शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप, दहावी‌-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

भंडारा : दहावीच्या निकालानंतर आता बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाचे सूत्र घोषित केल्यानंतर ...

भंडारा : दहावीच्या निकालानंतर आता बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाचे सूत्र घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के यावर आधारित आहे. यात दहावीत ३० टक्के, अकरावीत ३० टक्के व बारावीत ४० टक्के, असे निकालाचे सूत्र आहे. तिन्ही मिळून विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. या निकालाच्या सूत्राने बारावीचे विद्यार्थी चिंता व्यक्त करीत आहेत. दहावीत कमी व त्यानंतर अकरावी व अंतर्गत मूल्यमापनात गुण वाढले असतील, तर त्याचा फटका बसू शकतो. सर्वच विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता सारखी नसते, याचाच फटका गुणवंत विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळेही त्यांची चिंता वाढली आहे.

बॉक्स

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

दहावीत निकाल प्रथम श्रेणीत लागला होता. त्यानंतर मी अभ्यासाला लागलो. इयत्ता अकरावीत चांगले गुण होते. मात्र, आता यावर्षी परीक्षा झाली नाही. बोर्डाने दिलेल्या सूत्रानुसार निकाल लागणार असल्याने थोडीफार चिंता वाटत आहे.

-अनिल गोटेफोडे, विद्यार्थी

आता निकाल कधी लागणार याकडे माझे लक्ष लागले आहे. जे व्हायचे होते, ते झाले. मात्र, आता भविष्यावर लक्ष केंद्रित करून पुढील परीक्षा द्यायच्या आहेत, तरच मी यशस्वी होऊ शकते.

-समीक्षा चौधरी, विद्यार्थिनी

बॉक्स

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार

बारावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने ठरवून दिले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावी ३० आणि बारावीचे ४० टक्के, असे मिळून निकाल घोषित केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अवास्तव चिंता किंवा भीती मनात बाळगू नये.

-केशर बोकडे, प्राचार्य

बारावीचे वर्ष हे टर्निंग पॉइंट म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी आता भवितव्याकडे बघून पुढील परीक्षेची तयारी करायला हवी. गुणांचे गणित बिघडणार काय? अशी भीती बाळगू नये. जे आहे त्याला सामोरे जावे.

-अशोक पारधी, माजी मुख्याध्यापक