शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

विषमुक्त शेती-जहरमुक्त अन्नासाठी गोपालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:24 IST

गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच्या नावावर हिंदू आणि मुस्लीम वाद करून देशामध्ये द्वेष आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देमोहम्मद फैज खान : लेह येथून जून २०१७ ला सुरू झाली पदयात्रा, १२ राज्यातून भंडाऱ्यात आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच्या नावावर हिंदू आणि मुस्लीम वाद करून देशामध्ये द्वेष आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. परंतु उच्चस्तरावर मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. या कंपण्यांच्या मालकांना आपला उद्योग निश्चिंतपणे करता यावा यासाठी देशात हिंदू व मुस्लीम समाजात तेढ निर्माण करून आपला उद्देश साध्य करीत असल्याचा घणाघाती आरोप गोसेवा सद्भावना पदयात्रेसाठी निघालेले मोहम्मद फैज खान यांनी केला आहे.गोसेवा सद्भावना पदयात्रेसाठी फैज खान यांनी २४ जून २०१७ पासून लेह (लद्दाख) येथून पदयात्रेला सुरूवात केली आहे. ही पदयात्रा १२ हजार किमीची आहे.यावेळी ते म्हणाले, देशातील जमीन सुपीक करायची असेल तर देशी गोवंश आणि तिचे शेण व गोमुत्राशिवाय पर्याय नाही. नाहीतर युरीया व रासायनिक खताने धरतीमाता मृत पावेल. विषारी अन्न आपल्या पोटात जात आहे. यामुळे आजाराला आमंत्रण मिळत आहे. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाबाने लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोपालन करणार नाही आणि गोहत्या करणार तर विषारी अन्न मुस्लीम, बौध्द, हिंदु, पंजाबी, सर्व धर्मीय लोक खातील व आजारी पडतील. परिणामी देशाचे नुकसान होईल. त्यामुळे देशी गौवंश पाळणे हाच त्यावर एकमेव पर्याय राहणार आहे.मोहम्मद फैज खान हे लेह येथून २४ जून २०१७ ला निघाले आहेत. आतापर्यंत १२ राज्यातून प्रवास करीत ते रविवारला लाखनीमार्गे भंडाºयात आले. त्यांचे त्रिमूर्ती चौकात नगराध्यक्ष सुनिल मेंढे, प्रगतशील शेतकरी संजय एकापुरे, उद्योजक मयुर बिसेन, शैलेंद्र निकासक, नगरसेवक मंगेश वंजारी, युनिटी फॉर आॅलचे संयोजक सरफराज खान यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर त्यांच्या प्रबोधन कार्यक्रमाला शहरातील हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.संजय एकापुरे यांनी विषमुक्त शेती करण्यासाठी देशी गौवंश पाळण्याशिवाय पर्याय नाही. विषमुक्त शेती जहरमुक्त अन्न तयार करण्यासाठी देशी गोवंश पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले.सद्भावना पदयात्रेचा उद्देशदेशी गोवंशाची सेवा, संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करणे, देशी गोवंशावर आधारित शेतीला प्रोत्साहित करणे, देशी गोवंशाचे पर्यावरण, समाज, आरोग्य व प्रकृतीमध्ये असलेले महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहचविणे, गोहत्यावर पूर्ण प्रतिबंध लावण्यावर कायदा करण्यासाठी लोकप्रतिनिधींना जागृत करणे, नदींचे संरक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता व स्त्री भ्रुणहत्या याबाबत जनजागृती करणे, अखंड भारत निर्माण करणे आणि पुन्हा भारताचे प्राचीन वैभव स्थापित करुन भारताला विश्वगुरुचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपली ही पदयात्रा असल्याचे मोहम्मद फैज खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.