शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महामंडळाची धानखरेदी संशयास्पद

By admin | Updated: September 27, 2014 01:16 IST

महाराष्ट्र शासनाचे आधारभूत धान खरेदी योजनेचे मुख्य एजंट म.रा.आदिवासी विकास महामंडळ नाशिक आहे.

सौंदड : महाराष्ट्र शासनाचे आधारभूत धान खरेदी योजनेचे मुख्य एजंट म.रा.आदिवासी विकास महामंडळ नाशिक आहे. त्यांचे सब एजंट म्हणून जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था काम पाहतात. या संस्थांनी खरेदी केलेल्या खरीप हंगामातील धानाची पावसाळा सुरु होण्याअगोदर उचल करण्याची जबाबदारी आदिवासी महामंडळाची आहे. परंतू धान उचल करण्यासाठी चार महिन्यांचा दीर्घ अवधी मिळत असूनसुद्धा धानाची उचल वेळेवर करण्यात आलेली नाही. यात बराच घोळ असून व्यापाऱ्यांचे हित जोपासले जात असल्याचे दिसून येत आहे.धान खरेदीचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या संस्थांना दिले जाते व धान उचल करण्याची मंजूरी मिळाल्यानंतर आदिवासी विकास महामंडळ हा व्यापाऱ्यांना धान विकते. व्यापारी हा धान वाहतुकीचे दर कमी असल्याचे कारण पुढे करून व परवडत नसल्याचे सांगून हा धान भरडाई करीत नाही. त्याऐवजी मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात वाहतुकीचे दर ४० रुपये असल्याने व्यापारी त्या राज्यातील धान उचलतो. त्यामुळे या आदिवासी महामंडळाचा सन २००८-०९ आणि २०१० या वर्षाचा खरेदी केलेला धान तब्बल तीन वर्षापर्यंत खरेदी केंद्राच्या गोडाऊनमध्ये व काही धान उघड्यावर पडून होता. परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांनी व जनप्रतिनिधींनी व्यापाऱ्यांसोबत वाटाघाटी करुन या धानाचा निपटारा लावण्याची कोणतीही तसदी घेतली नाही. अन्न व नागरी पुरवठामंत्री तसेच गोदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख असताना त्यांनीही आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष व आदिवासी विकासमंत्री मधूकर पिचड यांच्याशी तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याशी बातचित न करता त्याकडे दुर्लक्ष केले. आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे उपाध्यक्ष भात दुधनाग हे गोंदिया जिल्ह्याचे असताना त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे निव्वळ व्यापाऱ्यांच्या कायद्यासाठी हा सन २००८-०९-१० चा खरेदी केलेला धान सोडविला.गोंदिया जिल्हा हा दुर्गम व अतिदुर्गम भागात मोडतो. या जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा व व्यापाऱ्यांकडून एकाधिकार खरेदी म्हणून शासनाने एकाधिकार खरेदी योजनेतून जिल्ह्यातील आदिवासी भागाला वगळण्यात आले. आदिवासी विकास महामंडळातर्फे आदिवासी दुर्गम भागात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत धान खरेदी केला जाते. परंतु या खरेदी विक्री संस्थेपेक्षा येथील व्यापारी ३० ते ५० रुपये जास्त भाव देऊन धान खरेदी करतात. एकाधिकार खरेदी योजना सुरु असताना लिलाव पद्धतीने माल विक्री केला जात होता. तरीही नुकसान होत नव्हते. एकाधिकार योजना या भागात बंद झाल्याने सी.एम.आर. कस्टम मिलींग नुसार १६ मे च्या आधी धान भरडोई होत असे. सन २०१२-१३ मध्ये खरेदी केलेला धान भरडोईसाठी मे, जून, महिन्यामध्ये उचल करण्यात आला होता. परंतु सन २०१३-१४ चा धान अजूनही धान केंद्रावर पडून आहे. जर सन २००९-१० मध्ये ट्रान्सपोर्ट व भरडाईसाठी ६ कोटी रुपयांची तरतुद केली असती तर आज २०१३ पर्यंत आदिवासी विकास मंडळाचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले नसते.