शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

विषमुक्त शेती-जहरमुक्त अन्नासाठी गोपालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:24 IST

गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच्या नावावर हिंदू आणि मुस्लीम वाद करून देशामध्ये द्वेष आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देमोहम्मद फैज खान : लेह येथून जून २०१७ ला सुरू झाली पदयात्रा, १२ राज्यातून भंडाऱ्यात आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच्या नावावर हिंदू आणि मुस्लीम वाद करून देशामध्ये द्वेष आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. परंतु उच्चस्तरावर मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. या कंपण्यांच्या मालकांना आपला उद्योग निश्चिंतपणे करता यावा यासाठी देशात हिंदू व मुस्लीम समाजात तेढ निर्माण करून आपला उद्देश साध्य करीत असल्याचा घणाघाती आरोप गोसेवा सद्भावना पदयात्रेसाठी निघालेले मोहम्मद फैज खान यांनी केला आहे.गोसेवा सद्भावना पदयात्रेसाठी फैज खान यांनी २४ जून २०१७ पासून लेह (लद्दाख) येथून पदयात्रेला सुरूवात केली आहे. ही पदयात्रा १२ हजार किमीची आहे.यावेळी ते म्हणाले, देशातील जमीन सुपीक करायची असेल तर देशी गोवंश आणि तिचे शेण व गोमुत्राशिवाय पर्याय नाही. नाहीतर युरीया व रासायनिक खताने धरतीमाता मृत पावेल. विषारी अन्न आपल्या पोटात जात आहे. यामुळे आजाराला आमंत्रण मिळत आहे. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाबाने लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोपालन करणार नाही आणि गोहत्या करणार तर विषारी अन्न मुस्लीम, बौध्द, हिंदु, पंजाबी, सर्व धर्मीय लोक खातील व आजारी पडतील. परिणामी देशाचे नुकसान होईल. त्यामुळे देशी गौवंश पाळणे हाच त्यावर एकमेव पर्याय राहणार आहे.मोहम्मद फैज खान हे लेह येथून २४ जून २०१७ ला निघाले आहेत. आतापर्यंत १२ राज्यातून प्रवास करीत ते रविवारला लाखनीमार्गे भंडाºयात आले. त्यांचे त्रिमूर्ती चौकात नगराध्यक्ष सुनिल मेंढे, प्रगतशील शेतकरी संजय एकापुरे, उद्योजक मयुर बिसेन, शैलेंद्र निकासक, नगरसेवक मंगेश वंजारी, युनिटी फॉर आॅलचे संयोजक सरफराज खान यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर त्यांच्या प्रबोधन कार्यक्रमाला शहरातील हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.संजय एकापुरे यांनी विषमुक्त शेती करण्यासाठी देशी गौवंश पाळण्याशिवाय पर्याय नाही. विषमुक्त शेती जहरमुक्त अन्न तयार करण्यासाठी देशी गोवंश पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले.सद्भावना पदयात्रेचा उद्देशदेशी गोवंशाची सेवा, संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करणे, देशी गोवंशावर आधारित शेतीला प्रोत्साहित करणे, देशी गोवंशाचे पर्यावरण, समाज, आरोग्य व प्रकृतीमध्ये असलेले महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहचविणे, गोहत्यावर पूर्ण प्रतिबंध लावण्यावर कायदा करण्यासाठी लोकप्रतिनिधींना जागृत करणे, नदींचे संरक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता व स्त्री भ्रुणहत्या याबाबत जनजागृती करणे, अखंड भारत निर्माण करणे आणि पुन्हा भारताचे प्राचीन वैभव स्थापित करुन भारताला विश्वगुरुचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपली ही पदयात्रा असल्याचे मोहम्मद फैज खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.