शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आजपासून साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतरही मागण्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी गुरूवार ११ आॅक्टोबरपासून पांढराबोडी रोडवरील किसान चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.सलग आठवडाभर हे साखळी उपोषण केले जाणार असून, तोपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास विजयादशमीच्या दिवशी पेंच प्रकल्पाचे पाणी ...

ठळक मुद्देसामूहिक जलसमाधीचा इशारा : प्रकरण प्रकल्पाचे पाणी धान पिकाला मिळवून देण्याचे, शेतकरी आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतरही मागण्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी गुरूवार ११ आॅक्टोबरपासून पांढराबोडी रोडवरील किसान चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.सलग आठवडाभर हे साखळी उपोषण केले जाणार असून, तोपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास विजयादशमीच्या दिवशी पेंच प्रकल्पाचे पाणी असलेल्या कोणत्याही नहरात अनेक शेतकरी सामुहिक जलसमाधी घेतील, अशी माहिती माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी शहरातील किसान चौक येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पेंच प्रकल्पाचे पाणी सोडले जात नसल्याने उद्भवलेली स्थिती, त्यातून वाढत चाललेला संताप आणि आता सुरू होणार असलेली शेतकऱ्यांची निर्णायक लढाई यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सद्य:स्थितीत धान पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता असून, पाण्याअभावी धान पीक वाळत चालले आहे. धानाचे अत्याधिक उत्पादन होत असलेल्या भंडारा जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.भंडारा तालुक्यातील बहुतेक शेती पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असून, काही दिवसापूर्वीच पेंचच्या पाण्यासाठी खुशीर्पार येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात मुजबी येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी जलसंपदा आणि महसुल विभागाच्या अधिकाºयांनी पेंच प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्याचे आश्वासन दिले. परंतु, भंडारा तालुक्याला पेंच प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ अद्यापही मिळाला नाही.याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होणार असून, आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांवर नाईलाजास्तव आतमहत्या करण्याची वेळ येवू शकते. शेतकरी संकटात असताना प्रकल्पाचे पाणी सोडले जात नाही आणि पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. ही गंभीर बाब असून, पेंचच्या पाण्यासाठीची लढाई आता अंतिम टप्प्यात आल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, खोटे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज, पाणीपट्टी कर, विद्युत बिल आदिंची वसुली न करता एक वषार्ची स्थगिती देण्यात यावी, भंडारा तालुक्याकरिता स्वतंत्र उपसासिंचन योजनेला मंजूरी प्रदान करून तातडीने काम पूर्ण करावे आणि २४ तास पाणी पुरवठा करण्यात यावा, आदि मागण्यांकरिता भंडारा शहरातील पांढराबोडी रोडवरील किसान चौकात गुरूवार ११ आॅक्टोबरपासून सर्वपक्षीय शेतकरी साखळी उपोषण करणार आहेत.पहिल्या दिवशी सुरेश धुर्वे, १२ ला बाबूजी सेलोकर, १३ ला धनराज साठवणे, १४ ला राजू धुर्वे, १५ ला राजेश सार्वे आणि चकोले, १६ ला चेतन भुरे आणि १७ आॅक्टोबरला स्वत: नरेंद्र भोंडेकर हे या साखळी उपोषणाचे नेतृत्व करणार आहेत. साखळी उपोषणाच्या अखेरच्या दिवशीपर्यंत पेंच प्रकल्पाचे पाणी पोहचले नाही तर १८ आॅक्टोबर रोजी विजयादशीच्या दिवशी पेंच प्रकल्पाचे पाणी असलेल्या एखाद्या नहरात शेतकरी सामुहिक जलसमाधी घेतील, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी जबाबदार असतील, असेही नरेंद्र भोंडेकर यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, आज बुधवारी किसान चौकातील शेतकरी पुतळ्याला माल्यार्पण करून सर्वपक्षीय शेतकºयांची बैठक घेण्यात आली. पत्रकार परिषदेला भंडारा तालुक्यातील शेतकरी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.