शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

तरुणाईमुळे गावाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:54 IST

भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देडी. एस. बिसेन : गुंजेपार येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन

आॅनलाईन लोकमतभंडारा : भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे. याकरिता दरवर्षी ग्रामस्तरावर घेण्यात येणारे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर महत्वाचे माध्यम ठरते आहे. महाविद्यालयीन तरुणाईची शक्ती आणि गावकºयांचा सहभाग असेल आपला गाव स्वच्छ सुंदर व निरोगी करता येऊ शकते. असे प्रतिपादन कार्यक्रम व्यवस्थापक डी. एस. बिसेन यांनी केले.स्वामी रामानंद तिर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय मासळच्या पुढाकारातून लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार (किन्ही) येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सरपंच उत्तम भागडकर, काँग्रेसच्या प्रमिला कुटे, काशिनाथ हुमणे, लाखांदूरचे ठाणेदार बन्सोडे, उपसरपंच ब्रम्हदास देशमुख, प्रकाश नाकतोडे, हर्षवर्धन हुमणे, अंकुश गभणे, अजय गजापुरे, राजेश येरणे, नेत्रदिपक बोडखे, नागपुरे, देवानंद कावळे, राजाराम सोनटक्के, कुटे, राजाराम देशमुख, मुकुंदराव देशमुख, नितीन हुमणे, प्रा. मोटघरे, नवनाथ सोनटक्के आदींची उपस्थिती होती.यावेळी हुमणे यांनी, गुंजेपार येथे होवून घातलेल्या मागील वर्षीच्या शिबिराच्या आठवणी सांगून गावात विविध कार्यक्रम व पाणी व स्वच्छतेतून परिवर्तन घडविण्यात येणार असल्याचे सांगितले.सरपंच भागडकर यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून नागरिकांत सामाजिकतेची भावना जागविण्याचे कार्य होत आहे. सर्वंनी घरासमोरील साचलेला कचरा व नालीत थांबलेले पाणी स्वच्छ करण्यासाठी जे नागरिक पुढाकार घेतात, हेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यश असल्याचे भागडकर यांनी सांगितले. गावात विकासाचे परिवर्तन करायचे असेल तर लोकसहभाग आवश्यक आहे. संघटीत झाल्याशिवाय यश मिळणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.प्रमिला कुटे यांनी, एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ, या म्हणीप्रमाणे गावात नागरिकांनी एकमेकाला सहाय्य करून पुढाकार घेतला तर गावाला स्वच्छ व सुंदर करण्यास वेळ लागणार नाही. विविध कार्यात गावात नावलौकीक करता येईले. जसा विद्यार्थी हा शिष्य व शिक्षक हा गुरु असतो त्याचप्रमाणे आईवडीलही गुरु आहेत. मुल आणि आईवडीलात ज्या प्रमाणे मित्रत्वाचे नाते असेल तर तो कुटुंब सुखी व समृद्ध होते. त्याचप्रमाणे गावकरी एकत्र होवून मित्रत्वाप्रमाणे वागले तर गावातील सामाजिक बदल घडविता येईल, असे प्रतिपादन केले.याप्रसंगी ठाणेदार बन्सोडे यांनी, गावात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी सलोख्याचे संबंध निर्माण करावे, व्यसनमुक्त समाज करण्यावर भर देऊन गाव स्वच्छ व सुंदर करण्याचे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थी, महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती.