शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 12:57 IST

Bhandara : मानधन मिळण्यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. अशा स्थितीत त्यांना तत्काळ मानधन देऊन अन्य समस्याही मार्गी लावाव्यात, अशी मागणी केली आहे. या आशयाचे निवेदन आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयु) भंडारा जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.

या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आशा सेविका व गटप्रवर्तक हे भारतातील व राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महत्त्वाच्या दुवा मानले जातात. नागरिकांना आरोग्यसेवा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम आशा व गटप्रवर्तक कर्मचारी इमानेइतबारे करत आहेत. कोरोना काळात त्यांच्या कामामुळे कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळवले. त्यामुळे आशा सेविका व गटप्रवर्तक यांना नावलौकिक मिळाला. त्यांच्या कामाचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेसुद्धा सन्मान केला आहे. परंतु, त्यांच्या समस्यांची जाण शासनाने अजूनपर्यंत घेतलेली नाही. शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आजही त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. 

शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्याकरिता आशा व गटप्रवर्तक कर्मचारी सतत संघर्ष करत आहेत. आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत आंदोलन केल्यानंतर शासनाने मागण्या मंजूर केल्या होत्या. यात आशा सेविकांना सात हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मासिक वेतनात वाढ व गटप्रवर्तकांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समायोजन करण्याबाबत कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. याशिवाय या कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस, आरोग्यवर्धिनीचा निधी सर्व आशांना मेडिकल ऑफिसर यांच्या स्वाक्षरीने देणार, आरोग्यवर्धिनीचा १५०० रुपये मोबदला महिना गटप्रवर्तकांना देण्याचीही घोषित केले होते. अशा विविध मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांची अंमलबजावणी करण्यात न आल्याने ५० दिवस बेमुदत संपही पुकारण्यात आला होता.

उल्लेखनीय म्हणजे आशा सेविकांना पाच हजार रुपये महिना व गटप्रवर्तकांना एक हजार रुपये महिना नोव्हेंबर २०२३ पासून देण्याच्या निर्णय शासनाने घेतला. परंतु, नवीन जीआरनुसार मानधन एप्रिल २०२४ पासून देण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. शासनाने निर्णय घेताना कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. परिणामी घेतलेला निर्णय अयोग्य असून, त्यामध्ये फेरबदल करून ९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. हे निवेदन देताना उषा मेश्राम, सुनंदा बसेशंकर, माधुरी डोंगरे, वैशाली तांडेकर, वनिता तितिरमारे, ममता चवरे, स्वाती रूपाली, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

"आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कर्मचारी युनियन गंभीर आहे. शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही उग्र आंदोलन करू. परंतु, आम्ही आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मागे हटणार नाही. त्यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन लढत राहणार आहे."- उषा मेश्राम, महासचिव आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन, भंडारा. 

 

टॅग्स :bhandara-acभंडारा