शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

जिल्हा प्रशासनाच्या पत्राचा प्रवास बारा दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST

मोहाडी - उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा कार्यालयातून मोहाडी तहसील कार्यालयात येणाऱ्या एका पत्राचा प्रवास बारा दिवसांचा झाला. ...

मोहाडी - उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा कार्यालयातून मोहाडी तहसील कार्यालयात येणाऱ्या एका पत्राचा प्रवास बारा दिवसांचा झाला. यावरून प्रशासन किती निष्काळजीपणे वागते त्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. एका सेकंदात इकडचे पत्र तिकडे होते, अशी माध्यमे उपलब्ध आहेत. परंतु, अजूनही प्रशासकीय पत्र घेऊन डाकसेवक जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात दररोज येत-जात असतात. त्यामुळे काही महत्वाची पत्रं प्रशासनाच्या आवक-जावक विभागात पडून राहतात, याचा प्रत्यय नुकताच आला. कान्हळगाव (सीरसोली) येथील ग्राम रोजगार सेवकांची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची माहिती भरण्याच्या कामाची संगणक चाचणी घेण्यात यावी, अशी तक्रार शासनाकडे करण्यात आली होती. याबाबतचे विशेष कार्य अधिकारी, रोजगार हमी मंत्री महाराष्ट्र शासनाकडून पृष्ठाकंन पत्र २५ नोव्हेंबर २०२० रोजीचे पत्र उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा यांना मिळाले. त्यांनी विशेष कार्य अधिकारी, रोजगार हमी मंत्र्यांचा संदर्भ देत ३१ डिसेंबर २०२० रोजी मोहाडी तहसील कार्यालयाला पत्र पाठवले. परंतु, ते पत्र तहसील कार्यालय, मोहाडी येथे १२ जानेवारीला आवकमध्ये आले. ते पत्र कान्हळगाव येथील तलाठय़ांना १५ जानेवारी रोजी देण्यात आले. त्यानंतर ते पत्र तक्रारकर्ता शंकर शेंडे यांना देण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी तक्रारी संबंधात ७ जानेवारी २०२०ला जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे तक्रारकर्त्याला दस्तऐवजासह उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, ती तारीख आधीच निघून गेली होती. पत्र मात्र तक्रारकर्त्याला तेरा दिवस उशिरा मिळाले. त्यामुळे संबधित पत्रावर सुनावणी होऊ शकली नाही. आता प्रश्न, पत्र उपजिल्हाधिकारी यांच्याकडून उशिरा पाठविण्यात आले की, मोहाडी तहसीलमध्ये तो पत्र पंधरा दिवस पडून होते, याचा तपास प्रशासनाने केला पाहिजे. तथापि, सहायक जिल्हाधिकारी व परिविक्षाधीन तहसीलदार मीनल करनवाल यांनी हे पत्र १२ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाला प्राप्त झाले तर तलाठय़ांनी १५ जानेवारी रोजी ते पत्र देण्यात आले, असे पत्रावर लिहून स्वाक्षरी केली आहे.