शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
6
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
7
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
8
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
9
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
10
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
11
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
12
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
13
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
19
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
20
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप

जुन्या पुलावरून वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:59 IST

वैनगंगा नदीवरील ९० वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशारावजा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देइशारावजा फलकाकडे दुर्लक्ष : अपघाताची शक्यता बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीवरील ९० वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशारावजा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र, तरीही याकडे नागरिक दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतूक करतच आहेत.नवीन पुलावरून गेल्यास लांबचे अंतर पार करून जावे लागते. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात याच पुलाचा वापर करत आहेत. वैनगंगा नदीवरील ९० वर्षे जुना इंग्रजकालीन पूल २०१६ मध्ये वाहतुकीसाठी धोकादायक ठरवण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. नागरिकांच्या माहितीसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला ठळक अक्षरात फलक लावले आहेत.हा पूल भंडारा ते पवनी, साकोली या मार्गांना जोडणारा एकमेव पूल होता. पावसाळ्यात बरेचदा अतिवृष्टी झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली येत असे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पूर्णपणे बंद व्हायचा, याला पर्याय म्हणून एक नवीन मोठा पूल तयार करण्यात आला आहे. पूलाच्या निर्मितीनंतरही नवीन आणि जुना दोन्ही पूल वाहतुकीसाठी सुरू होते. मात्र, २०१६ मध्ये या इंग्रजकालीन जुन्या पुलाची तपासणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला.जुन्या पूलावरून सर्वच वाहतूक बंद झाल्याने नवीन पुलावर वाहतुकीचे प्रमाण वाढले. बाहेरगावाहून येणाºया कामगारांना सायकलवरून प्रवास करताना अडचणी निर्माण व्हायला लागल्या. त्यामुळे पादचारी लोकांनाही या वाढलेल्या वाहतुकीचा त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीवरून जुन्या पूलावर पादचारी आणि सायकलने जाणाºया लोकांसाठी एका भागावरून जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला. मात्र, आता या पूलावरून दुचाकी आॅटो रिक्षा यांची ही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी