शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

भूसंपादन केलेल्या जागेवरूनच वळण महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

परसवाडा : तिरोडा नगर परिषदेची स्थापना १९५२मध्ये झाली. येथील मोठी जागा शेती व झुडपी जंगलात मोडते. हळूहळू तिरोडा ...

परसवाडा : तिरोडा नगर परिषदेची स्थापना १९५२मध्ये झाली. येथील मोठी जागा शेती व झुडपी जंगलात मोडते. हळूहळू तिरोडा शहर व तालुका विकसित होत गेले. घरे व लोकसंख्याही वाढत गेली. रस्ते बांधकामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले. मात्र त्यात एक प्रकार असाही आहे की, भूसंपादन होऊन अनेक वर्षे लोटली; पण त्याचा शेतमालकाला शासनाकडून मोबदलासुद्धा मिळाला नाही. तरी अद्याप वाहन वळण महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.

तिरोडा शहरातून दोन महामार्ग जातात. तुमसर-तिरोडा-गोंदिया हा एक महामार्ग तर दुसरा तिरोडा ते खैरलांजी बालाघाट हा आंतरराज्यीय महामार्ग असून, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा आहे. परंतु या दोन्ही महामार्गांना जोडणारा प्रशस्त असा वाहन वळण मार्ग तिरोडा शहरात नाही. त्यामुळे हलके वाहन असो किंवा अजवड वाहने असो, सर्व प्रकारच्या वाहनांना तिरोडा बाजार परिसरातूनच जावे लागते. यासाठी बसस्थानक, युनियन बँक वळण, कन्या शाळा, हुतात्मा स्मारक पोलीस ठाणे, अवंतीबाई चौक ते सरळ रेल्वे चौकी होत खैरलांजी, मध्य प्रदेश असा प्रवास होतो.

युनियन बँक ते अवंतीबाई चौकापर्यंत चार ठिकाणी वाहनाला वळण घ्यावे लागते. शिवाय या परिसरात सर्व व्यापारी लाइन दुकान असल्यामुळे नागरिकांची नेहमी मोठी वर्दळ असते. त्यामुळे दोन महामार्गांना जोडण्यासाठी शहरातून वळणे होत जाणारा हा मार्ग अयोग्य आहे. तसेच दुसरा मार्ग म्हणजे तिरोडा-गोदिया मार्गावरील न्यायालयाच्या समोरून प्रेमबंधन लॉन; पण हाही रस्ता शहराच्या आतून जात असल्यामुळे अवजड वाहतुकीकरिता दोन्ही महामार्गांना जोडण्यासाठी उपयुक्त नाही.

खैरलांजी रोड, महाप्रज्ञा बुद्धविहार ते गोंदिया रोड बायपास रस्ता

यावर उपाययोजना करण्यासाठी तत्कालीन आमदार दिलीप बन्सोड यांच्या कार्यकाळात कार्यवाही करण्यात आली होती. तिरोडा-गोंदिया मार्गावरील चंद्रभागा स्मशान घाटाजवळील रूपाली बार ते तिरोडा-खैरलांजी मार्गावरील महाप्रज्ञा बुद्धविहार या दरम्यान भूमा क्र. १०/अ-२००७-२००८ मौजा खैरबोडी येथील ३०४.९५ हे.आर.मी.जमीन वळण मार्ग बांधकामासाठी संपादित करण्यात आली. कालांतराने सर्व शेतजमीनधारकांना त्यांचा मोबदलासुद्धा मिळाला आहे.

कुणाच्या परवानगीने शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीने मार्किंग केली

अवंतीबाई चौक ते जावेद ट्रेडर्स या दरम्यानच्या रस्त्याचा भाग नगर परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत नाही, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बारापात्रे यांचे म्हणणे असून, यासंदर्भात पुरावेसुद्धा त्यांनी गोळा केले आहेत. शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीने आता जानेवारी २०२१ मध्ये दोन्ही बाजूंनी सहा-सहा मीटरची मार्किंग केली. त्यानुसार अतिक्रमण तोडून रस्ता बांधकाम करण्यात येणार होते. या मार्किंगला व्यापारी संघटनेचे सध्याच्या मुख्याधिकारी यांना विचारणा केली. भूसंपादित जागेतून वळण महामार्ग केल्यास व्यापारी संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा सुनील बारापात्रे व इतर व्यापाऱ्यांनी दिला आहे.