शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड

By admin | Updated: November 1, 2014 22:48 IST

सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी सुरू आहे. १५ दिवसांनी जड धानही कापणीला येणार आहे. त्यामुळे धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी डोक्यावरच्या कर्जफेडीसाठी धान

भंडारा : सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी सुरू आहे. १५ दिवसांनी जड धानही कापणीला येणार आहे. त्यामुळे धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी डोक्यावरच्या कर्जफेडीसाठी धान विक्रीला काढावे आणि दलालांनी आपली टोपी सावरावी, अशी स्थिती नेहमीच बघायला मिळते. त्यामुळे नुकत्याच धानाच्या खरेदीसाठी व्यापारी टपून बसले आहेत.यावर्षी नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांनी चांगलीच फजिती केली. धान नर्सरीच्या पेरणीपासून तर कापणीपर्यंत शेतकऱ्यांचे आर्थिक पात्र रिकामे झाले असले; तरी आत्मविश्वासाने परिस्थितीशी सामना केला आहे. परंतु, आता मात्र, धानाच्या विक्रीसाठी दलालाच्या दावणीला धानाची गाठोडी बांधण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांचाही धुमाकूळ सुरू झाला आहे. यावर्षी धानाला योग्य भाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. धानाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. व्यापाऱ्यांच्या आणि दलालांच्या बळजबरीने शेतकऱ्यांचे नुकसान होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांनी जीवाचे रान करू न धानाची लागवड केली. काहींना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे परिणामी खर्च आर्थिक बळ पुन्हा मिळावे यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरु आहे. अधिक प्रमाणात धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे दलालांच्या फेरफटका सुरू झाल्या आहेत. यामुळे धान खरेदीसाठी व्यावसायिक वर्गाचे लक्ष लागले आहे. धानाची मळणी होताच व्यापारी धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना निरोप देत आहेत. यावर्षी धानविक्री सोबतच खरेदी मोठया प्रमाणात होणार असल्याचे दिसून येत आहे. काहींनी फायदा तर काहींना तोटा अशी परिस्थिती यावर्षी शेतकऱ्यांच्या वाट्याला येणार आहे. त्यातही काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे धानावर अयोग्य परिणाम होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी पुन्हा नैसर्गिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतावरच्या फेऱ्या वाढत्या असून, त्याच्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. अकाली पावसाने हजेरी लावल्याने धानपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यावर्षी चांगलीच कंबर कसावी लागल्याने आर्थिक बोाजही सहन करावा लागला आहे. मात्र, कर्जफेडीसाठी धानविक्री महत्वाची असून योग्य भावाची आशा शेतकऱ्यांची पदरात आली आहे. (नगर प्रतिनिधी)