शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मचारणात अस्वलाच्या हल्ल्यात दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:12 IST

प्रात:विधी आटोपून घराकडे परतणाऱ्या दोघांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारणा येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली. यातील एक व्यक्ती पायाने दिव्यांग आहे. दोन्ही जखमींवर पालांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. १७ दिवसात अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने गावकºयात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देगावात दहशत : हल्ल्याची दुसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : प्रात:विधी आटोपून घराकडे परतणाऱ्या दोघांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारणा येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली. यातील एक व्यक्ती पायाने दिव्यांग आहे. दोन्ही जखमींवर पालांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. १७ दिवसात अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने गावकºयात भीतीचे वातावरण पसरले आहे.जनार्दन कवडू कातोरे (५२) रा.मचारणा आणि गिरीधारी जिवतू कुळसंगे रा.तुमसर असे जखमींचे नाव आहे. हे दोघे प्रात:विधीसाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना मागाहून आलेल्या अस्वलाने या दोघांवर अचानक हल्ला केला. यात जनार्दनच्या डाव्या हाताला मोठी दुखापत झाली तर जनार्दन हा एका पायाने दिव्यांग असल्याने त्याला पळताही आले नाही. तोही या हल्ल्यात जखमी झाला. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गिरीधारी कुळसुंगे हा गोसेखुर्द कालव्यावर चौकीदारी काम करतो. या घटनेची माहिती पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली. ठाणेदार अंबादास सुनगार, वनपरिक्षेत्राधिकारी बेलखेडे, हमीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.गत १७ दिवसांतून अस्वलाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. १३ नोव्हेंबरच्या पहाटे एका अस्वलाने हल्ला केला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा या घटनेची पुनरावृती झाली. अस्वल प्रौढ असून तिच्यासोबत दोन पिल्ले आहेत. या प्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी विलास बेलखेडे यांच्याशी संपर्क साधला असता गावकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून सावध राहावे, रात्री बेरात्री बाहेर जाऊ नये, वन्यप्राण्यांना त्रास होईल असे कोणतेही काम करू नये असे सांगितले. गावकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करावे आणि अस्वल व पिलांचा सुरक्षीत ठिकाणी बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच संगीता घोनमोडे यांनी केली.