शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

तीन महिन्यांपासून ऊसाचे चुकारे थकीत

By admin | Updated: April 15, 2015 00:43 IST

वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याने जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाच्या चुकाऱ्याचे वाटप केले नाही.

करडी (पालोरा) : वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याने जानेवारी २०१५ पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाच्या चुकाऱ्याचे वाटप केले नाही. दि. ३१ मार्चपर्यंत चुकारे हाती न पडल्याने शुन्य टक्के व्याजाच्या रकमावर बँकाना व्याजाचा भुर्दंड द्यावा लागणार आहे. १५ दिवसात चुकारे वाटपाचे आश्वासन कारखान्याने पाळले नाही. थकीत चुकाऱ्याचे तातडीने वाटप करण्यात यावे, ऊसाला २,२०० रुपये भाव देण्यात यावा, अन्यथा कारखान्यावर पदयात्रा मोर्चा काढण्याचा इशारा मोहाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे. मोहाडी तालुक्यातील वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन पहावयास मिळणार असे चित्र रंगविण्यात आले. कारखान्याच्या संचालकानी सुध्दा ऊसाला अधिक भाव देण्याचे आश्वासन देण्याबरोबर ऊस कटाईपासून न चुकता १५ दिवसात चुकाऱ्याचे वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सर्व आश्वासने खोटे ठरले. शेतकऱ्यांची फसवणुक करण्यात आली. लखपती शेतकरी तयार होण्याअगोदरच कंगाल शेतकरी दिसू लागला आहे. अच्छे दिन शेतकऱ्यांना कधीच दिसले नाहीत. परिणामी कारखाना प्रशासनाच्या बेजबाबदारपाणचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.देव्हाडा स्थित वैनगंगा शुगर कारखान्याचा गाळप हंगाम माहे नोव्हेंबर २०१४ मध्ये करण्यात आला. तेव्हापासून शेतकऱ्यांना २० जानेवारी पर्यंतच्या ऊसाच्या चुकाऱ्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना पैसे अजुनही मिळाले नाहीत. ऊसाचा भावही कमी देण्यात आला. जानेवारी ते मार्च २०१५ पर्यंतचे लाखो रुपयांचे चुकारे कारखान्याकडे थकीत आहेत. चुकारे लवकर होतील, अशी आश्वासने देण्यात आली. १५ दिवसात चुकारे देण्याचे आश्वासन पाळले नाही. यावर्षीचा खरिप हंगाम बुडाला. रब्बी पिकांनाही ऊन, पाऊस, वाऱ्याने झोडपले. शेतकऱ्यांच्या शेतातील सोने मातीमोल ठरली. ऊसाच्या पैशाने निदान बँकाचे कर्ज भरता येईल, ही आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तीसुध्दा फोल ठरली. ३१ मार्चपर्यंत शुन्य टक्के व्याजदरांची कर्ज भरणे आवश्यक असते. पंरतू पैसेच हाती न आल्याने शुन्य टक्के रक्कमेच्या कर्जावर आता व्याज दयावा लागणार आहे. शेतकरी त्यामुळे अडचणीत सापडला आहे. कारखान्याने लवकरात लवकर थकीत चुकाऱ्याचे वाटप करावे.विलंबासाठी व्याजाचा भुर्दण्ड दयावा, ऊसाला प्रती टन २२०० रुपये भाव दयावा आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने केल्या आहेत. चुकाऱ्याचे त्वरित वाटप न झाल्यास १५ दिवसानंतर कारखान्यावर शेतकऱ्यांचा पदयात्रा मोर्चा काढण्याचा व गेट समोर सभा घेण्याचा इशारा मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव संजय भोयर यांनी दिला आहे. (वार्ताहर)तर ऊस लागवडीवर पडणार फटकाकारखान्यावर जानेवारीपासून जवळपास ६ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. कारखानदार पैसा नसल्याचे सांगतात. मात्र दुसरीकडे कारखान्यासाठी नवनविन यंत्र सामुग्री थेट पैसा देऊन खरेदी केली जात आहे. उसाचे चुकारे थकीत होत असल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे. त्याचा परिणाम ऊस लागवडीवर होत आहे. - वासुदेव बांते, अध्यक्ष राकॉ. मोहाडीचुकारे लवकरच देऊसाखरेचे मुल्यांकन वारंवार बदलत असल्याने बँकाकडून पाहिजे त्याप्रमाणात पैसा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही स्थिती संपूर्ण राज्याची आहे. शेतकऱ्यांचे चुकारे दिले जातील, थोडा अवधी लागेल. ऊसाला सरसकट १,७०० रुपये प्रति टनाचा भाव दिला जात असून बैलबंडीने वाहतुक करणाऱ्यांना १०० रुपये वाढवून दिले जात आहे.- दादा टिचकुले, उपाध्यक्ष, वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर देव्हाडा.