शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

काटउमरीचे झाड ठरले ‘त्याची’ कर्मभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:42 IST

प्रत्येक माणूस उपजीविकेसाठी कोणते ना कोणते काम करीत असतो. कुणी प्रशिक्षण घेऊन कला अवगत करतात तर कुणी अनुभवाने कला विकसित करतात.

ठळक मुद्देलोकमत प्रेरणादायी प्रवास : हरहुन्नरी कारागीर शासकीय मदतीपासून वंचित

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : प्रत्येक माणूस उपजीविकेसाठी कोणते ना कोणते काम करीत असतो. कुणी प्रशिक्षण घेऊन कला अवगत करतात तर कुणी अनुभवाने कला विकसित करतात. प्रशिक्षण किंवा कोणताही अनुभव नसताना विविध कामात पारंगत असलेले अनेकजण आजही दुर्लक्षित आहेत. पवनी तालुक्यातील खांबाडी (पेंढरी) येथील अमरकंठ खोब्रागडे या हरहुन्नरी कारागिराकडे पाहिल्यानंतर अशा कारागीरांना दाद द्यावीशी वाटते.पवनी तालुक्यातील खांबाडी (पेंढरी) येथील रहिवाशी असलेले ५५ वर्षीय अमरकंठ हे सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेऊन घराबाहेर पडले. इतरांना काम करताना पाहून ते प्रत्येक काम आपल्याला करता यावे, असा प्रयत्न केला. मागील २० ते २५ वर्षात विविध प्रकारची कामे शिकून ते करण्याचा अविरत प्रयत्न सुरु ठेवला. पूर्वी शासकीय कार्यालयात केनद्वारे विणलेल्या खुर्च्या वापरण्यात येत होते. त्यांनी एका महिलेला खुर्चीला केनद्वारे विणताना पाहिले व त्यानंतर स्वत: केनचा वापर करून खुर्च्या विणायला शिकले. सोफा, दिवाण, खाट बनविणे व दुरूस्ती करणे, हार्मोनियम, तबला दुरूस्ती करणे, बांबू कलेद्वारे विविध कलाकुसर करणे, झाडावर बांबूची झोपडी बनविणे, कवेलूचे घर फेरणे, घरातील टाकावू वस्तूपासून शोभेच्या वस्तू बनविणे व ज्यांच्यासाठी त्या बनविलेल्या त्याची मजुरी म्हणून त्यांनी दिलेली रक्कम निमूटपणे घेणे अशी कामे करतात. पवनी-कारधा राज्यमार्गाच्या बाजूला एका झाडाखाली बसून अमरकंठ काम करतात. शासनाच्या एकाही योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही.अमरावती जिल्ह्यातील सावंगपूर येथील अवधूत महाराज यांच्या प्रेरणेमुळे त्याच्या जीवनाविषयीच्या भावना बदलल्या असल्याचे ते सांगतात.भंडारा, नागपूर अशा अनेक ठिकाणी प्लास्टीक, लाकडीकाम कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. परंतु १०-११ वर्षे काम केल्यानंतरही ३०० रूपये प्रती महिन्यापेक्षा जास्त पैसे कधी मिळाली नाही. आर्थिक विवंचनेमुळे पत्नीसोबत पटले नाही. त्यामुळे एक मुलगा व दोन मुलींना सोबत घेऊन ते संसाराचा गाढा ओढत आहेत. परंतु त्यांनी मागे वळून कधी पाहिले नाही. सर्वसाधारण माणसापासून बड्या अधिकाऱ्यापर्यंत कामाच्या पद्धतीमुळे त्यांनी संबंध जोपासले आहेत. परंतु संबंधाचा गैरफायदा घेऊन स्वत:चा फायदा करून घ्यावा, असे त्यांच्या मनाला कधीही शिवले नाही. त्यामुळे पवनी नगरातील १८ वर्षाच्या प्रवासात त्यांचे स्वत:चे घर नाही. स्वत:चे दुकान नाही. निळा झेंडा लावलेले काटउमरीचे झाड हीच त्याची कर्मभूमी ठरली आहे.