शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांचा कुणी वालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:43 IST

बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून बेदखल : आता माघार नाहीच कमकासूरवासीयांचा इशारा

राहूल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे. संपूर्ण आदिवासी बांधवांनी आपल्या गावातून दोन दिवसापुर्वी पलायन केले. परंतू एकही लोकप्रतिनिधी, अधिकाºयाने भेटही दिली नाही. त्यामुळे या आदिवासी बांधवांचा कुणी वाली आहे किवा नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.बावनथडी प्रकल्पबाधित कमकासूर येथील आदिवासी बांधवांना गाळभरणीच्या वेळेस गाव रिकामे करण्यासाठी प्रशासनाने आदिवासी बांधवांवर सक्ती केली होती. त्यामुळे ते भूमिहीन झाले. मात्र पुनर्वसनादरम्यान शेतीवर सोडा साध्या मुलभूत गरजा पुरविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी उपजिविकेचे साधन हिरावल्याल्याने बेरोजगारांची फौज निर्माण झाली. परिणामी उपासमारीचे संकट ओढवले. असे असताना प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही जाग आली नाही. त्यांचे जगणे मुश्किल झाले होते. त्यामुळे आता मरण आले तरी स्वगाव सोडायचे नाही, असा निर्धार करून ५ आॅक्टोबर रोजी आदिवासी बांधवांनी पुनर्वसित गावावरून मुळगावी लेकराबाळासह पलायन केले आहे. त्याठिकाणी वीजेची व्यवस्था नाही. संपूर्ण घरे पडलेले आहे. त्याठिकाणी गवत व पाणी साचलेले आहेत. घनदाट अरण्य असून तिथे रानटी प्राण्यांचा हैदोस आहे. अशा परिस्थितीतही आदिवासी बांधव लेकरबाळ व शेळ्या मेंढ्यासह टेंट उभारून दोन दिवसापासून भयग्रस्त वातावरणात जगत आहेत. प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीला गरज नसल्यामुळे त्यांच्याकडून साधी विचारपुस करण्यात आली नाही.निवडणुकीचे चिन्ह वाटप असल्यामुळे दुसºया दिवसी कमकासूर येथे भेट देऊन आलो. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी उपजिल्हाधिकारी दांडगे यांना आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात पाठविले. या बैठकीमध्ये सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.- गजेंद्र बालपांडे, तहसिलदार तुमसर.आमच्या समस्येचे वास्तविक पाहण्याकरिता अधिकाºयांनी आमच्या मुळ गावी येऊनच चर्चा करावी. आम्ही कुठेही जाणार नाही.-किशोर उईके, सरपंच कमकासूर