शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

त्या धोकादायक दोन्ही विद्युत डीपीचे स्थानांतरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST

पवन मस्के यांची मागणी : उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन भंडारा : बेला ते दवडीपार हद्दीतील नाल्यालगत असलेल्या, तसेच पावसाळ्यात पाण्याखाली ...

पवन मस्के यांची मागणी : उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन

भंडारा : बेला ते दवडीपार हद्दीतील नाल्यालगत असलेल्या, तसेच पावसाळ्यात पाण्याखाली येणाऱ्या व शेतकऱ्यांना जीविताला धोका असलेल्या त्या धोकादायक दोन्ही विद्युत डीपीचे दुसऱ्या जागेवर त्वरित स्थानांतरण करावे, अशी मागणी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.

दवडीपार ते बेला रस्त्यावरील दवडीपार गावाच्या हद्दीतील रेल्वे पुलाजवळील नाल्यालगत असलेली विद्युत डीपी ही पावसाळ्यात नेहमीच पाण्याखाली येते. यामुळे ही डीपी शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. बेला ते दवडीपार रस्त्यावरील बेला गावाच्या हद्दीतील जुन्या पुलाजवळील डीपीसुद्धा धोकादायक असून या डीपीच्या बाजूचा खांब व आधारित असलेला खांब पूर्णपणे वाकलेला आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात थोडा जरी पाऊस आला तरी डीपीच्या आजूबाजूला पाणी जमा होते. यामुळे एखादी वेळी जर फ्युज गेला, तर पाण्यात जाण्यास कोणीही धजावत नाही. याबाबत वारंवार मुजबी येथील सहायक अभियंत्याला कळविण्यात आले. त्यांनी या ठिकाणी चौकशीही केली. मात्र, चौकशी करूनही व धोका ओळखूनही अद्यापही त्यांनी डीपीसाठी दुसरी जागा हस्तांतरित केली नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे येथील शेतकरी डीपीसाठी आपली जागा द्यायलाही तयार असताना वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या जीविताशी खेळण्याचा आहे. या डीपीवर अवलंबून असलेला बेला, दवडीपार, पिंडकेपार व कोंरभी येथील तब्बल १५० एकरचा शेतकरी वर्ग विद्युत विभागाच्या कारभारावर संतापला आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने हा शेतकरी खरीप हंगामाला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकलेले असून सद्य:स्थितीत पावसाने दडी मारल्याने आता खरी गरज विद्युतपंपाची असून शेतकऱ्यांना पऱ्हयांना पाणी देण्यासाठी विजेची खरी गरज असते. पिकाला पाणी देण्यासाठी वीज मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या त्या दोन्ही डीपींचे तत्काळ स्थानांतरण करण्याची मागणी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष व भाजपचे सदस्य पवन मस्के यांनी केली आहे.

निवेदन देताना पवन मस्के, अशोक खोब्रागडे, लुकेश जोध, शेतकरी रविशंकर देवडीया, गौरीशंकर देवडीया, मुरलीधर बाभरे, लक्ष्मण बाभरे, नामदेव बांते, कमलबाई बेहरे, बाबूराव तुरस्कर, सीताराम पंचबुद्धे, हरेश्वर तितीरमारे, अनिल बाभरे, प्रमोद बघेले, जयदेव ठवकर, गंगाधर ठवकर, श्रीकृष्ण ठवकर, दादाराम गौरकर आदींसह बेला, दवडीपार, पिंडकेपार व कोरंभी येथील शेतकरी उपस्थित होते.

बाईट

बेला, दवडीपार रस्त्यावरील रेल्वे व जुन्या पुलाजवळील डीपीवर बेला, दवडीपार, पिंडकेपार व कोरंभी येथील दोन्ही डीपींवर जवळपास दीडशे एकरच्यांवर शेतकरी अवलंबून आहेत. या दोन्ही डीपी लवकरात लवकर बदलृून देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच शेतकऱ्यांना शेतात येण्या-जाण्यासाठी जी पांदण आहे त्या पांदण रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

- पवन मस्के, अध्यक्ष, आदर्श युवा मंच, भंडारा.