शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी प्रवाशांना बसतोय भुर्दंड

By admin | Updated: April 20, 2016 01:00 IST

आधीच कमी होत जाणाऱ्या प्रवाशांवर एसटी सुरक्षा अधिभाराचा भार टाकण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

एसटी महामंडळ : प्रवाशांमध्ये व्यक्त होतेय नाराजीलाखनी : आधीच कमी होत जाणाऱ्या प्रवाशांवर एसटी सुरक्षा अधिभाराचा भार टाकण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून प्रतिप्रवासी एक रूपया दरवाढ करण्यात आली आहे. अपघातग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी हा अधिभार लावण्यात आल्याने प्रवाशांमध्ये मात्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.एसटी अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे तीन लाख रूपये एवढी रक्कम नुकसान भरपाईपोटी दिली जाते. ही रक्कम वाढवून आता १० लाख रूपये करण्याचे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मागील वर्षी दिले होते. त्यानुसार या रकमेत तीन पट वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र आधीच तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाला हा भार झेपणारा नाही. त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना नुकसान भरपाईपोटी देण्यात येणाऱ्या रकमेसाठी प्रवाशांच्या खिशात हात टाकण्यात आला आहे. त्यासाठी प्रतिप्रवासी निकष लावून हा सुरक्षा अधिभार लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. नुकसानभरपाईची वाढीव रक्कम व भरपाईच्या दाव्यासाठी करावी लागणारी न्यायालयीन प्रक्रिया याचा खर्च यातून सहजच निघणार असल्याचे बोलल्या जाते. परंतु एसटीचे प्रवासी भारमान घसरत असताना अशाप्रकारे सुरक्षा अधिभाराच्या नावाखाली प्रवाशांना अधिकचा भुर्दंड दिल्याने एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अधिभारातून अपघात होवू नये, यासाठी काहीच उपाययोजना करण्यात येणार नाही. एसटीच्या चुकीमुुळे होणाऱ्या अपघातांचा भार प्रवाशांवर लादणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)