शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

लाखनी येथे काँग्रेसच्या वतीने तिरंगा पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

*प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव लालजी मिश्रा यांची उपस्थिती* लाखनी : भंडारा ...

*प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव लालजी मिश्रा यांची उपस्थिती*

लाखनी : भंडारा जिल्हा काँग्रेस सेवादल व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "व्यर्थ न हो बलिदान" महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने घेण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाचा एक भाग म्हणूनच तिरंगा पदयात्रा लाखनी येथे काढण्यात आली. या पदयात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले, भंडाराचे पालकमंत्री विश्वजित कदम, पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार दिलीप बन्सोड, महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाचे प्रभारीलाल मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष हाजी कलाम, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, अरविंद कारेमोरे, शफीभाई लद्धानी, सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास भगत, डॉक्टर सेलचे अध्यक्ष चंद्रकांत निंबार्ते, सविता ब्राम्हणकर, धनंजय तिरपुडे, काँग्रेस पक्षाचे लाखनी तालुका अध्यक्ष राजू निर्वाण, साकोली तालुकाध्यक्ष होमराज पाटील कापगते, लाखांदूर तालुकाध्यक्ष वासुदेव तोंडरे, भंडारा तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, पवनी तालुकाध्यक्ष शंकर तेलमासरे, तुमसर तालुकाध्यक्ष शंकर राऊत, मोहाडी तालुकाध्यक्ष राजेश हटवार, सेवादल शहर अध्यक्ष अनिल बावनकुळे, मार्तण्ड भेंडारकर, सोशल मीडीया विभाग जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघाये, युवक काँग्रेसचे मोहन निर्वाण, योगेश गायधने, महेश वनवे, कैलास लुटे, पिंटू खंडाईत, लालू गायधनी, हरगोविंद भेंडारकर, उत्तम भागडकर, इंटकच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा धनजोडे, जिल्हा काँग्रेसच्या सचिव प्रिया खंडारे, मीनाक्षी बोपचे, छाया पटले आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधी लाईन येथील जुनी बाजार समिती परिसरातून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली तर गांधी विद्यालय लाखनी याठिकाणी या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. समारोपप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी देश उभाण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान असून हे योगदान विसरता येण्यासारखे नाही. ज्या पद्धतीने गेली सात वर्षे देशात विद्यमान केंद्र सरकारचा उपक्रम सगळे काही विकण्याचा सुरू आहे ते बघून अतिशय वाईट वाटते, काँग्रेस पक्षाने या देशात संस्था, कारखाने आणि जनसामान्यांच्या सुविधांसाठी अनेक गोष्टी केल्या असून त्याच गोष्टी विकण्याचा आणि खाजगीकरणाचा सपाटा या केंद्र सरकारने लावला आहे, कठीन परिस्थितीतही काँग्रेस कायम जनतेसोबत सोबत असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस सेवादल प्रभारीलाल मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.

100821\img-20210810-wa0105.jpg

photo