शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

ई पॉस मशीनवर स्वस्त धान्य दुकानदारांचाच अंगठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST

भंडारा : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत रेशन लाभार्थ्यांना शिधापत्रिकाच्या अनुषंगाने स्वस्त धान्य देण्यात येते. यात प्रत्येक लाभार्थ्यांच्या अंगठा ई पॉस ...

भंडारा : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत रेशन लाभार्थ्यांना शिधापत्रिकाच्या अनुषंगाने स्वस्त धान्य देण्यात येते. यात प्रत्येक लाभार्थ्यांच्या अंगठा ई पॉस मशीनवर घेणे बंधनकारक होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ई पॉस मशीनवर फक्त स्वस्त धान्य दुकानदारांना अंगठा लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

दुसरीकडे राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी बंद पुकारल्याने गत चार दिवसांपासून धान्याचे वितरण ठप्प आहे. यात भंडारा जिल्ह्यातील हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाने घोषित केल्या प्रमाणे नि:शुल्क अन्नधान्य अजूनपर्यंत धान्य दुकानदारापर्यंत पोहोचलेले नाही. परिणामी आता पुन्हा एकदा संचारबंदीच्या काळात रेशनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच आर्थिक चणचण वाटत असताना अन्नधान्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. यावर चोहोबाजूने फक्त गरीब व गरजू लाभार्थी भरडला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बॉक्स

अशी आहेत स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या

राज्यात ५२ हजारांपेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकाने असून भंडारा जिल्ह्यात ८८० स्वस्त धान्य दुकाने आहेत. यातूनच जिल्ह्यातील अडीच लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण केले जाते. मात्र या स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांना घेऊन १ मेपासून स्वस्त धान्य वाटप बंद केले आहे. दुकानदारांच्या मागणी अंतर्गत ५० लाखांचा कोविड योद्ध्यांचा विमा कवच व अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली कमिशन तातडीने देण्याची मागणी करीत या दुकानदारांनी धान्य वितरण बंद केले आहे. या सोबतच अन्य मागण्यांचाही समावेश आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिकाही स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने घेतली आहे.

बॉक्स

रेशन दुकानात सॅनिटायझर

स्वस्त धान्य वितरण प्रणालींतर्गत राज्य शासनाने घोषित घोषणा केल्याप्रमाणे गरीब व गरजू लोकांना धान्याचे वाटप केले जाणार आहे. यात ई पॉस मशीनवर अंगठा लावण्यात येणार नसला तरी दुकानात सॅनिटायझर असणे गरजेचे आहे. जेणेकरून वरून संसर्गापासून बचाव होऊ शकेल. तसेच दुकानात एकाच वेळी गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे निर्देशही शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

बॉक्स

स्थानिक पातळीवरच्या मागण्या

तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर शिधापत्रिकाधारक धान्य मागायला येत असेल तर त्याचा अंगठा ई पॉस मशीनवर घ्यावा, असे शासनाने बजावले आहे. मात्र यावरही स्वस्त धान्य संघटनेने आक्षेप घेतला असून ही अट रद्द करावी. जेणेकरून लाभार्थ्याला त्याच्या हक्काचे धान्य देता येईल. मात्र याबाबत अजूनपर्यंत निर्णय न झाल्याचे समजते.

बॉक्स

लाभार्थ्यांची गैरसोय कायम

जिल्ह्यात एक मेपासून धान्य वाटप बंद असल्याने दररोज शेकडो लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात येऊन आल्या पावली परत जात आहेत. धान्य मिळत नसेल तर खायचे काय, असा सवालही आता लाभार्थी विचारत आहेत. राज्य शासनाने लवकर निर्णय घेऊन हा तिढा सोडवावा, अशी मागणीही लाभार्थी करीत आहेत.

बॉक्स

संचारबंदी काळात नि:शुल्क धान्य मिळेल, अशी घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत धान्यच स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहोचले नाही तर वाटप कुठून करायचे, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. संचारबंदी घोषित होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.