शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी पारंपरिक कलाकौशल्यांना वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:52 IST

रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठ्या उद्योगधंद्यांच्या मागे न लागता देशातील लोप पावत चाललेल्या पारंपरिक कला कौशल्यांना वाव दिल्यास रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारीवर आळा बसविता येऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : भद्रावती येथे कुंभार कारागीर व मधुमक्षिका पालक मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिमार्णी (भद्रावती) : रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठ्या उद्योगधंद्यांच्या मागे न लागता देशातील लोप पावत चाललेल्या पारंपरिक कला कौशल्यांना वाव दिल्यास रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारीवर आळा बसविता येऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.स्थानिक ग्रामोद्योग संघाच्या सभागृहात आयोजित कुंभार कारागीर व मधुमक्षिका पालक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष जितेंद्रकुमार चौधरी होते. मंचावर सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे, चंद्रकांत गुंडावार, डॉ. अनिल बुजोणे, ओम मांडवकर, विजय राऊत, अशोक हजारे, प्रवीण सातपुते, नरेंद्र जीवतोडे तथा अन्य मान्यवर उपस्थित होते. कुंभार कारागीरांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी ना. अहीर यांनी दिले. यासाठी गरजुंनी भद्रावती येथील ग्रामोद्योग संघाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी पिरली येथे लवकरच शेतकरी बांधवांसाठी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पिरली येथील कोलते नामक शेतकºयाने आपण मधुमक्षिका पालनातून कशी प्रगती केली, हे भाषणात सांगितले. यावेळी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना शासकीय अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्या.यावेळी टेक महिंद्रा कंपनीतर्फे प्रशिक्षण घेऊन नोकरी लागलेल्या २५ तरूण-तरूणींचा गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करू इच्छिणाºयांची नोंदणी करून त्यांना प्रशिक्षण घेणाºयांना मधुमक्षिका पालनाच्या पेट्या मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कुंभार कारागीरांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ग्रामोद्योग संघाकडे देण्यात आली आहे. प्रास्ताविक जितेंद्रकुमार, संचालन राहुल बनकर, आभार विजय श्रीवास्तव यांनी मानले. या मेळाव्यात जिल्ह्यातील दहा तालुक्यातील शेतकरी व कुंभार कारागीर उपस्थित होते.