शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दिघोरीत मारबतीची परंपरा कायम

By admin | Updated: September 14, 2015 00:17 IST

येथील मारबत उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सन १९०७ पासून सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

१०८ वर्षांची मारबत : सामाजिक एकोपामुकेश देशमुख दिघोरी / मोठी येथील मारबत उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सन १९०७ पासून सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ‘ईळा पिढा टळो व बळीचे राज्य येवो’च्या गजरात मारबत उत्सव साजरा करण्यात आला.सकाळी ८ वाजता येथील शिव मंदिरात गावातील वॉर्डावॉर्डातून तयार झालेल्या मारबती एकत्रीत आल्या. यावर्षी एकूण २१ मारबती (पुतळे) संपूर्ण गावातून बनविण्यात आले होते. सदर उत्सव ग्रामपंचायत कमेटी, तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या मारबत उत्सवात मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक एकोप्याचे उदाहरण सादर केले. शिव मंदिरातून निघालेली पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मारबतींची रॅली गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. तरुणाई डी.जे. च्या तालावर थिरकत होती तर वयोवृद्ध तंट्या भिल्लच्या दांडपट्टा बघण्यात मग्न होती. मागील तीन वर्षांपासून धुरपता गोटेफोडे ही महिला या उत्सवात स्वत: मारबत पकडत असते. त्यामुळे महिलांची उपस्थिती तथा उत्साह या मारबत रॅलीत बघण्यासारखा असतो. रॅलीतील प्रत्येक मारबतींवर विशेष असे शिर्षक दिलेले असतात. यात भ्रष्टाचार, रोगराई व इतर अनेक विषयांचा समावेश असतो. रॅलीत सहभागी झालेल्या मारबतींवर विविध विषयांवर आधारीत देखावा तथा संदेश लिहण्यात आला होता. यात शेतकऱ्यांच्या व्यथेपासून तर महागाईचे सावट आदी विषयांचा समावेश होता. संपूर्ण २१ ही मारबतींवर मनोरंजनात्मक शिर्षक लिहिले होते. मागील १०८ वर्षापासून संपूर्ण दिघोरीवासी जनता मारबत उत्सवात हिरहिरीने भाग घेऊन या उत्सवाचा आनंद घेत असतात. मारबत उत्सवामुळे गावात एकीचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्यास खूप मदत होत असल्याचे दिसून येते. रॅलीदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांच्या सहकार्याने दिघोरीवासिांनी अन्य गावांपुढे आदर्श घालुन दिला आहे.