शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्हा प्रशासनाच्या पत्राचा प्रवास बारा दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST

मोहाडी - उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा कार्यालयातून मोहाडी तहसील कार्यालयात येणाऱ्या एका पत्राचा प्रवास बारा दिवसांचा झाला. ...

मोहाडी - उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा कार्यालयातून मोहाडी तहसील कार्यालयात येणाऱ्या एका पत्राचा प्रवास बारा दिवसांचा झाला. यावरून प्रशासन किती निष्काळजीपणे वागते त्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. एका सेकंदात इकडचे पत्र तिकडे होते, अशी माध्यमे उपलब्ध आहेत. परंतु, अजूनही प्रशासकीय पत्र घेऊन डाकसेवक जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात दररोज येत-जात असतात. त्यामुळे काही महत्वाची पत्रं प्रशासनाच्या आवक-जावक विभागात पडून राहतात, याचा प्रत्यय नुकताच आला. कान्हळगाव (सीरसोली) येथील ग्राम रोजगार सेवकांची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची माहिती भरण्याच्या कामाची संगणक चाचणी घेण्यात यावी, अशी तक्रार शासनाकडे करण्यात आली होती. याबाबतचे विशेष कार्य अधिकारी, रोजगार हमी मंत्री महाराष्ट्र शासनाकडून पृष्ठाकंन पत्र २५ नोव्हेंबर २०२० रोजीचे पत्र उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा यांना मिळाले. त्यांनी विशेष कार्य अधिकारी, रोजगार हमी मंत्र्यांचा संदर्भ देत ३१ डिसेंबर २०२० रोजी मोहाडी तहसील कार्यालयाला पत्र पाठवले. परंतु, ते पत्र तहसील कार्यालय, मोहाडी येथे १२ जानेवारीला आवकमध्ये आले. ते पत्र कान्हळगाव येथील तलाठय़ांना १५ जानेवारी रोजी देण्यात आले. त्यानंतर ते पत्र तक्रारकर्ता शंकर शेंडे यांना देण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी तक्रारी संबंधात ७ जानेवारी २०२०ला जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे तक्रारकर्त्याला दस्तऐवजासह उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, ती तारीख आधीच निघून गेली होती. पत्र मात्र तक्रारकर्त्याला तेरा दिवस उशिरा मिळाले. त्यामुळे संबधित पत्रावर सुनावणी होऊ शकली नाही. आता प्रश्न, पत्र उपजिल्हाधिकारी यांच्याकडून उशिरा पाठविण्यात आले की, मोहाडी तहसीलमध्ये तो पत्र पंधरा दिवस पडून होते, याचा तपास प्रशासनाने केला पाहिजे. तथापि, सहायक जिल्हाधिकारी व परिविक्षाधीन तहसीलदार मीनल करनवाल यांनी हे पत्र १२ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाला प्राप्त झाले तर तलाठय़ांनी १५ जानेवारी रोजी ते पत्र देण्यात आले, असे पत्रावर लिहून स्वाक्षरी केली आहे.