शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

२६ जानेवारीपर्यंत गुंथारा हागणदारीमुक्त गाव करा

By admin | Updated: October 2, 2016 00:38 IST

स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी असून घरात शौचालय असणे काळाची गरज झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : एक दिवस मजुरांसोबतभंडारा : स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी असून घरात शौचालय असणे काळाची गरज झाली आहे. प्रत्येक घरात शौचालय व प्रत्येक घरात एक शोष खड्डा निर्माण करून २६ जानेवारी २०१७ पर्यंत नागरिकांनी गुंथारा गाव हागणदारी मुक्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले. मनरेगा अंतर्गत एक दिवस मजूरासोबत या कार्यक्रमात ते गुंथारा येथे बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे, उपजिल्हाधिकारी रोहयो सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसीलदार संजय पवार, खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा परिषद सदस्य बाळू कायते, पंचायत समिती सदस्य एकराम पडोळे, सरपंच शुभांगी सार्वे व सहाय्यक कामगार आयुक्त ए.एच. बेलेकर उपस्थित होते.शासनाच्या योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी ‘एक दिवस मजुरांसोबत’ हा कार्यक्रम वर्षातून दोन वेळा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमात शासनाच्या योजना गावकऱ्यांना सांगितल्या जातात. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ज्यांनी कामाची मागणी केली त्यांना १५ दिवसात काम मिळायला हवे. शासनाने या मनरेगात ११ वैयक्तिक स्वरुपाच्या कामाचा समावेश केला असून या कामांची यादी नागरिकांनी ग्रामसभेत यंत्रणांना द्यावी. वैयक्तिक कामासाठी शासन पैसे देणार असून गावकऱ्यांनी वैयक्तिक स्वरूपाच्या ११ कामाचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रत्येक नागरिकांनी घरात शौचालय बांधणे व शोष खड्डा निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शौचालयासाठी आता शासन १२ हजार रुपये अनुदान देते. याचा लाभ घ्यायला हवा. २६ जानेवारीपर्यंत गुंथारा गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. शाळा व आंगणवाड्या या महत्वाच्या संस्था असून भावी पिढी घडविण्याचे हे मंदिर आहे. याकडे गावकरी म्हणून अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.गुंथारा गाव हे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट असून जलयुक्त शिवारमध्ये मजगी, गाळ काढणे, मामा तलाव, बंधारे व विहिरीची कामे मोठ्या प्रमाणात सूचवावी. यंत्रणांनी गावकऱ्यांना विश्वासात घेवून जलयुक्त शिवार आराखडा तयार करावा. आराखड्यानुसार कामे होतात की नाही हे गावकऱ्यांनी तपासावे, असे आवाहन त्यांनी केले. गावकऱ्यांनी स्वत:ला स्वच्छतेची सवय लावून घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे यांनी केले. आजच्या कार्यक्रमात विविध योजनांचे अर्ज घेण्याची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. २ आॅक्टोबर होणाऱ्या ग्रामसभेत जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच महाअवयव दानासाठी अर्ज भरून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या कार्यक्रमात अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बिपीएल दाखला, जॉब कार्ड व सामूहिक वन हक्क प्रमाणपत्र ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. यावेळी बाळू कायते यांनी मार्गदर्शन केले. (नगर प्रतिनिधी)