शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

धानाचे २५८ काेटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

जिल्ह्यात खरीप आणि रबी या दाेन हंगामात धानाचे पीक घेतले जाते. गत खरीप हंगामात एक लाख २७ हजार ६२४ ...

जिल्ह्यात खरीप आणि रबी या दाेन हंगामात धानाचे पीक घेतले जाते. गत खरीप हंगामात एक लाख २७ हजार ६२४ शेतकऱ्यांनी ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची पणन महासंघाला विक्री केली हाेती. त्याची किंमत ७०० काेटी ७४ लाख दहा हजार ३५५ रुपये हाेती. त्यापैकी ७०० काेटी ७१ लाख ६१ हजार ६०४ रुपयांचे चुकारे करण्यात आले. खरीप हंगामातील दाेन लाख ४८ हजार रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहे. यासाेबतच बाेनसची निम्मी रक्कमही अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही, असे असतानाही शेतकऱ्यांनी रबी हंगामातील धान पणन महासंघाला विकला.

जिल्ह्यातील ४३ हजार ३५८ शेतकऱ्यांनी १८ लाख ३९ हजार ७२२ क्विंटल धान आधारभूत किंमत १८६८ रुपयांनी विकला. या धानाची किंमत ३४३ काेटी ६६ लाख एक हजार ४६१ रुपये आहे. आतापर्यंत केवळ ८५ काेटी ४८ लाख ९७ हजार ४१० रुपयांचे चुकारे करण्यात आले. मात्र आता दाेन महिने झाले तरी २५८ काेटी १७ लाख चार हजार ५१ रुपयांचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. शेतकऱ्यांनी उधार उसणवार करीत खरीप हंगामात राेवणी केली. आज ना उद्या पैसे मिळतील, अशी अपेक्षा हाेती. परंतु आता राेवणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी माेठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांजवळ पैसे नसल्याने शेतकरी सावकाराच्या दारात उभे आहेत.

बाॅक्स

शेतकरी आंदाेलनाच्या पवित्र्यात

अद्यापही धानाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी आंदाेलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये असंताेष खदखदत आहे. पणन महासंघाकडे विचारणा केली जात आहे. परंतु अद्यापही पैसे मिळाले नाहीत. येत्या आठ दिवसात पैसे मिळाले नाही तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

बाॅक्स

वित्त विभागाकडे पाठपुरावा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान चुकाऱ्यासाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकाेलीचे आमदार नाना पटाेले यांनी राज्याच्या वित्त विभागाकडे यासंबंधी पाठपुरावा केला आहे. राज्य शासनाच्या वतीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात साेमवारपासून जमा हाेईल, असे सांगण्यात आले. पंधरा दिवसात सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येईल, असेही ते म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी सांगितले.