शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख ६५ हजार बालकांचे रूबेला-गोवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:21 IST

गोवर आजाराचे दुरीकरण व रूबेला आजारावर नियंत्रण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीतील दोन लाख ६५ हजार हजार ८५४ बालकांना गोवर-रूबेला लस देण्यात येणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबररोजी होणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षीत असून या मोहिमेत पालक शिक्षक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देशांतनू गोयल : २७ नोव्हेंबरपासून लसीकरण, पाच आठवडे चालणार मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोवर आजाराचे दुरीकरण व रूबेला आजारावर नियंत्रण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीतील दोन लाख ६५ हजार हजार ८५४ बालकांना गोवर-रूबेला लस देण्यात येणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबररोजी होणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षीत असून या मोहिमेत पालक शिक्षक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेचा कालावधी चार ते पाच आठवड्याचा आहे. पहिला व दुसरा आठवडा शैक्षणिक संस्था व शाळा-अंगणवाड्यांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. तिसºया व चवथ्या आठवड्यात आरोग्यसेवा व संस्था आणि इतर बाह्य संपर्क व मोबाईल संस्थांद्वारे तर पाचव्या आठवड्यात गोवर-रूबेला लसीकरणातून सुटलेल्या लाभार्थ्यांसाठी लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे.भंडारा जिल्ह्यात नऊ महिले ते १५ वर्ष वयोगटातील दोन लाख ६५ हजार ८५४ मुला-मुलींना लस देण्यात येणार आहे. ही लस १४२८ शाळा व १४१७ अंगणवाड्यांमधून देण्यात येईल. यासाठी १७७२ लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून विद्यार्थी व पालकांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातून मोहिमेविषयी जनजागृती करण्यात येईल. रूबेलाची लस अत्यंत सुरक्षित असून अपवादात्मकरित्या उद्भवलेल्या प्रसंगासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सुद्धा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. मोहिमेसाठी पुरेशी लस उपलब्ध झाली आहे. पालकांनी घाबरून न जाता आपल्या मुलांना गोवर-रूबेला लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.आरोग्य विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभागांमार्फत ही मोहीम राबविली जाणार आहे. यात इंडियन मेडिकल असोसिएशन, रेडक्रॉस सोसायटी, सेवाभावी संस्था यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे. खाजगी शैक्षणिक संस्था व इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांनी ही मोहिम राबविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, आयएमएचे डॉ. अशोक ब्राम्हणकर, डॉ. मेश्राम, डॉ. माधुरी माथुरकर उपस्थित होते.बोटाला शाई आणि कार्डया मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांना लस दिली जाईल त्यांच्या बोटाला शाई लावण्यात येईल. तसेच लस दिल्याचे कार्ड देण्यात येणार आहे. सोबत प्रत्येक लसीकरण केंद्रावर वैद्यकीय सुरक्षा कीट उपलब्ध असणार आहे. ही मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.