शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

सानगडीत २०७ वर्षांपासून रथयात्रेची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:29 IST

ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली सानगडी गाव येथे वैकुंठ चतुर्दशीला श्रीपरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रात हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली. २१ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाबरोबर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देऐतिहासिक व पौराणिक महत्त्व : जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविकांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली सानगडी गाव येथे वैकुंठ चतुर्दशीला श्रीपरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रात हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली.२१ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाबरोबर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सानगडी येथील रथयात्रेला विशेष महत्व असून २०७ वर्षापासूनची ही अखंड परंपरा आताही सुरू आहे. दूरवरून ही रथयात्रा बघायला लोक या ठिकाणी आले.श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान सानगडीच्या वतीने निघालेल्या रथयात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २१ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता परम भगवान विठ्ठलाची महापूजा पुरोहित दत्तात्रय गाडे यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे ५ वाजता ध्यान काकड आरती, सायंकाळी ५ वाजता सामुदायीक प्रार्थना, ६ वाजता हरिपाठ २० नोव्हेंबरला ३ वाजता हंडीफोड व म्युजीक बॉल, चमचा गोळी, मेनबत्ती स्पर्धा, लंगडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.२१ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता रथ सजावट, सायंकाळी ६ वाजता तुळशी विवाह व रात्री ८.२० वाजता रथपूजा व रथयात्रेत प्रारंभ करण्यात आले.या यात्रेत भंडारा जिल्हा परिषद सदस्या रेखाताई वासनिक, पंचायत समिती सभापती धनपाल उंदिरवाडे, नवनिर्वाचित सरपंच उषा करपते, सरपंच रेखाताई वंजारी उपस्थित होते. २२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता काल्याचे कीर्तन गणेश नानेलवार यांचे हस्ते पार पडले.यावर्षी रथमहोत्सवामध्ये आकर्षक म्हणून शारीरिक कवायतीचे कार्यक्रम उस्ताद धनराज साखरे, जासवंत डुंडे, समोरा खाँ पठान यांच्या उपस्थितीत पार पडले. धार्मिकत बरोबरच सामाजिक जनजागृतीचा मंगळातर्फे महत्व देण्यात येत असून उपरोक्त आधुनिक युगातही ही रथयात्रा आजही आपले वर्चस्व टिकवून आहे.विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली. प्रत्येकाच्या तोंडी एकच वचन दिसून येत होता तो म्हणजे जाऊ देवाचिमे गावा देव देईल विसावा. देवस्थान कमेटीच्या वतीने गिरीधर नेवारे, राजेश पेशेकर, शिवताप वाघाडे, हरिचंद्र राऊत, हिरामन कोहळे, तसेच भाविक सानगडीवासी यांनी अथक प्रयत्न केले.