शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

आदिवासी बांधवांचा कुणी वालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:43 IST

बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून बेदखल : आता माघार नाहीच कमकासूरवासीयांचा इशारा

राहूल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे. संपूर्ण आदिवासी बांधवांनी आपल्या गावातून दोन दिवसापुर्वी पलायन केले. परंतू एकही लोकप्रतिनिधी, अधिकाºयाने भेटही दिली नाही. त्यामुळे या आदिवासी बांधवांचा कुणी वाली आहे किवा नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.बावनथडी प्रकल्पबाधित कमकासूर येथील आदिवासी बांधवांना गाळभरणीच्या वेळेस गाव रिकामे करण्यासाठी प्रशासनाने आदिवासी बांधवांवर सक्ती केली होती. त्यामुळे ते भूमिहीन झाले. मात्र पुनर्वसनादरम्यान शेतीवर सोडा साध्या मुलभूत गरजा पुरविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी उपजिविकेचे साधन हिरावल्याल्याने बेरोजगारांची फौज निर्माण झाली. परिणामी उपासमारीचे संकट ओढवले. असे असताना प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही जाग आली नाही. त्यांचे जगणे मुश्किल झाले होते. त्यामुळे आता मरण आले तरी स्वगाव सोडायचे नाही, असा निर्धार करून ५ आॅक्टोबर रोजी आदिवासी बांधवांनी पुनर्वसित गावावरून मुळगावी लेकराबाळासह पलायन केले आहे. त्याठिकाणी वीजेची व्यवस्था नाही. संपूर्ण घरे पडलेले आहे. त्याठिकाणी गवत व पाणी साचलेले आहेत. घनदाट अरण्य असून तिथे रानटी प्राण्यांचा हैदोस आहे. अशा परिस्थितीतही आदिवासी बांधव लेकरबाळ व शेळ्या मेंढ्यासह टेंट उभारून दोन दिवसापासून भयग्रस्त वातावरणात जगत आहेत. प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीला गरज नसल्यामुळे त्यांच्याकडून साधी विचारपुस करण्यात आली नाही.निवडणुकीचे चिन्ह वाटप असल्यामुळे दुसºया दिवसी कमकासूर येथे भेट देऊन आलो. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी उपजिल्हाधिकारी दांडगे यांना आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात पाठविले. या बैठकीमध्ये सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.- गजेंद्र बालपांडे, तहसिलदार तुमसर.आमच्या समस्येचे वास्तविक पाहण्याकरिता अधिकाºयांनी आमच्या मुळ गावी येऊनच चर्चा करावी. आम्ही कुठेही जाणार नाही.-किशोर उईके, सरपंच कमकासूर