शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

महिनाभरात शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:33 IST

महिनाभरात प्रशासकीय मान्यता मिळवून भंडारा येथील नागरिकांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे, ....

पाणी प्रश्नावर चर्चा : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिनाभरात प्रशासकीय मान्यता मिळवून भंडारा येथील नागरिकांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन नगराध्यक्ष सुनिल मेंढे व मुख्याधिकारी अनिल अढागडे यांनी माजी नगरसेवक व भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेप्रसंगी दिले.दूषित पिण्याच्या पाण्याची व पाणी टंचाईची समस्या सोडवून कायमस्वरुपी उपाययोजना करा तसेच नागनदी आणि इकॉर्निया पासून वैनगंगा नदीचे संरक्षण करा, अन्यथा दि.१९ जुलै पासून नगरपरिषदेसमोर भाकपचे नगरसेवक कॉ.हिवराज उके यांच्या नेतृत्वात जनआंदोलन करण्यात येईल असे जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दि.१७ जुलैला हिवराज उके यांना बोलावून चर्चा करण्यात आली. त्या प्रसंगी त्यांना आश्वासन देऊन आंदोलन परत घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे दि. १९ जुलै चे आंदोलन तात्पुरते स्थगीत करण्यात आले. भाकपच्या शिष्टमंडळासोबत सुमारे तासभर विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी १०५ कोटी रुपयांची पाणी पुरवठ्याची नवीन योजना तयार करण्यात आली. त्यात १०० टक्के अनुदान आहे. नगर परीषदेचा १ टक्के १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून भरला जाईल. तसेच येत्या महिनाभरात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यात येईल. तसेच शहरातील काही भागात विशेषत: "स्लम" एरियात ४-५ ठिकाणी असे "प्लांट" लावून शुद्ध पाणी देण्यात येईल असे सांगण्यात आले. दूषित किंवा गढूळ पाणी येत असल्यास पाणी पुरवठा विभागात ८०८७१०७३२३ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी जेणेकरून त्यावर कारवाई करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल, असे तक्रारीसाठी टोल फ्री नंबरची मागणी केल्यानंतर सांगण्यात आले.दिलेल्या आश्वासनानुसार भंडारा शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, नागनदीच्या गटारगंगेपासून व इकॉर्नियापासून संरक्षण करण्यासाठी कारवाई न केल्यास भाकपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे हिवराज उके यांनी सांगितले. चर्चेत नगराध्यक्ष सुनिल मेंढे, मुख्याधिकारी अनिल अढागळे, हिरालाल भेदे, प्रदीप पटेल तसेच शिष्टमंडळात हिवराज उके, सदानंद इलमे, मोहनलाल शिंगाडे, झुलनबाई नंदागवळी, हरिदास जांगडे तसेच प्रभाकर ठवरे व एस.एस. बोरकर यांचा समावेश होता.