शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून ऊसाचे चुकारे थकीत

By admin | Updated: April 15, 2015 00:29 IST

वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याने जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाच्या चुकाऱ्याचे वाटप केले नाही...

करडी (पालोरा) : वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याने जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाच्या चुकाऱ्याचे वाटप केले नाही. दि. ३१ मार्चपर्यंत चुकारे हाती न पडल्याने शुन्य टक्के व्याजाच्या रकमावर बँकाना व्याजाचा भुर्दंड द्यावा लागणार आहे. १५ दिवसात चुकारे वाटपाचे आश्वासन कारखान्याने पाळले नाही. थकीत चुकाऱ्याचे तातडीने वाटप करण्यात यावे, ऊसाला २,२०० रुपये भाव देण्यात यावा, अन्यथा कारखान्यावर पदयात्रा मोर्चा काढण्याचा इशारा मोहाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे. मोहाडी तालुक्यातील वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन पहावयास मिळणार असे चित्र रंगविण्यात आले. कारखान्याच्या संचालकानी सुध्दा ऊसाला अधिक भाव देण्याचे आश्वासन देण्याबरोबर ऊस कटाईपासून न चुकता १५ दिवसात चुकाऱ्याचे वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सर्व आश्वासने खोटे ठरले. शेतकऱ्यांची फसवणुक करण्यात आली. लखपती शेतकरी तयार होण्याअगोदरच कंगाल शेतकरी दिसू लागला आहे. अच्छे दिन शेतकऱ्यांना कधीच दिसले नाहीत. परिणामी कारखाना प्रशासनाच्या बेजबाबदारपाणचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.देव्हाडा स्थित वैनगंगा शुगर कारखान्याचा गाळप हंगाम माहे नोव्हेंबर २०१४ मध्ये करण्यात आला. तेव्हापासून शेतकऱ्यांना २० जानेवारी पर्यंतच्या ऊसाच्या चुकाऱ्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना पैसे अजुनही मिळाले नाहीत. ऊसाचा भावही कमी देण्यात आला. जानेवारी ते मार्च २०१५ पर्यंतचे लाखो रुपयांचे चुकारे कारखान्याकडे थकीत आहेत. चुकारे लवकर होतील, अशी आश्वासने देण्यात आली. १५ दिवसात चुकारे देण्याचे आश्वासन पाळले नाही. यावर्षीचा खरिप हंगाम बुडाला. रब्बी पिकांनाही ऊन, पाऊस, वाऱ्याने झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील सोने मातीमोल ठरली. ऊसाच्या पैशाने निदान बँकाचे कर्ज भरता येईल, ही आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तीसुध्दा फोल ठरली. ३१ मार्चपर्यंत शुन्य टक्के व्याजदरांची कर्ज भरणे आवश्यक असते. पंरतू पैसेच हाती न आल्याने शुन्य टक्के रक्कमेच्या कर्जावर आता व्याज दयावा लागणार आहे. शेतकरी त्यामुळे अडचणीत सापडला आहे. कारखान्याने लवकरात लवकर थकीत चुकाऱ्याचे वाटप करावे.विलंबासाठी व्याजाचा भुर्दण्ड दयावा, ऊसाला प्रती टन २२०० रुपये भाव दयावा आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने केल्या आहेत. चुकाऱ्याचे त्वरित वाटप न झाल्यास १५ दिवसानंतर कारखान्यावर शेतकऱ्यांचा पदयात्रा मोर्चा काढण्याचा व गेट समोर सभा घेण्याचा इशारा मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव संजय भोयर यांनी दिला आहे. (वार्ताहर)तर ऊस लागवडीवर पडणार फटकाकारखान्यावर जानेवारीपासून जवळपास ६ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. कारखानदार पैसा नसल्याचे सांगतात. मात्र दुसरीकडे कारखान्यासाठी नवनविन यंत्र सामुग्री थेट पैसा देऊन खरेदी केली जात आहे. उसाचे चुकारे थकीत होत असल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे. त्याचा परिणाम ऊस लागवडीवर होत आहे. - वासुदेव बांते, अध्यक्ष राकॉ. मोहाडीचुकारे लवकरच देऊसाखरेचे मुल्यांकन वारंवार बदलत असल्याने बँकाकडून पाहिजे त्याप्रमाणात पैसा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही स्थिती संपूर्ण राज्याची आहे. शेतकऱ्यांचे चुकारे दिले जातील, थोडा अवधी लागेल. ऊसाला सरसकट १,७०० रुपये प्रति टनाचा भाव दिला जात असून बैलबंडीने वाहतुक करणाऱ्यांना १०० रुपये वाढवून दिले जात आहे.- दादा टिचकुले, उपाध्यक्ष, वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर देव्हाडा.