शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

धानाचे २५८ काेटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

जिल्ह्यात खरीप आणि रबी या दाेन हंगामात धानाचे पीक घेतले जाते. गत खरीप हंगामात एक लाख २७ हजार ६२४ ...

जिल्ह्यात खरीप आणि रबी या दाेन हंगामात धानाचे पीक घेतले जाते. गत खरीप हंगामात एक लाख २७ हजार ६२४ शेतकऱ्यांनी ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची पणन महासंघाला विक्री केली हाेती. त्याची किंमत ७०० काेटी ७४ लाख दहा हजार ३५५ रुपये हाेती. त्यापैकी ७०० काेटी ७१ लाख ६१ हजार ६०४ रुपयांचे चुकारे करण्यात आले. खरीप हंगामातील दाेन लाख ४८ हजार रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहे. यासाेबतच बाेनसची निम्मी रक्कमही अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही, असे असतानाही शेतकऱ्यांनी रबी हंगामातील धान पणन महासंघाला विकला.

जिल्ह्यातील ४३ हजार ३५८ शेतकऱ्यांनी १८ लाख ३९ हजार ७२२ क्विंटल धान आधारभूत किंमत १८६८ रुपयांनी विकला. या धानाची किंमत ३४३ काेटी ६६ लाख एक हजार ४६१ रुपये आहे. आतापर्यंत केवळ ८५ काेटी ४८ लाख ९७ हजार ४१० रुपयांचे चुकारे करण्यात आले. मात्र आता दाेन महिने झाले तरी २५८ काेटी १७ लाख चार हजार ५१ रुपयांचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. शेतकऱ्यांनी उधार उसणवार करीत खरीप हंगामात राेवणी केली. आज ना उद्या पैसे मिळतील, अशी अपेक्षा हाेती. परंतु आता राेवणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी माेठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांजवळ पैसे नसल्याने शेतकरी सावकाराच्या दारात उभे आहेत.

बाॅक्स

शेतकरी आंदाेलनाच्या पवित्र्यात

अद्यापही धानाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी आंदाेलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये असंताेष खदखदत आहे. पणन महासंघाकडे विचारणा केली जात आहे. परंतु अद्यापही पैसे मिळाले नाहीत. येत्या आठ दिवसात पैसे मिळाले नाही तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बाॅक्स

वित्त विभागाकडे पाठपुरावा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान चुकाऱ्यासाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकाेलीचे आमदार नाना पटाेले यांनी राज्याच्या वित्त विभागाकडे यासंबंधी पाठपुरावा केला आहे. राज्य शासनाच्या वतीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात साेमवारपासून जमा हाेईल, असे सांगण्यात आले. पंधरा दिवसात सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येईल, असेही ते म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी सांगितले.