शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विरली येथे गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST

सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणीपुरवठा योजना कार्यरत ...

सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. येथे १ लाख २५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ असून सुमारे पाचशे वैयक्तिक नळजोडण्यांव्दारे गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो.

मात्र , ३-४ दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसाने आणि गोसे खुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचे पाणी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींमध्ये घुसले. या पाणीपुरवठा योजनेवर जलशुद्धिकरण संयंत्र बसविले नसल्याने पुराचे पाणी सरळ नळाद्वारे गावकऱ्यांच्या घागरीमध्ये येत आहे. गावकऱ्यांना या पाण्याचा उपयोग आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी करतानाही शंभरवेळा विचार करावा लागतो. येथे ११ हातपंप आहेत. मात्र , त्यापैकी काही हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे चांगले पाणी येत असलेल्या हातपंपांवर महिलांची बेसुमार गर्दी होत असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांमध्ये भांडणे होत आहेत. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांवर ताटकळत बसावे लागते.

बॉक्स

पावसाळ्यात गढूळ पाण्याची समस्या नित्याचीच

पाणीपुरवठा योजनेवर जलशुद्धिकरण संयंत्र बसविले नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नदीचा जलस्तर वाढताच गावकऱ्यांना गढूळ पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो . मात्र, स्थानिक प्रशासनाने अद्याप कुठल्या एखाद्या योजनेतून जलशुद्धिकरण संयंत्र बसविण्यासाठी हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात आम्हाला शुद्ध पाणी केव्हा मिळणार? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

आरओ प्लँट केवळ शोभेसाठीच ?

२०१७-१८ मध्ये जिल्हा परिषदेकडून येथे १० हजार लिटर क्षमतेचे आरओ प्लँट बसविण्यात आले. ग्रामप्रशासनाने त्यावेळी गावकऱ्यांना पाच रुपयांमध्ये २० लिटर पाणी देण्याची योजना आखली होती. मात्र , किती गावकऱ्यांना या आरओ प्लँटचे पाणी मिळाले? हा संशोधनाचा विषय ठरावा. हे आरओ प्लँट गत वर्षभरापासून नादुरुस्त असून केवळ शोभेची वस्तू ठरले आहे.