शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

हजारो मैलांचा प्रवास करून ‘श्याम कादंब’ भंडाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:32 IST

परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

ठळक मुद्देपरदेशी पाहुणे पक्षी : तलावावरील जलविहार ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.श्याम कादंब हे पक्षी बलूचीस्थान, अझरबैजान, इराण, पाकीस्तान, बांगलादेश आणि पूर्वेकडे असलेल्या चीन सीमेलगतच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडून अन्नाच्या शोधात स्थलांतर करून भारतात येत असतात. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी डेरेदाखल होतात.या पक्ष्यांची चोच गुलाबी रंगाची असून आकाराने हे मोठे असतात. या पक्ष्यांची लांबी ७४ ते ९१ सेंटीमीटरपर्यंत असते. यांचे सरासरी वजन तीन ते साडेतीन किलोपर्यंत असते. जगभरात त्यांचे अस्तित्व युरोप आणि आशियाच्या पर्वतरांगांच्या मध्यंतरी दिसून येते. हे पक्षी उबदार ठिकाणी वास्तव्यासाठी दक्षिणेकडे प्रवास करीत असतात.प्राचीन ग्रीस आणि रोम मध्ये ते प्रेमाची देवी ‘अ‍ॅफ्रोडाईट’ म्हणून संबोधित केले जाते. ‘पट्टकादंब’ (बार हेडेड गुज) आणि इतर परदेशी पक्षी हिवाळ्यात नागपूरसह परिसरात दरवर्षी येत असतात. परंतु मागील तीन वर्षात श्याम कादंब या पक्ष्यांची संख्या ५० पेक्षा जास्त दिसून आली.भंडारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत पहिल्यांदाच या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पक्षी प्रेमी आणि व्यवसायाने दंतरोग चिकित्सक असलेले डॉ.स्वप्नील धारगावे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, हिवाळ्यातील तापमानात दरवर्षी होत जाणाºया वाढीमुळे या पक्ष्यांचे आगमन रोडावले आहे. परंतु असे असतानाही भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने त्यांचे आगमन होणे ही चांगली बाब आहे.दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, पृथ्वीचे वाढते तापमान या दोन गोष्टींमुळे पर्यावरणात असमतोल निर्माण होऊन त्याचा प्रभाव भूमंडलीय वातावरणात होत आहे. परिणामी उष्णता वाढत असल्याने हिमालयावरील बर्फही मोठ्या प्रमाणात वितळत असते. समुद्राची पातळी किंचित का असेना वाढत असली तरी याचा परिणाम पशुपक्ष्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचेच उदाहरण म्हणजे श्याम कादंब होय. वातावरणाच्या शोधात हे पक्षी स्थलांतर होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे जीभेची चोचले पुरविण्यासाठी या पक्ष्यांची शिकारही केली जाते. सदर पक्ष्यांच्या शिकारींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पक्षी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. यावर वनविभागाने दिशानिर्देश देणे गरजेचे आहे.