शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामाच्या तीन महिन्यातच पडले राज्य मार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:04 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले.

ठळक मुद्देखड्डे दुरुस्तीची मागणी : राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, केसलवाडा रस्त्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले. कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा यांच्या देखरेखीत झालेल्या कामावर शासनाचे अंदाजपत्रकीय ६४५.३२ लक्ष रुपये खर्ची पडले आहेत. मात्र, सदर रस्त्याचे काम पूर्ण होवून जेमतेम दोन ते तिन महिन्यांचा कालावधी लोटला असतांना रस्त्याला ठिकठिकाणी आडव्या नाल्या व खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर रस्त्याच्या दर्जोन्नतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी,जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा यांच्या देखरेखीत पूर्ण करण्यात आले. दि.२१ सप्टेंबर २०१६ रोजी बोरी येथे आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते सदर कामाचे भुमीपुजन करण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी रस्त्याच्याकडेला अनेक ठिकाणी मुरुमाने कडा भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक रस्ता झालेला आहे. वाहनकडेला थांबविण्यासाठी अडचणी येत आहेत. एखादवेळी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्यावर लहान पुलांचे बांधकाम करतांना व्यवस्थीत दबाई करण्यात न आल्याने पुलाचे पायल्यांना समांतर दबाव निर्माण होवून नाल्या पडलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर ब्रेकर तयार झाल्यासारखी अवस्था आहे.रस्त्याचे मजबुतीकरण करतांना व डांबरीकरण करतांना तांत्रिक बाबींचे तंतोतंत पालन करण्यात आलेले दिसत नाही. त्याचबरोबर बांधकाम करतांना संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी जाणीवपूर्णक दुर्लक्ष केले. कंत्राटदाराच्या भरवस्यावर काम सोडल्याने त्याचा परिणाम आज जाणवत आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यामुळे जेततेम दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाही रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र जांभोरा ते बोरी गावा दरम्यान दिसून येत आहेत. जांभोरा ते केसलवाडा दरम्यानही रस्त्याच्या दुरावस्थेच्या खुणा दिसायल्या लागल्या आहेत. रस्त्याचे बांधकाम करतांना केसलवाडा गावातील नागरिकांनी गावातून व शेतशिवारातून सुरु असलेल्या कामाच्या गुणवत्तेसंबंधाने प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली होती. मात्र, अधिकाºयांनी प्रकरणी लक्ष दिले नाही, असा आरोप केसलवाडा येथील नागरिकांचा होता. आज जेमतेम दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाच रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. अधिकारी प्रकरणी लक्ष घालून समस्या सोडवितील काय, असा प्रश्न विचारला जात आहे.