शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बांधकामाच्या तीन महिन्यातच पडले राज्य मार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:04 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले.

ठळक मुद्देखड्डे दुरुस्तीची मागणी : राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, केसलवाडा रस्त्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले. कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा यांच्या देखरेखीत झालेल्या कामावर शासनाचे अंदाजपत्रकीय ६४५.३२ लक्ष रुपये खर्ची पडले आहेत. मात्र, सदर रस्त्याचे काम पूर्ण होवून जेमतेम दोन ते तिन महिन्यांचा कालावधी लोटला असतांना रस्त्याला ठिकठिकाणी आडव्या नाल्या व खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर रस्त्याच्या दर्जोन्नतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी,जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा यांच्या देखरेखीत पूर्ण करण्यात आले. दि.२१ सप्टेंबर २०१६ रोजी बोरी येथे आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते सदर कामाचे भुमीपुजन करण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी रस्त्याच्याकडेला अनेक ठिकाणी मुरुमाने कडा भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक रस्ता झालेला आहे. वाहनकडेला थांबविण्यासाठी अडचणी येत आहेत. एखादवेळी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्यावर लहान पुलांचे बांधकाम करतांना व्यवस्थीत दबाई करण्यात न आल्याने पुलाचे पायल्यांना समांतर दबाव निर्माण होवून नाल्या पडलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर ब्रेकर तयार झाल्यासारखी अवस्था आहे.रस्त्याचे मजबुतीकरण करतांना व डांबरीकरण करतांना तांत्रिक बाबींचे तंतोतंत पालन करण्यात आलेले दिसत नाही. त्याचबरोबर बांधकाम करतांना संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी जाणीवपूर्णक दुर्लक्ष केले. कंत्राटदाराच्या भरवस्यावर काम सोडल्याने त्याचा परिणाम आज जाणवत आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यामुळे जेततेम दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाही रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र जांभोरा ते बोरी गावा दरम्यान दिसून येत आहेत. जांभोरा ते केसलवाडा दरम्यानही रस्त्याच्या दुरावस्थेच्या खुणा दिसायल्या लागल्या आहेत. रस्त्याचे बांधकाम करतांना केसलवाडा गावातील नागरिकांनी गावातून व शेतशिवारातून सुरु असलेल्या कामाच्या गुणवत्तेसंबंधाने प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली होती. मात्र, अधिकाºयांनी प्रकरणी लक्ष दिले नाही, असा आरोप केसलवाडा येथील नागरिकांचा होता. आज जेमतेम दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाच रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. अधिकारी प्रकरणी लक्ष घालून समस्या सोडवितील काय, असा प्रश्न विचारला जात आहे.