शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप, दहावी‌-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

भंडारा : दहावीच्या निकालानंतर आता बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाचे सूत्र घोषित केल्यानंतर ...

भंडारा : दहावीच्या निकालानंतर आता बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाचे सूत्र घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के यावर आधारित आहे. यात दहावीत ३० टक्के, अकरावीत ३० टक्के व बारावीत ४० टक्के, असे निकालाचे सूत्र आहे. तिन्ही मिळून विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. या निकालाच्या सूत्राने बारावीचे विद्यार्थी चिंता व्यक्त करीत आहेत. दहावीत कमी व त्यानंतर अकरावी व अंतर्गत मूल्यमापनात गुण वाढले असतील, तर त्याचा फटका बसू शकतो. सर्वच विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता सारखी नसते, याचाच फटका गुणवंत विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळेही त्यांची चिंता वाढली आहे.

बॉक्स

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

दहावीत निकाल प्रथम श्रेणीत लागला होता. त्यानंतर मी अभ्यासाला लागलो. इयत्ता अकरावीत चांगले गुण होते. मात्र, आता यावर्षी परीक्षा झाली नाही. बोर्डाने दिलेल्या सूत्रानुसार निकाल लागणार असल्याने थोडीफार चिंता वाटत आहे.

-अनिल गोटेफोडे, विद्यार्थी

आता निकाल कधी लागणार याकडे माझे लक्ष लागले आहे. जे व्हायचे होते, ते झाले. मात्र, आता भविष्यावर लक्ष केंद्रित करून पुढील परीक्षा द्यायच्या आहेत, तरच मी यशस्वी होऊ शकते.

-समीक्षा चौधरी, विद्यार्थिनी

बॉक्स

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार

बारावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने ठरवून दिले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावी ३० आणि बारावीचे ४० टक्के, असे मिळून निकाल घोषित केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अवास्तव चिंता किंवा भीती मनात बाळगू नये.

-केशर बोकडे, प्राचार्य

बारावीचे वर्ष हे टर्निंग पॉइंट म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी आता भवितव्याकडे बघून पुढील परीक्षेची तयारी करायला हवी. गुणांचे गणित बिघडणार काय? अशी भीती बाळगू नये. जे आहे त्याला सामोरे जावे.

-अशोक पारधी, माजी मुख्याध्यापक