शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

सानगडीत २०७ वर्षांपासून रथयात्रेची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:29 IST

ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली सानगडी गाव येथे वैकुंठ चतुर्दशीला श्रीपरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रात हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली. २१ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाबरोबर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देऐतिहासिक व पौराणिक महत्त्व : जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविकांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली सानगडी गाव येथे वैकुंठ चतुर्दशीला श्रीपरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रात हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली.२१ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाबरोबर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सानगडी येथील रथयात्रेला विशेष महत्व असून २०७ वर्षापासूनची ही अखंड परंपरा आताही सुरू आहे. दूरवरून ही रथयात्रा बघायला लोक या ठिकाणी आले.श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान सानगडीच्या वतीने निघालेल्या रथयात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २१ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता परम भगवान विठ्ठलाची महापूजा पुरोहित दत्तात्रय गाडे यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे ५ वाजता ध्यान काकड आरती, सायंकाळी ५ वाजता सामुदायीक प्रार्थना, ६ वाजता हरिपाठ २० नोव्हेंबरला ३ वाजता हंडीफोड व म्युजीक बॉल, चमचा गोळी, मेनबत्ती स्पर्धा, लंगडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.२१ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता रथ सजावट, सायंकाळी ६ वाजता तुळशी विवाह व रात्री ८.२० वाजता रथपूजा व रथयात्रेत प्रारंभ करण्यात आले.या यात्रेत भंडारा जिल्हा परिषद सदस्या रेखाताई वासनिक, पंचायत समिती सभापती धनपाल उंदिरवाडे, नवनिर्वाचित सरपंच उषा करपते, सरपंच रेखाताई वंजारी उपस्थित होते. २२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता काल्याचे कीर्तन गणेश नानेलवार यांचे हस्ते पार पडले.यावर्षी रथमहोत्सवामध्ये आकर्षक म्हणून शारीरिक कवायतीचे कार्यक्रम उस्ताद धनराज साखरे, जासवंत डुंडे, समोरा खाँ पठान यांच्या उपस्थितीत पार पडले. धार्मिकत बरोबरच सामाजिक जनजागृतीचा मंगळातर्फे महत्व देण्यात येत असून उपरोक्त आधुनिक युगातही ही रथयात्रा आजही आपले वर्चस्व टिकवून आहे.विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली. प्रत्येकाच्या तोंडी एकच वचन दिसून येत होता तो म्हणजे जाऊ देवाचिमे गावा देव देईल विसावा. देवस्थान कमेटीच्या वतीने गिरीधर नेवारे, राजेश पेशेकर, शिवताप वाघाडे, हरिचंद्र राऊत, हिरामन कोहळे, तसेच भाविक सानगडीवासी यांनी अथक प्रयत्न केले.