शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

हजारो मैलांचा प्रवास करून ‘श्याम कादंब’ भंडाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:32 IST

परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

ठळक मुद्देपरदेशी पाहुणे पक्षी : तलावावरील जलविहार ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.श्याम कादंब हे पक्षी बलूचीस्थान, अझरबैजान, इराण, पाकीस्तान, बांगलादेश आणि पूर्वेकडे असलेल्या चीन सीमेलगतच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडून अन्नाच्या शोधात स्थलांतर करून भारतात येत असतात. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी डेरेदाखल होतात.या पक्ष्यांची चोच गुलाबी रंगाची असून आकाराने हे मोठे असतात. या पक्ष्यांची लांबी ७४ ते ९१ सेंटीमीटरपर्यंत असते. यांचे सरासरी वजन तीन ते साडेतीन किलोपर्यंत असते. जगभरात त्यांचे अस्तित्व युरोप आणि आशियाच्या पर्वतरांगांच्या मध्यंतरी दिसून येते. हे पक्षी उबदार ठिकाणी वास्तव्यासाठी दक्षिणेकडे प्रवास करीत असतात.प्राचीन ग्रीस आणि रोम मध्ये ते प्रेमाची देवी ‘अ‍ॅफ्रोडाईट’ म्हणून संबोधित केले जाते. ‘पट्टकादंब’ (बार हेडेड गुज) आणि इतर परदेशी पक्षी हिवाळ्यात नागपूरसह परिसरात दरवर्षी येत असतात. परंतु मागील तीन वर्षात श्याम कादंब या पक्ष्यांची संख्या ५० पेक्षा जास्त दिसून आली.भंडारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत पहिल्यांदाच या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पक्षी प्रेमी आणि व्यवसायाने दंतरोग चिकित्सक असलेले डॉ.स्वप्नील धारगावे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, हिवाळ्यातील तापमानात दरवर्षी होत जाणाºया वाढीमुळे या पक्ष्यांचे आगमन रोडावले आहे. परंतु असे असतानाही भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने त्यांचे आगमन होणे ही चांगली बाब आहे.दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, पृथ्वीचे वाढते तापमान या दोन गोष्टींमुळे पर्यावरणात असमतोल निर्माण होऊन त्याचा प्रभाव भूमंडलीय वातावरणात होत आहे. परिणामी उष्णता वाढत असल्याने हिमालयावरील बर्फही मोठ्या प्रमाणात वितळत असते. समुद्राची पातळी किंचित का असेना वाढत असली तरी याचा परिणाम पशुपक्ष्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचेच उदाहरण म्हणजे श्याम कादंब होय. वातावरणाच्या शोधात हे पक्षी स्थलांतर होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे जीभेची चोचले पुरविण्यासाठी या पक्ष्यांची शिकारही केली जाते. सदर पक्ष्यांच्या शिकारींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पक्षी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. यावर वनविभागाने दिशानिर्देश देणे गरजेचे आहे.