शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

धान पिकावर तुडतुडा, करपा

By admin | Updated: September 23, 2015 00:50 IST

खरीपाच्या आरंभाला वरूणराजाने उशिरा हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने हलके ...

किडींचा प्रादुर्भाव : पावसाची हजेरी समाधानकारक, अनुदानावर कीटकनाशकांची मागणीपालांदूर : खरीपाच्या आरंभाला वरूणराजाने उशिरा हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने हलके धान अंतिम टप्प्यात असून भारी धान गर्भात आहे. पावसाचे व्यत्यय टळले असून ढगाळ वातावरणाने व उष्णतेने धानावर तुडतुडा, करपा व अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. नियंत्रणाकरीता बळीराजा सरसावला असून महागड्या कीटकनाशकामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. वास्तव परिस्थितीचा अभ्यास पुस्त शासन प्रशासनाने अनुदानावर किटकनाशक उपलब्ध करून देण्याची मागणी कृषि उत्पन्न बाजार समिती लाखनीचे संचालक वसंत शेळके यांनी केली आहे. हातात आलेले धानपिक जाण्याच्या धास्तीने शेतकरी महागड्या किटकनाशकांचा उपयोग करित आहे. मागील वर्षाला पंचायत समिती लाखनी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालय पालांदूर येथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर औषधी पुरविण्यात आली होती. यामुळे महागाईच्या चक्रातून पुरेसा दिलासा मिळाला होता. मागील वर्षी कोरड्या हवामानामुळे किडीचा प्रादूर्भाव अत्यल्प होता, तरीही अनुदानावर किटकनाशक उपलब्ध झाले. यावर्षाला किडीचा जोरदार प्रहार पिकावर असूनही शासन प्रशासन सकारात्मक धोरण न ठेवल्याने बळीराजा पुरता आर्थिक संकटात आला आहे. पाऊस थांबला व ऊन निघाली तर १५ दिवसात जिल्ह्याच्या काही भागात हलक्या धानाची कापणी व मळणीला आरंभ होऊ शकतो. शेतकऱ्यांनी तात्पुरत्या अडचणी करीता धान व्यापाऱ्याला न विकता थोडसा धीर ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीत किंवा हमीभाव केंद्रावरच विकावे असे आवाहन वसंत शेळके यांनी केले आहे.धान पिकाच्या रक्षणाकरीता व अपेक्षित उत्पन्नाकरिता अळीच्या नियंत्रणाकरीता रासायनिक औषधीत ‘लॅम्बडा, क्लोरो, सायफस क्विनालफॉस’ तर तुळतुळ्याच्या चक्रातून मोकळे होण्याकरीता ‘इमिडा, बुप्रोबेंझीन, अंसाटोप’ यासारखी किटकनाशकांचा वापर सुरू आहे. कृषिमंडळ कार्यालयात जैविक किटकनाशकांचा साठा आला असून त्याचा उपयोग अत्यल्प होत असल्याने शासनाचा निधी कंत्राटदाराच्या घशात गेल्याची चर्चा आहे. यावेळी मागील वर्षीचे किटकनाशक मिळाले असते तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. अधिकाऱ्यांनाही वास्तव कळते पण नाईलाजाने विरोध करता येत नाही. आज कित्येक शेतकऱ्यांच्या घरी जैविक औषधे विना वापराने निरूपयोगी आहेत. या वर्षाला करपा, कडाकरपाने अधिकच जोर धरला आहे. तीन वेळा फवारणी करूनही धानपिक बाधित होत आहे. करप्याच्या नियंत्रणाकरीता शेतकरी बुरशीनाक फवारणी करित असल्याचे दृश्य जिल्हाभर दिसतआहे. (वार्ताहर)