शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

हजारो मैलांचा प्रवास करून ‘श्याम कादंब’ भंडाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:32 IST

परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

ठळक मुद्देपरदेशी पाहुणे पक्षी : तलावावरील जलविहार ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.श्याम कादंब हे पक्षी बलूचीस्थान, अझरबैजान, इराण, पाकीस्तान, बांगलादेश आणि पूर्वेकडे असलेल्या चीन सीमेलगतच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडून अन्नाच्या शोधात स्थलांतर करून भारतात येत असतात. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी डेरेदाखल होतात.या पक्ष्यांची चोच गुलाबी रंगाची असून आकाराने हे मोठे असतात. या पक्ष्यांची लांबी ७४ ते ९१ सेंटीमीटरपर्यंत असते. यांचे सरासरी वजन तीन ते साडेतीन किलोपर्यंत असते. जगभरात त्यांचे अस्तित्व युरोप आणि आशियाच्या पर्वतरांगांच्या मध्यंतरी दिसून येते. हे पक्षी उबदार ठिकाणी वास्तव्यासाठी दक्षिणेकडे प्रवास करीत असतात.प्राचीन ग्रीस आणि रोम मध्ये ते प्रेमाची देवी ‘अ‍ॅफ्रोडाईट’ म्हणून संबोधित केले जाते. ‘पट्टकादंब’ (बार हेडेड गुज) आणि इतर परदेशी पक्षी हिवाळ्यात नागपूरसह परिसरात दरवर्षी येत असतात. परंतु मागील तीन वर्षात श्याम कादंब या पक्ष्यांची संख्या ५० पेक्षा जास्त दिसून आली.भंडारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत पहिल्यांदाच या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पक्षी प्रेमी आणि व्यवसायाने दंतरोग चिकित्सक असलेले डॉ.स्वप्नील धारगावे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, हिवाळ्यातील तापमानात दरवर्षी होत जाणाºया वाढीमुळे या पक्ष्यांचे आगमन रोडावले आहे. परंतु असे असतानाही भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने त्यांचे आगमन होणे ही चांगली बाब आहे.दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, पृथ्वीचे वाढते तापमान या दोन गोष्टींमुळे पर्यावरणात असमतोल निर्माण होऊन त्याचा प्रभाव भूमंडलीय वातावरणात होत आहे. परिणामी उष्णता वाढत असल्याने हिमालयावरील बर्फही मोठ्या प्रमाणात वितळत असते. समुद्राची पातळी किंचित का असेना वाढत असली तरी याचा परिणाम पशुपक्ष्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचेच उदाहरण म्हणजे श्याम कादंब होय. वातावरणाच्या शोधात हे पक्षी स्थलांतर होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे जीभेची चोचले पुरविण्यासाठी या पक्ष्यांची शिकारही केली जाते. सदर पक्ष्यांच्या शिकारींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पक्षी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. यावर वनविभागाने दिशानिर्देश देणे गरजेचे आहे.