शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बांधकामाच्या तीन महिन्यातच पडले राज्य मार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:04 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले.

ठळक मुद्देखड्डे दुरुस्तीची मागणी : राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, केसलवाडा रस्त्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले. कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा यांच्या देखरेखीत झालेल्या कामावर शासनाचे अंदाजपत्रकीय ६४५.३२ लक्ष रुपये खर्ची पडले आहेत. मात्र, सदर रस्त्याचे काम पूर्ण होवून जेमतेम दोन ते तिन महिन्यांचा कालावधी लोटला असतांना रस्त्याला ठिकठिकाणी आडव्या नाल्या व खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर रस्त्याच्या दर्जोन्नतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी,जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा यांच्या देखरेखीत पूर्ण करण्यात आले. दि.२१ सप्टेंबर २०१६ रोजी बोरी येथे आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते सदर कामाचे भुमीपुजन करण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी रस्त्याच्याकडेला अनेक ठिकाणी मुरुमाने कडा भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक रस्ता झालेला आहे. वाहनकडेला थांबविण्यासाठी अडचणी येत आहेत. एखादवेळी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्यावर लहान पुलांचे बांधकाम करतांना व्यवस्थीत दबाई करण्यात न आल्याने पुलाचे पायल्यांना समांतर दबाव निर्माण होवून नाल्या पडलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर ब्रेकर तयार झाल्यासारखी अवस्था आहे.रस्त्याचे मजबुतीकरण करतांना व डांबरीकरण करतांना तांत्रिक बाबींचे तंतोतंत पालन करण्यात आलेले दिसत नाही. त्याचबरोबर बांधकाम करतांना संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी जाणीवपूर्णक दुर्लक्ष केले. कंत्राटदाराच्या भरवस्यावर काम सोडल्याने त्याचा परिणाम आज जाणवत आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यामुळे जेततेम दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाही रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र जांभोरा ते बोरी गावा दरम्यान दिसून येत आहेत. जांभोरा ते केसलवाडा दरम्यानही रस्त्याच्या दुरावस्थेच्या खुणा दिसायल्या लागल्या आहेत. रस्त्याचे बांधकाम करतांना केसलवाडा गावातील नागरिकांनी गावातून व शेतशिवारातून सुरु असलेल्या कामाच्या गुणवत्तेसंबंधाने प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली होती. मात्र, अधिकाºयांनी प्रकरणी लक्ष दिले नाही, असा आरोप केसलवाडा येथील नागरिकांचा होता. आज जेमतेम दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाच रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. अधिकारी प्रकरणी लक्ष घालून समस्या सोडवितील काय, असा प्रश्न विचारला जात आहे.