शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

मोहफुलातून कोट्यवधींची उलाढाल; मात्र भंडारा जिल्ह्यात एकही प्रक्रिया उद्योग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 13:33 IST

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा मोहवृक्ष हा कल्पवृक्षच आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल या वृक्षातून होत असते. त्यातील ९० टक्के फुलांचा वापर दारूसाठी होतो. या कल्पवृक्षाला राजाश्रय मिळाल्यास शासनाच्या महसुलात भर पडेलच, शिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होईल.

ठळक मुद्देकल्पवृक्षाला राजाश्रय केव्हा मिळणार, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा मोहवृक्ष हा कल्पवृक्षच आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल या वृक्षातून होत असते. त्यातील ९० टक्के फुलांचा वापर दारूसाठी होतो. या कल्पवृक्षाला राजाश्रय मिळाल्यास शासनाच्या महसुलात भर पडेलच, शिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होईल.दरवर्षी मार्च ते मे या कालावधीत मोहाच्या झाडाला फुले येतात. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यात ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. एका झाडापासून सुमारे ५० किलो फुले मिळतात. ही फुले साधारणत: २० ते २५ रुपये प्रती किलो दराने विकली जातात. एकट्या भंडारा जिल्ह्यात या झाडातून १०० टन फुलांचे उत्पादन होते. २५ रुपये प्रती किलोने हिशोब केला तर हा आकडा कोट्यवधीच्या घरात जातो. इतक्या प्रचंड प्रमाणात मोहफुलांचे उत्पादन होत असले तरी पूर्व विदर्भात त्यावर आधारीत एकही प्रक्रिया उद्योग नाही. राज्यात ऊस, द्राक्षांपासून दारू तयार केली जाते. त्या दारुला शासनाची मान्यता आहे. परंतु, हीच दारू मोहफुलापासून तयार केली तर त्याला शासनाकडून मान्यता मिळत नाही, हा विरोधाभास आहे. ग्रामीण भागात ज्यांच्याकडे उपजिविकेचे कोणतेही साधन नाही ते मोहफुलाच्या दारूचा व्यवसाय करतात. यात प्रामुख्याने महिलांचा समावेश असतो. घरात कर्ता पुरुष नसल्याने नाईलाजाने त्यांना हा व्यवसाय करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. मोहवृक्षांचे संगोपण करण्यासाठी कुठलाही खर्च येत नाही. पावसाळ्याच्या पाण्यावरच ते वर्षभर जगतात. कोणतेही उत्पादन खर्च नसताना हा मोहवृक्ष शासनदरबारी दुर्लक्षितच आहे.लॉकडाऊनमुळे वाढले मोहफुलाचे भावभंडारा जिल्ह्यात मोहफुलांचा वापर मुख्यत्वे दारु काढण्यासाठी केला जातो. साधारणत: २५ रुपये किलोप्रमाणे या फुलांची विक्री होते. परंतु, लॉकडाऊनमुळे देशी विदेशी दारुची विक्री बंद झाल्याने मद्य शौकींनाचा कल मोहफुलाच्या दारुकडे वळला. कधी नव्हे इतकी मोहफुलाच्या दारुची विक्री मागील दीड महिन्यात झाली. त्यामुळेच मोहफुलाचे दरही प्रचंड वाढविण्यात आले. २५ रुपये किलोप्रमाणे मिळणारे मोहफुल आता थेट ५० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. परिणामी, मोहफुलाच्या दारुचेही दर वाढले आहेत.खाद्यान्नातून दारु निर्मितीची गरजदेशात आणखी काही वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा आहे. अनेकदा गोदामांमध्ये अन्न सडत असते. परंतु, त्यावर प्रक्रिया केली जात नाही. विदेशात अन्नधान्यापासून रिफार्इंड दारुची निर्मिती केली जाते. परंतु, भारतात अन्नधान्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असूनही त्याकडे दुर्लक्ष आहे. गत पाच वर्षांपासून अन्नधान्याच्या किंमती स्थिर आहेत. बाजारात उठाव नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीला भाव मिळत नाही. त्यामुळे अन्नधान्यातून दारुची निर्मिती केल्यास शेतकऱ्यांच्या मालाला उठाव येईल व त्यातून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.बेरोजगारांना मिळणार रोजगारभंडारा जिल्ह्यात उद्योगांची वाणवा असल्याने येथे बेरोजगारांची फौज आहे. हाताला काम नसल्याने बहुतांश युवक रेती तस्करी, अवैध दारु आदी कामात गुंतले आहेत. या जिल्ह्यात मोहफुलावर आधारीत उद्योगासाठी पोषक वातावरण असून लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मोहफुलावर उद्योगनिर्मिती झाल्यास बेरोजगारांनाही रोजगार मिळेल.-चंद्रकांत खाडे, जिल्हा पणन अधिकारी भंडारा.

 

 

टॅग्स :agricultureशेती