शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

खाटांअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचाराची वेळ

By admin | Updated: November 23, 2015 00:35 IST

मागील अनेक वर्षापासून लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून केलेली मागणी लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतरही धूळ खात पडली आहे.

व्यथा लाखांदूरची : उपजिल्हा रुग्णालयाची मागणी धूळ खात लाखांदूर : मागील अनेक वर्षापासून लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून केलेली मागणी लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतरही धूळ खात पडली आहे. खाटांची ३० व्यवस्था असल्याने जमीनीवर रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर येवून पडली आहे.लाखांदूर हे तालूक्याचे ठिकाण भंडारा जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर गडचिरोली जिल्हयाला लागून नक्षल प्रभावित आहे. तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र असताना प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयातच रुग्णांना उपचाराकरिता, लोकसंख्येनुसार ग्रामीण रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव यामुळे ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाला पाहिजे ही नागरिकांची आग्रही मागणी प्रशासनाकडून कानाडोळा केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. नुकतेच लाखांदूर ग्रामपंचायतीचा नगरपंचातीचा दर्जा मिळाला. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा अपेक्षित असतांना लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी जातीने लक्ष देवून जनतेची मागणी शासनाकडे रेटून धरणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.येथील ग्रामीण रुग्णालयात विष प्राषण, प्रसुती, अपघातात जखमी रुग्ण, सर्पदंश, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, हायड्रोशिल शस्त्रक्रिया शिबिरे मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. या रुग्णालयात मागील कित्येक वर्षापासून केवळ ३० खाटांची व्यवस्था केल्या गेली आहे. पंरतु रुग्णांचे वाढते प्रमाण बघून खाटा वाढविणे गरजेचे आहे. प्रसूतीकरिता आलेल्या महिला सिझर करिता त्रास सहन करीत असेल तर ती व्यवस्था या रुग्णालयात नसल्याने जिल्हा रुग्णालयात रेफर केल्या जाते. यावेळी बाळ व माता मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा आलेख दिसून येतो. येथील रुग्णालयात जनरेटरची सोय नाही, ब्लड बँक नाही, रक्त तपासणी, एक्सरे नाही, आठवड्यातून काही दिवस ठरले असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. उन्हळयाचे दिवस सुरु झाले लोडशेडिंगच्या काळात रुग्ण अंधारात मात्र रात्रपाळीचे कर्मचारी कुलर लावून सुखाची झोप घेतांनाचे चित्र दिसते. एकूणच उपजिल्हा रुग्णालयाची मागणी पूर्ण झाल्यास, येथील रुग्णांना सर्वतोपरी उपचार घेऊन सुदृढ शरीराची आशा पल्लवीत होऊ शकते. रुग्णालयात आवश्यक औषध साठा व साहित्य उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना बाहेरुन औषध विकत घ्यावे लागते. (तालुका प्रतिनिधी)