शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तुमसर एमआयडीसीकडे उद्योजकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:06 IST

केंद्र तथा राज्य शासनाने कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसीला परवानगी दिली. तुमसर येथे ३० वर्षापुर्वी गोंदिया महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. अडीच एकरात असलेल्या या एमआयडीसीत मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहे. मात्र या एमआयडीसीकडे उद्योजकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अनेक भुखंड रिक्त असून काही कारखाने बंद पडले आहेत.

ठळक मुद्देभूखंड रिक्त : सर्व सुविधा उपलब्ध, मात्र बंद पडले कारखाने; लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावाच नाही

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : केंद्र तथा राज्य शासनाने कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसीला परवानगी दिली. तुमसर येथे ३० वर्षापुर्वी गोंदिया महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. अडीच एकरात असलेल्या या एमआयडीसीत मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहे. मात्र या एमआयडीसीकडे उद्योजकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अनेक भुखंड रिक्त असून काही कारखाने बंद पडले आहेत.देव्हाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने अडीच एकर जागेत एमआयडीसी उभारण्यात आली. लहान-मोठ्या कारखानदारांनी भुखंड आरक्षीत करून घेतले. काही कारखाने येथे सुरू झाले तर काही बंद पडले. सध्या येथे चार ते पाच कारखाने सुरू आहेत. रिक्त भुखंडांची संख्याही मोठी आहे. गत काही वर्षापासून बंद पडलेले कारखाने भंगारावस्थेत आहे. येथे वीज, पाणी, रस्ते आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत.भुखंड प्राप्त झाल्यानंतर किमान तीन वर्षात कारखाना सुरू करण्याचा नियम आहे. परंतु येथे वर्षानुवर्ष भुखंड रिक्त आहे. एमआयडीसीत लहान उद्योजकांना प्रथम प्राधान्य देण्यात येते. येथे लहान कारखाने अखेरच्या घटका मोजून बंद पडल्या आहेत. एमआयडीसीचे मुख्य कार्यालय भंडारा येथे आहे. दरवर्षी शासनाला कारखान्यांची स्थिती शासनाला कळवावी लागते. किती कारखाने बंद आहे किती सुरू आहे याची माहिती सादर करण्यात येत आहे. परंतु अद्याप येथे दखल घेण्यात आली नाही. केवळ कागदोपत्री माहिती संकलीत करून शासनाला कळविली जाते.तरूण उद्योजकाला येथे भुखंड मिळत नाही. भुखंड नाही अशी माहिती संबंधित विभाग देत आहे. भुखंड आरक्षीत आहे परंतु कारखान्याचा येथे पत्ता नाही. पुन्हा किती दिवस सदर भुखंड त्या कारखानदाराजवळ राहणार हा मुख्य प्रश्न आहे. एमआयडीसी मध्ये उद्योजकाना आकर्षीत करण्यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांकडून कवडीमोल किंमतीत घेतल्या जमिनीदेव्हाडी येथे आठ ते दहा शेतकऱ्यांकडून सुमारे अडीच हेक्टर शेतजमीन घेण्यात आली. त्यावेळी कवळीमोल किंमत देण्यात आली. एमआयडीसीसाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कारखान्याची संख्या वाढली नाही. औद्योगिक धोरणावर ठपका ठेवण्यात येतो. मुख्य रस्त्यावरील जमीनी लाख मोलाच्या असताना कवळीमोल भावात घेण्यात आल्या होत्या.एमआयडीसीत जीवन प्राधिकरणची इमारतदेव्हाडी एमआयडीसीची जागा मौल्यवान आहे. अनेक वर्ष ती पडित होती. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र व इमारत येथे तयार करण्यात आली आहे. तिही बंद राहते. प्राधीकरणाचे साहित्य येथे पडून आहेत.रिक्त भूखंडाची माहिती मागितलीदेव्हाडी एमआयडीसी येथे बंद पडलेले कारखाने व रिक्त भुखंडांची माहिती राज्य शासनाने मागितल्याची माहिती आहे. भंडारा व गोंदिया येथे एमआयडीसीचे कार्यालय आहे, कारखाने बंद पडल्याची कारणे, कारखाना किती वर्ष सुरू होता, याचा अहवाल मागविला आहे.एमआयडीसी सुरू करताना येथे उद्योग येतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कारखानदार आलेच नाही. त्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. कारखाने बंद पडल्याने बेरोजगारी वाढत आहे.-डॉ. पंकज कारेमोरे,युवा नेते तुमसर.