शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप, दहावी‌-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

भंडारा : दहावीच्या निकालानंतर आता बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाचे सूत्र घोषित केल्यानंतर ...

भंडारा : दहावीच्या निकालानंतर आता बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाचे सूत्र घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के यावर आधारित आहे. यात दहावीत ३० टक्के, अकरावीत ३० टक्के व बारावीत ४० टक्के, असे निकालाचे सूत्र आहे. तिन्ही मिळून विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. या निकालाच्या सूत्राने बारावीचे विद्यार्थी चिंता व्यक्त करीत आहेत. दहावीत कमी व त्यानंतर अकरावी व अंतर्गत मूल्यमापनात गुण वाढले असतील, तर त्याचा फटका बसू शकतो. सर्वच विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता सारखी नसते, याचाच फटका गुणवंत विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळेही त्यांची चिंता वाढली आहे.

बॉक्स

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

दहावीत निकाल प्रथम श्रेणीत लागला होता. त्यानंतर मी अभ्यासाला लागलो. इयत्ता अकरावीत चांगले गुण होते. मात्र, आता यावर्षी परीक्षा झाली नाही. बोर्डाने दिलेल्या सूत्रानुसार निकाल लागणार असल्याने थोडीफार चिंता वाटत आहे.

-अनिल गोटेफोडे, विद्यार्थी

आता निकाल कधी लागणार याकडे माझे लक्ष लागले आहे. जे व्हायचे होते, ते झाले. मात्र, आता भविष्यावर लक्ष केंद्रित करून पुढील परीक्षा द्यायच्या आहेत, तरच मी यशस्वी होऊ शकते.

-समीक्षा चौधरी, विद्यार्थिनी

बॉक्स

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार

बारावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने ठरवून दिले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावी ३० आणि बारावीचे ४० टक्के, असे मिळून निकाल घोषित केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अवास्तव चिंता किंवा भीती मनात बाळगू नये.

-केशर बोकडे, प्राचार्य

बारावीचे वर्ष हे टर्निंग पॉइंट म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी आता भवितव्याकडे बघून पुढील परीक्षेची तयारी करायला हवी. गुणांचे गणित बिघडणार काय? अशी भीती बाळगू नये. जे आहे त्याला सामोरे जावे.

-अशोक पारधी, माजी मुख्याध्यापक