शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

ई पॉस मशीनवर स्वस्त धान्य दुकानदारांचाच अंगठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST

भंडारा : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत रेशन लाभार्थ्यांना शिधापत्रिकाच्या अनुषंगाने स्वस्त धान्य देण्यात येते. यात प्रत्येक लाभार्थ्यांच्या अंगठा ई पॉस ...

भंडारा : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत रेशन लाभार्थ्यांना शिधापत्रिकाच्या अनुषंगाने स्वस्त धान्य देण्यात येते. यात प्रत्येक लाभार्थ्यांच्या अंगठा ई पॉस मशीनवर घेणे बंधनकारक होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ई पॉस मशीनवर फक्त स्वस्त धान्य दुकानदारांना अंगठा लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

दुसरीकडे राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी बंद पुकारल्याने गत चार दिवसांपासून धान्याचे वितरण ठप्प आहे. यात भंडारा जिल्ह्यातील हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाने घोषित केल्या प्रमाणे नि:शुल्क अन्नधान्य अजूनपर्यंत धान्य दुकानदारापर्यंत पोहोचलेले नाही. परिणामी आता पुन्हा एकदा संचारबंदीच्या काळात रेशनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच आर्थिक चणचण वाटत असताना अन्नधान्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. यावर चोहोबाजूने फक्त गरीब व गरजू लाभार्थी भरडला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बॉक्स

अशी आहेत स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या

राज्यात ५२ हजारांपेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकाने असून भंडारा जिल्ह्यात ८८० स्वस्त धान्य दुकाने आहेत. यातूनच जिल्ह्यातील अडीच लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण केले जाते. मात्र या स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांना घेऊन १ मेपासून स्वस्त धान्य वाटप बंद केले आहे. दुकानदारांच्या मागणी अंतर्गत ५० लाखांचा कोविड योद्ध्यांचा विमा कवच व अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली कमिशन तातडीने देण्याची मागणी करीत या दुकानदारांनी धान्य वितरण बंद केले आहे. या सोबतच अन्य मागण्यांचाही समावेश आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिकाही स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने घेतली आहे.

बॉक्स

रेशन दुकानात सॅनिटायझर

स्वस्त धान्य वितरण प्रणालींतर्गत राज्य शासनाने घोषित घोषणा केल्याप्रमाणे गरीब व गरजू लोकांना धान्याचे वाटप केले जाणार आहे. यात ई पॉस मशीनवर अंगठा लावण्यात येणार नसला तरी दुकानात सॅनिटायझर असणे गरजेचे आहे. जेणेकरून वरून संसर्गापासून बचाव होऊ शकेल. तसेच दुकानात एकाच वेळी गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे निर्देशही शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

बॉक्स

स्थानिक पातळीवरच्या मागण्या

तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर शिधापत्रिकाधारक धान्य मागायला येत असेल तर त्याचा अंगठा ई पॉस मशीनवर घ्यावा, असे शासनाने बजावले आहे. मात्र यावरही स्वस्त धान्य संघटनेने आक्षेप घेतला असून ही अट रद्द करावी. जेणेकरून लाभार्थ्याला त्याच्या हक्काचे धान्य देता येईल. मात्र याबाबत अजूनपर्यंत निर्णय न झाल्याचे समजते.

बॉक्स

लाभार्थ्यांची गैरसोय कायम

जिल्ह्यात एक मेपासून धान्य वाटप बंद असल्याने दररोज शेकडो लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात येऊन आल्या पावली परत जात आहेत. धान्य मिळत नसेल तर खायचे काय, असा सवालही आता लाभार्थी विचारत आहेत. राज्य शासनाने लवकर निर्णय घेऊन हा तिढा सोडवावा, अशी मागणीही लाभार्थी करीत आहेत.

बॉक्स

संचारबंदी काळात नि:शुल्क धान्य मिळेल, अशी घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत धान्यच स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहोचले नाही तर वाटप कुठून करायचे, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. संचारबंदी घोषित होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.