालट होईल, असा मानस वनविभागाने व्यक्त केला आहे.निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून वनविभागाच्या क्षेत्रातील गावांचा आर्थिक व अन्य साधनसामुग्रीच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी निसर्ग पर्यटन संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. नवीन जंगल सफारीकरीता दोन रस्ते चिन्हांकीत केले आहे. येत्या काही दिवसात ते पर्यटकांसाठी खुले होतील. - उमेश वर्मा,उपवनसंरक्षक, भंडारा