शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

पारंपरिक टोपल्यांना सुगीचे दिवस

By admin | Updated: May 12, 2016 00:49 IST

त्यासाठी एरव्ही विशेष उपयोगात येत नसलेल्या सुपं, टोपल्या, परड्या, डाले आदी वस्तू खरेदीची लगबग सुरू झाल्याने पारंपरिक सुपं टोपल्या आदींना सुगीचे दिवस आले आहे.

उन्हाळ्यातील रोजगार : लग्नसराईत मागणी जास्तभंडारा : त्यासाठी एरव्ही विशेष उपयोगात येत नसलेल्या सुपं, टोपल्या, परड्या, डाले आदी वस्तू खरेदीची लगबग सुरू झाल्याने पारंपरिक सुपं टोपल्या आदींना सुगीचे दिवस आले आहे. उन्हाळ्यात सर्वत्र ग्रामीण आणि शहरी भागात महिलांची उन्हाळ्यासाठी पापड, वड्या आदी पदार्थ बनविण्यासाठी पण यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. हे पदार्थ वाळत घालण्यासाठी सुपं, मोठ्या आकारच्या टोपल्या आदींची गरज भासते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात गहू, तुरी आदी पिके निघाली आहेत. यातील मातीचे खडे एक एक करून निवडून काढणे अनेकदा शक्य नसते. अशावेळी हे धान्य धुण्याशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी मोठ्या आकाराच्या टोपल्या, डाले, परड्या आदींची गरज भासत असते. हे धान्य खूप असल्यास ग्रामीण भागात ते नदीवर धुण्यासाठी नेले जाते. अशावेळी मोठ्या आकाराच्या टोपल्या उपयोगी ठरतात. या सर्व प्रकारांसाठीच सध्या बांबुंच्या टोपल्या, परड्या आदींची गरज भासत असल्याने त्यांची मागणी वाढली आहे. अक्षय्य तृतीयेच्यावेळी सरगुंडे, पापड्या, अशा वस्तू आवर्जून बनविल्या जातात. त्या वाळत घालण्यासाठी अशा प्रकारचे टोपले उपयोगी पडतात. तसेच हे पदार्थ आदल्या रात्री बनविले जातात. पण त्यांना जमिनीवर न ठेवला मोठ्या टोपल्यात कापडाने बांधून त्या वर कुठेतरी अडकवून ठेवल्या जातात. या सर्वांसाठी लाकडी टोपले फार उपयोगी पडतात. त्यासाठीच अशा वस्तूंना सुगीचे दिवस आले आहे. या काळात सुपांची मागणीही वाढते. बाजारात प्लास्टिकचे सूप उपलब्ध असले तरी बांबूच्या सुपालाच आजही पसम्ती दिली जात आहे.(शहर प्रतिनिधी)उन्हातान्हात विक्रीशहरात बसस्थानक परिसरात, तसेच मार्केट परिसरात ऊन्हातान्हात या टोपल्या, डाले, परड्या आदींची विक्री केली जात आहे. यात मोठे डाले १८० ते २०० रुपये जोडी, तर त्यापेक्षा लहान टोपलीवजा डाले ६०, ८०. १०० रुपये याप्रमाणे विक्रीस आहेत. याच काळात अशा टोपल्या आणि इतर साहित्याला मागणी असते. तसेच उन्हाळ्यातच बांबू वाळलेला असल्याचे त्याचा दर्जा चांगला असतो.देवाच्या परडीची मागणी वाढलीजिल्ह्यात सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. ग्रामीण भागात देवाच्या परडीला अशा वेळी वेगळे महत्त्व असते. परडीत देव ठेवून त्याची पूजा केली जाते. लग्नसराईमुळे अशा परडींच्या मागणीत वाढ झाली आहे. यातही वेगवेगळ्या आकाराच्या परड्या उपलब्ध आहेत. लग्नघरी छोट्या आकाराच्या टोपल्याही अशावेळी महत्त्वाच्या असतात. त्या बनविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याचे विक्रेते सांगतात.