शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

तरुणाईमुळे गावाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:54 IST

भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देडी. एस. बिसेन : गुंजेपार येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन

आॅनलाईन लोकमतभंडारा : भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे. याकरिता दरवर्षी ग्रामस्तरावर घेण्यात येणारे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर महत्वाचे माध्यम ठरते आहे. महाविद्यालयीन तरुणाईची शक्ती आणि गावकºयांचा सहभाग असेल आपला गाव स्वच्छ सुंदर व निरोगी करता येऊ शकते. असे प्रतिपादन कार्यक्रम व्यवस्थापक डी. एस. बिसेन यांनी केले.स्वामी रामानंद तिर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय मासळच्या पुढाकारातून लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार (किन्ही) येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सरपंच उत्तम भागडकर, काँग्रेसच्या प्रमिला कुटे, काशिनाथ हुमणे, लाखांदूरचे ठाणेदार बन्सोडे, उपसरपंच ब्रम्हदास देशमुख, प्रकाश नाकतोडे, हर्षवर्धन हुमणे, अंकुश गभणे, अजय गजापुरे, राजेश येरणे, नेत्रदिपक बोडखे, नागपुरे, देवानंद कावळे, राजाराम सोनटक्के, कुटे, राजाराम देशमुख, मुकुंदराव देशमुख, नितीन हुमणे, प्रा. मोटघरे, नवनाथ सोनटक्के आदींची उपस्थिती होती.यावेळी हुमणे यांनी, गुंजेपार येथे होवून घातलेल्या मागील वर्षीच्या शिबिराच्या आठवणी सांगून गावात विविध कार्यक्रम व पाणी व स्वच्छतेतून परिवर्तन घडविण्यात येणार असल्याचे सांगितले.सरपंच भागडकर यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून नागरिकांत सामाजिकतेची भावना जागविण्याचे कार्य होत आहे. सर्वंनी घरासमोरील साचलेला कचरा व नालीत थांबलेले पाणी स्वच्छ करण्यासाठी जे नागरिक पुढाकार घेतात, हेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यश असल्याचे भागडकर यांनी सांगितले. गावात विकासाचे परिवर्तन करायचे असेल तर लोकसहभाग आवश्यक आहे. संघटीत झाल्याशिवाय यश मिळणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.प्रमिला कुटे यांनी, एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ, या म्हणीप्रमाणे गावात नागरिकांनी एकमेकाला सहाय्य करून पुढाकार घेतला तर गावाला स्वच्छ व सुंदर करण्यास वेळ लागणार नाही. विविध कार्यात गावात नावलौकीक करता येईले. जसा विद्यार्थी हा शिष्य व शिक्षक हा गुरु असतो त्याचप्रमाणे आईवडीलही गुरु आहेत. मुल आणि आईवडीलात ज्या प्रमाणे मित्रत्वाचे नाते असेल तर तो कुटुंब सुखी व समृद्ध होते. त्याचप्रमाणे गावकरी एकत्र होवून मित्रत्वाप्रमाणे वागले तर गावातील सामाजिक बदल घडविता येईल, असे प्रतिपादन केले.याप्रसंगी ठाणेदार बन्सोडे यांनी, गावात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी सलोख्याचे संबंध निर्माण करावे, व्यसनमुक्त समाज करण्यावर भर देऊन गाव स्वच्छ व सुंदर करण्याचे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थी, महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती.