शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वेतन करारासाठी कामगार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:52 IST

मार्च २०१७ मध्ये सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी आणि कामगार संघटना यांच्यातील डिमांड करार संपला. दर तीन वर्षांनी कंपनी व्यवस्थापन कामगाराच्या डिमांड करारानुसार वेतनात वाढ करण्यासाठी करार करते.

ठळक मुद्देमार्च २०१७ मध्ये सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी आणि कामगार संघटना यांच्यातील डिमांड करार संपला.

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मार्च २०१७ मध्ये सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनी आणि कामगार संघटना यांच्यातील डिमांड करार संपला. दर तीन वर्षांनी कंपनी व्यवस्थापन कामगाराच्या डिमांड करारानुसार वेतनात वाढ करण्यासाठी करार करते. सहा महिने होऊनही करार करण्यास टाळाटाळ होत असून दिवाळी तोंडावर आल्यावरही बोनस बाबतीत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. वारंवार मागणी करूनही कंपनी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्यामुळे सनफ्लॅग आयर्न अँड स्टील मजदूर सभेने आक्रमक पवित्रा घेतला असून वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत सध्या स्थित ५७८ स्थायी कामगार आहेत. कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यात डिमांड करीत तीन वर्षांपूर्वी झालेला करार ३१ मार्च रोजी संपुष्टात आला. नियमानुसार करार संपुष्टात येण्यापूर्वी संघटना आणि व्यवस्थापन यांनी कराराच्या अटी बाबत कारवाही करणे आवश्यक आहे. याबाबत संघटनेने सनफ्लॅग व्यवस्थापनाला अनेकदा सूचना केल्या. पण याबाबद कंपनी व्यवस्थापनाचे वेळकाढूपणा केला. वारंवार मागणी करूनही चर्चा झाली नाही. दिवाळी तोंडावर असतानाही बोनसबाबत निर्णय अजून होणे बाकी आहे. कामगार संघटना यांनी डिमांड करारासाठी पूर्वरत प्रचलित पद्धत किंवा कंपनीच्या नफ्यानुसार वेतन वाढ कारण्याची मागणी सनफ्लॅग व्यवस्थापन यांच्याकडे केली आहे. गट वर्षात सनफ्लॅग कंपनीला ६५ कोटींचा नफा झाला.सनफ्लॅग कंपनीला हा नफा कंपनीवर असलेला कर्ज फेडून झाला असल्यामुळे कंपनीची आर्थिक बाजू भक्कम आहे. त्यामुळे कंपनीने कामगाराच्या डिमांड त्वरित मंजूर करून दिवाळी पूर्वी बोनस जाहीर करण्याची मागणी केली आहे. डिमांड व बोनस मागणीचा निर्णय लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी कामगार संघटनेने दिली आहे. यावेळी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विजय बांडेबुचे, महासचिव मिलिंद वासनिक किशोर मारवाडे, विजेंद्र नेमा, विकास फुके, अमोद डाकरे, विकास बांते, रवींद्र बोरकर, ज्ञानेश्वर वंजारी, शिवकुमार सार्वे , शैलेंद्र दुबे, सारंग व्यवहारे, प्रदीप नागपुरे, जावेद , डी एन यादव, संदेश गणवीर, प्रकाश बलभद्रे व महेश बर्वेकर उपस्थित होते.