शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संवर्धन गरजेचे

By admin | Updated: February 3, 2015 22:51 IST

निसर्गाचे संतुलन राखल्यास वातावरणातील प्रदूषण वाढणार नाही. त्यामुळे मनुष्य आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी वृक्षांच्या संवर्धनाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले.

भंडारा : निसर्गाचे संतुलन राखल्यास वातावरणातील प्रदूषण वाढणार नाही. त्यामुळे मनुष्य आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी वृक्षांच्या संवर्धनाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले. निसर्ग, झाडे व फुलाप्रती आस्था व प्रेमभावना जागृत व्हावी म्हणून ग्रीनहेरीटेज पर्यावरण संस्थेच्या वतीने स्थानिक शितला माता मंदिर सभागृहात पुष्पगुच्छ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते विचार व्यक्त करीत होते. उद्घाटक म्हणून केशवराव निर्वाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राधाकिसान झंवर, ईश्वरलाल काबरा, अ‍ॅड. राकेश सक्सेना, नुतन मोघे, ग्रीनहेरीटेजचे संस्थापक मो. सईद शेख, सनफ्लॅगचे उपमहाव्यवस्थापक के.जी. बांते उपस्थित होते. पाहुण्यांचे वृक्षरोपटे देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक सईद शेख यांनी केले. निर्वाण यांनी उद्घाटन भाषणात भंडारावासीयांसाठी हे उपक्रम एक सुंदर पर्वणी अशा शब्दांत उपक्रमाची स्तूती करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. झँवर यांनी, दुखी जीवन सुखी करण्याकरिता ईश्वराने जसे आपल्याला जीवन जगण्याकरिता वायू, ऊन आणि जल प्रदान केले आहे. तसेच आपण ही निसर्गाकडे जावून आपले जीवन ही सार्थकी करण्याचे आवाहन केले. स्पर्धेत विविध जातीच्या रंगबेरंगी पुष्पांनी सजविलेले आकर्षक पुष्पगुच्छ व कुंड्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.इंदिरा काबरा, अरविंद गुप्ता, सुधाकर चकोले, डवले, संजय बोरकर उपस्थित होते. मंजुषा गायधनी यांनी संचालन तर आभार प्रदर्शन शेख यांनी केले. चंदा मुरकुटे, जयंत धनवलकर, विलास केजरकर, मोहन भाकरे, दिनेश मेश्राम, पद्माकर फडके, नीता मलेवार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)