शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

तुमसर - तिरोडी आंतरराज्य पॅसेंजर गाडी अद्याप लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर एक्स्प्रेस गाड्या स्पेशल ट्रेन म्हणून सुरू केल्या आहेत. त्यातही आरक्षण व कन्फर्म तिकीट काढूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु लहान रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस व स्पेशल ट्रेनला थांबा नाही. त्यामुळे लहान रेल्वेस्थानकातील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येत नाही. अनलॉक सुरू झाल्यानंतरही लोकल व पॅसेंजर गाड्या रेल्वे प्रशासनाने अद्याप लॉक केल्या आहेत.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या. मात्र, व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली तुमसर - तिरोडी पॅसेंजर गाडी अद्याप बंदच आहे. लहान स्थानकांवरील प्रवाशांची गैरसोय होत असून, बस व इतर वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मध्य प्रदेशातील नागरिकांचा तुमसरसह इतर शहरांशी असलेला संपर्क गत दीड वर्षापासून तुटला आहे.कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर एक्स्प्रेस गाड्या स्पेशल ट्रेन म्हणून सुरू केल्या आहेत. त्यातही आरक्षण व कन्फर्म तिकीट काढूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु लहान रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस व स्पेशल ट्रेनला थांबा नाही. त्यामुळे लहान रेल्वेस्थानकातील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येत नाही. अनलॉक सुरू झाल्यानंतरही लोकल व पॅसेंजर गाड्या रेल्वे प्रशासनाने अद्याप लॉक केल्या आहेत. यासंदर्भात स्थानिक रेल्वे प्रशासनाचे अधिकारी वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले नाहीत, असे सांगत आहेत. बस वाहतूक सुरू झाली आहे. परंतु पॅसेंजर गाड्या का सुरू झाल्या नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.तुमसर - तिरोडी आंतरराज्य प्रवासी गाडी दीड वर्षापासून बंद आहे. या मार्गावर एक्स्प्रेस व स्पेशल गाड्या धावत नाहीत. या मार्गावरील नागरिकांना बसने महागडा प्रवास करावा लागतो. काही नागरिकांना दुचाकीने प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तुमसर ते तिरोडी सुमारे ४५ किलोमीटरचे अंतर आहे. मध्यप्रदेशातील नागरिक तुमसर शहरात भाजीपाला घेऊन येत होते. त्यांना ही गाडी सोयीची ठरली होती. 

इतवारी - दुर्ग पॅसेंजरमध्ये वाढली गर्दी - मुंबई हावडा मार्गावर एक्स्प्रेस व स्पेशल गाड्या सुरू आहेत. इतवारी दुर्ग ही एकमेव पॅसेंजर गाडी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. या गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडाला आहे. मुंबई हावडा रेल्वे मार्गावर लोकल प्रवासी गाड्या सुरू करण्याची गरज आहे. 

आरक्षण व कन्फर्म तिकीट असल्यासच एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करता येतो. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करून या मार्गावर प्रवासी लोकल गाड्या तत्काळ सुरू कराव्यात.-प्रा. कमलाकर निखाडे, महासचिव, जिल्हा काँग्रेस कमिटी

 

टॅग्स :railwayरेल्वे