शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अवैध वाहतुकीचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:13 IST

शहरासह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी धुमाकूळ घातला आहे. लाखनी शहरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्याचा वाहतुकीवर ताण येत असताना आता अवैध प्रवासी वाहतुकीनेही त्यात भर घातली आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : जनता त्रस्त, सर्व्हिस रोडवर गर्दी, अपघाताची कायम भीती

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शहरासह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी धुमाकूळ घातला आहे. लाखनी शहरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्याचा वाहतुकीवर ताण येत असताना आता अवैध प्रवासी वाहतुकीनेही त्यात भर घातली आहे. वाहनांच्या गर्दीने नागरिकांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. यात सर्व प्रकाराचे पोलीस मात्र मुक दर्शक ठरत आहे.जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकदारांनी समांतर यंत्रणा सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावर आणि गावखेड्यापर्यंत अवैध प्रवासी वाहने पोहचत आहे. एसटी भाड्यापेक्षा कमी दरात वाहतूक होत असल्याने आपसुकच नागरिक त्याकडे आकषित होत आहेत. मात्र खुराड्यात कोंबड्या कोंबाव्या तसे प्रवाशांना भरून अवैध प्रवासी वाहतूक नित्याची बाब झाली आहे. काही मार्गावर तर पायदान प्रवास घडविला जातो. हा धोकादायक प्रवास जीव मुठीत घेवून सर्वत्र सुरू आहे.पोलिसांच्या हप्तेखोरीवृत्तीमुळे या वाहतुकीला चांगलेच खतपाणी मिळत आहे. अलिकडे लाखनी शहरात तर ही प्रवासी वाहतूक जीवघेणी ठरत आहे.लाखनी शहरात मुख्य बसस्थानक, बाजार चौक, जयस्तंभ चौक, समर्थनगर येथील तहसील कार्यालयासमोर काळी-पिवळी वाहने उभी असतात. एसटी बसच्या समोर आॅटो-रिक्षा धावत असतात. उभ्या आॅटो-रिक्षामुळे लोकांना त्रास होतो. राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य मार्गावर व सर्व्हिस रोडवर आॅटोरिक्षांचा धुमाकूळ सुरू असतो.बाजार चौकातील वर्दळीच्या ठिकाणी आॅटोरिक्षा उभे असतात. पार्किंगचे ठिकाण नसलेल्या जागेवर वाहन उभे करून प्रवाशांना ओरडून आकर्षित केले जाते. बस चालकांना बस थांबविण्यासाठी जागा नसते. थांब्याच्या पुढे बस उभी राहिली की प्रवाशांना ओझे घेवून बसच्या मागे अक्षर: धावावे लागते. तसहील कार्यालयासमोरच्या बसस्थानकात शाळकरी विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत असतात. त्यांच्या एका बाजूला आॅटोरिक्षा उभे असतात. गांधी विद्यालय ते तहसील कार्यालयपर्यंतचा रस्ता गजबजलेला असतो. त्यातच चारचाकी वाहनेही उभी असतात.शाळकरी मुलींना सर्वाधिक त्रास सोसावा लागतो. अनेकदा याठिकाणी मुलींना त्रास देण्याचे प्रकारही घडतात. परंतु मुली त्याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्यावेळेस याच प्रकारातून अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यातील अवैध प्रवाशी वाहतुकीवर अंकुश आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेवून या वाहतुकदारावर कारवाई करण्याची मागणी लाखनी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.लाखनी पोलिसांची बघ्यांची भूमिकालाखनी शहरात अवैध वाहतुकदारांचा धुडगूस अहोरात्र सुरू असतो. त्याठिकाणी वाहतूक पोलिसही 'ड्युटी' करीत असतात. मात्र कोणत्याही वाहनधारकावर कारवाई केली जात नाही. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात. मात्र बाहेरगावचे वाहन आले की त्याच्यावर कारवाई करून वाहतुकीस अडथडा निर्माण केल्याचे कलम लावून चालकावर कारवाई केली जाते. अनेकदा मद्य प्राशनाचे कलमही लावले जाते. यासर्व प्रकारात पोलीस आणि अवैध प्रवासी वाहतुकदारांचे अर्थपूर्ण संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते.