शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

बुडीत शेतीचे 'सबळीकरण' लाभार्थ्यांना हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : देवसर्रा गावाचे हद्दीत असणाऱ्या तलावातील बुडीत शेतीचे लाभार्थी शेतकºयांना सबळीकरण योजने अंतर्गत हस्तांतरण करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यासाठी २० आॅगस्टला तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय शेतकरी व त्यांचे कुटुंबियांनी घेतला आहे.राज्यातील तत्कालीन आघाडी शासनाचे कार्यकाळात सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण ...

ठळक मुद्दे१२ वर्षांपासून उत्पादन नाही : शेतकऱ्यांवर ५३ हजारांचे थकीत कर्ज, लाभार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : देवसर्रा गावाचे हद्दीत असणाऱ्या तलावातील बुडीत शेतीचे लाभार्थी शेतकºयांना सबळीकरण योजने अंतर्गत हस्तांतरण करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यासाठी २० आॅगस्टला तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय शेतकरी व त्यांचे कुटुंबियांनी घेतला आहे.राज्यातील तत्कालीन आघाडी शासनाचे कार्यकाळात सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजना सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील भूमिहीन नागरिकांना या योजने अंतर्गत उपजावू शेतीचे शासनाचे समाज कल्याण विभागमार्फत हस्तांतरण करण्यात येत आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील देवसर्रा गावाचे हद्दीत गट नं. ३२२ मध्ये विस्तारित तलावाचे क्षेत्र आहे. या तलावात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बुडीत क्षेत्रात आहेत.शेतजमिनीला उपजावू करताना शेतकऱ्यांनी पाण्याचे विसर्ग करताना पक्के रपट्याचे बांधकाम होवू दिले नाही. यामुळे पाण्याचे विसर्ग होताच शेतकरी या शेतीत लागवड करित होते. परंतु नंतर या तलावात जिल्हा परिषदची मालकी निर्माण झाली. पाण्याचे विसर्ग होणारे जागेत पक्का सिमेंट कांक्रीटचे रपटा तयार करण्यात आला आहे.या रपट्याच्या बांधकामामुळे तलाव शेजारी असणारी बहुतांश शेती बुडीत झाली. ही बाब काही शेतकऱ्यांचे लक्षात येताच त्यांनी ही शेती शासनाला विक्री केली. या शेतीचे दस्तऐवजात बुडीत असा उल्लेख नसल्याने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजने करिता ही शेती शासनाने खरेदी केली. परंतु तलावाचे क्षेत्रात असणाºया या शेतीची खरेदी करताना तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली नाही. तलाठीचे दस्तऐवज ग्राह्य धरण्यात आले. शासनाने तलावातील शेती खरेदी केल्यानंतर गावातील अनुसूचित जाती प्रवर्गात असणारे हंसा बागडे, सदाशिव उंदिरवाडे, राजू डोंगरे या भूमिहीन लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान राशीचे आधारे सन २००६ मध्ये प्रत्येकी १ हेक्टर ८३३ आर जागेचे हस्तांतरण केले. अटी व शर्तीचे अधीन राहून या लाभार्थ्यांना शेतीचा ताबा देण्यात आला आहे. समाजकल्याण विभागमार्फत अनुदान राशी जमा करताना हप्ते भरण्याची सोय करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात बुडीत शेतीचे शासनाकडून हस्तांतरण करण्यात आले.या शेतीत सन २००६ पासून उत्पादन घेण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदान राशीचे हप्ते भरले नाही. त्यामुळे शासनाचे फसवणुकीने ही शेतकरी ५३,९९६ रूपयांनीे कर्जबाजारी झाली आहेत. आजपर्यंत कुणाचे कर्ज नसताना या शेतीचे हस्तांतरणाने कर्जबाजारी झाल्याने त्यांना धक्काच बसला आहे. सन २००७ पासून तलावाचे रपट्याचे उंची कमी करण्यासाठी तिन्ही शेतकरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.समाज कल्याण विभागामार्फत शेतीचे हस्तांतरण करताना क्रृर थट्टाच करण्यात आले असल्याचे सांगत आहेत. परंतु गेल्या १२ वर्षापासून न्याय देण्याचे प्रयत्न कोणत्याही विभागाने केले नाही. नावे शेती आहे. कर्जाचा वाढता डोंगर आहे. परंतु ही शेती नावापुरती आहे. यामुळे शासनस्तरावर देण्यात आलेल्या शेतीने विना कर्जात जीवन जगत असताना कर्जाची कैफियत त्यांनी मांडली आहे. राज्य शासन अंतर्गत देण्यात आलेल्या शेतीत उत्पादन घेण्याचा मार्ग मोकडा करण्यासाठी २० आॅगस्टला अन्यायग्रस्त शेतकरी जलसमाधी घेणार आहेत. या आशयाचे निवेदन देण्यात आली आहेत.तलावाचे हद्दीत असणारी शेती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यामुळे त्यांनी बुडीत असल्याने उत्पादन घेतले नाही. तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.-रमेश पारधी, माजी उपाध्यक्ष भंडारा.बुडीत शेती हस्तांतरणामुळे उत्पादन घेतले नाही. यामुळे कर्ज वाढले. रपट्याची उंची कमी करणारे निवेदन दिली. परंतु १२ वर्षापासून कुणी ऐकले नाही. न्यायासाठी जलसमाधी घेणार आहोत.-सदाशिव उंदिरवाडे, अन्यायग्रस्त शेतकरी देवसर्रा.